शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

भाजपचा अभूतपूर्व आणि निर्भेळ असाच विजय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:10 IST

मागील निवडणुकीपेक्षा ७८ ते ८३ जास्त जागा

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवून मागील निवडणुकीपेक्षा ७८ ते ८३ जास्त जागा मिळवल्या आहेत. हा विजय अभूतपूर्व, निर्भेळ आहे. तो मोदी-शहा जोडीचा आहे. त्यांच्या नियोजनाचा, आर्थिक ताकदीचा व संघटन शक्तीचा आहे. या यशासाठी मोदीजी, अमित शाह व भाजपचे अभिनंदन केले पाहिजे. भाजपला केरळ, तामिळनाडूमध्ये खाते देखील उघडता आले नाही तर कर्नाटकात त्यांनी जम बसविला आहे. पूर्व-ईशान्य भारतात, बंगाल-ओरिसा येथे त्यांनी नव्याने आधार शोधले आहेत. उत्तर प्रदेश-बिहार-मध्य प्रदेश-राजस्थान-गुजराथ-महाराष्ट्र येथे त्यांनी विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. आता ओबीसी जाती आधारे किंवा राखीव जाती आंदोलनाच्या आधारे होणारे राजकारण संपणार काय असा प्रश्न निर्माण केला आहे.यशाची कारणेभाजपने कमीपणा घेवून का होईना शिवसेना, जेडीयू यांच्याशी युती केली. तसे कॉंग्रेसला जमले नाही. त्यांचा अहंकार आडवा आला. कॉंग्रेसने जरा आत्मपरीक्षण केले पाहीजे. विरोधी पक्षांची एकजूट निट होवू शकली नाही.मोदी प्रतिमा निर्माणजनमानसात मोदींची प्रतिमा भ्रष्टाचार न करणारा, कोणासाठी भ्रष्टाचार करील, ह्याला कुटुंब नाही, अशी राहिली. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर विश्वास ठेवण्यासाठी जनतेला पुरेसा त्रयस्थ पुरावा लागतो. तो टुजी प्रकरणात सीएजीच्या आॅडीटने दिला व वृत्तपत्रीय बातम्या, प्रचार व अण्णा हजारेंच्या आंदोलनाने जनतेची भ्रष्टाचार झाल्याची खात्री पटली होती. १९८७ मध्ये संरक्षण मंत्री व्ही. पी. सिंग यांनीच बंड केल्याने जनतेची भ्रष्टाचार झाल्याची खात्री पटली होती. यावेळी राफेल प्रकरण अगदी निवडणुकीच्या तोंडावर आले. जनतेची पूर्ण खात्री पटली नव्हती. जनतेला राफेल समजण्या आधीच व त्यांची खात्री पाटण्याआधीच निवडणूक झाली. आता तरी राहुल गांधींनी पुरावे गोळा करून हा मुद्दा लावून धरला तर पुढील निवडणुकीत त्यांना फायदा मिळू शकतो. निवडणुकीत खंबीरपणे उभे आहात, जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी लढत आहात याचा विश्वास जनतेला द्यावा लागतो. पूर्वी हरलेल्या १६० जागांवर अमित शहा यांनी लक्ष केंद्रित केले. बारामतीत सुप्रियाला हरविणार असे वातावरण केले. अमेठीत राहुल गांधींना हरविणार असे वातावरण निर्माण केले. विरोधकांना मोदींच्या विरोधात वाराणसीत सक्षम उमेदवार देता आला नाही. २०१४ ला स्वत: अरविंद केजरीवाल मोदी यांच्या विरोधात उभे होते याला धाडस लागते. ते जनतेला भावते. लढा खरा आहे मनापासून आहे असा संदेश जातो. स्वत: मायावती-अखिलेश- प्रियांका यांनी मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढण्याचे सामर्थ्य दाखवायला हवे होते. येथे विरोधक अपयशी ठरलेत.प्रतिमा निर्मितीत सहभाग चॅनेल्सने ५ वर्षात मोदींची प्रतिमा जनमानसावर ठसविण्यात यश मिळविले आहे. सोशल मीडियामध्ये अनेक खोट्यानाट्या बाबी खास करून इतिहासातील पसरविण्यात भाजपाला यश मिळाले. कॉंग्रेसच्या मंडळींचा अभ्यास नाही, ती त्यांची वृत्ती नाही. सोशल मीडियामधील प्रचाराला कॉंग्रेसचे कार्यकर्ते उत्तर देवू शकले नाहीत. केवळ मोदी विरोध नको, सकारात्मकता हवी. राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली. योग्य भूमिका घेतल्या पण त्यांना सातत्य दाखवावे लागेल. विरोधकांचे राजकारण व सोशल मिडीयावरील विरोधकांचे राजकारण हे मोदी विरोधाचे होते. ते व्देषमूलक झाले. विरोधकांनी देशाच्या विकासाचा पर्यायी कार्यक्रम मांडावा. तो कार्यक्रम जनतेत न्यावा. तुम्ही मोदींना चांगला पर्याय देवू शकता असा विश्वास जनतेत निर्माण झाला पाहीजे.राफेल प्रकरण अगदी निवडणुकीच्या तोंडावर आले. जनतेची पूर्ण खात्री पटली नव्हती. जनतेला राफेल समजण्या आधीच व त्यांची खात्री पाटण्याआधीच निवडणूक झाली. आता तरी राहुल गांधींनी पुरावे गोळा करून हा मुद्दा लावून धरला तर पुढील निवडणुकीत त्यांना फायदा मिळू शकतो.

- शेखर सोनाळकर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Jalgaonजळगाव