शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

भाजपातील दुही ‘चलो गाव की ओर’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:18 IST

ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा

चंद्रशेखर जोशीग्रामीण क्षेत्रातील वडाचे पार हे राजकारणाचे अड्डे असतात. गावात कोणाच्या घरात काय झाले यापासून तर मोदींनी काय निर्णय घेतला... याबाबतच्या गप्पा या पारावर होत असतात. विशेष म्हणजे ही गप्पा मारणारी मंडळी एकाच पक्षाचा विचार घेऊन चालणारी असते काय तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. याचे कारण बहुतांश मंडळी एखाद्या पक्षाचा विचार किंवा निर्णय आवडला की त्या बाजुने बोलायला सुरूवात करते, आणि हळू हळू तो विचार पारावरच्या गप्पांवरून घरातील ओसरीपर्यंत पोहोचतो. घरातील बायाबापड्यांपर्यंत ती चर्चा पोहोचते. तरूण मुलांच्या गप्पांमध्येही या पक्षाने हा निर्णय घेतला तो चांगला होता...इथपर्यंत बोलणे सुरू असते. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा असल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद गटाबाबतचे निर्णय याच पारावर ठरतात. त्यामुळेच राजकीय पक्षाचा ओढा हा ग्रामीण भागाकडे सर्वाधिक असतो. विशेष म्हणजे मतदानाचे प्रमाणही ग्रामीण भागातून जास्त निघते त्यामुळे पुढारी मंडळी ग्रामीण भागातील लोकांना जास्त जपतात. आपल्या राजकारणावर ग्रामीण भागाचा नेमका काय परिणाम होतोय.. याचा विचार राजकीय पक्ष अगत्याने करत असतात. ग्रामीण भागातील लोकभावना नेमकी काय? हे लक्षात घेऊन भाजपाने पक्षाचा विस्तार केला व गेल्या काही वर्षातील निवडणुकांमध्ये या पक्षाला सातत्याने यश येत आहेत. मग ते अगती ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा, विधानसभा व सहकार संस्था, पालिका, महापालिका, नगरपंचायती ते जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपर्यंत या पक्षाने यश मिळविले आहे. मात्र गत काळाचे अवलोकन करता विविध ठिकाणी सत्तेत असताना या पक्षाला ही सत्ता पचविता येत नसल्याचेच लक्षात येत आहे. जिल्हा परिषदेच्या बैठकीतील वादावरून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. १२० कोटींचा विकास निधी मिळतो. तो वाटपावरून विरोधकांनी ओरड करणे ठिक आहे पण सत्ताधारीच जर गोंधळ घालत असतील तर... ते दुर्दैवच म्हणावे लागेल. सत्ताधाऱ्यांची एक परंपरा पूर्वी होती आणि आजही आहे, ती म्हणजे सत्ताधारी विकास निधी अगोदर आपापल्या मतदार संघांमध्ये वाटून उरलेला किरकोळ निधी विरोधकांना देतात. मात्र पक्षातील जिल्ह्याचे राजकारण जिल्हा परिषदेत आले आणि त्यातून निधी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला. सत्ताधाºयांच्या बंडामुळे जिल्हा परिषदेत विरोधक प्रबळ झाल्याची स्थिती आहे. भविष्यात याचे पडसादही उमटू शकतात. पक्षातील दुहीमुळे ‘चलो गाव की ओर’ हा नारा उलटा होत आहे की काय? अशी परिस्थिती या पक्षात दिसून येत आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव