शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भाजपातील दुही ‘चलो गाव की ओर’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:18 IST

ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा

चंद्रशेखर जोशीग्रामीण क्षेत्रातील वडाचे पार हे राजकारणाचे अड्डे असतात. गावात कोणाच्या घरात काय झाले यापासून तर मोदींनी काय निर्णय घेतला... याबाबतच्या गप्पा या पारावर होत असतात. विशेष म्हणजे ही गप्पा मारणारी मंडळी एकाच पक्षाचा विचार घेऊन चालणारी असते काय तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. याचे कारण बहुतांश मंडळी एखाद्या पक्षाचा विचार किंवा निर्णय आवडला की त्या बाजुने बोलायला सुरूवात करते, आणि हळू हळू तो विचार पारावरच्या गप्पांवरून घरातील ओसरीपर्यंत पोहोचतो. घरातील बायाबापड्यांपर्यंत ती चर्चा पोहोचते. तरूण मुलांच्या गप्पांमध्येही या पक्षाने हा निर्णय घेतला तो चांगला होता...इथपर्यंत बोलणे सुरू असते. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा असल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद गटाबाबतचे निर्णय याच पारावर ठरतात. त्यामुळेच राजकीय पक्षाचा ओढा हा ग्रामीण भागाकडे सर्वाधिक असतो. विशेष म्हणजे मतदानाचे प्रमाणही ग्रामीण भागातून जास्त निघते त्यामुळे पुढारी मंडळी ग्रामीण भागातील लोकांना जास्त जपतात. आपल्या राजकारणावर ग्रामीण भागाचा नेमका काय परिणाम होतोय.. याचा विचार राजकीय पक्ष अगत्याने करत असतात. ग्रामीण भागातील लोकभावना नेमकी काय? हे लक्षात घेऊन भाजपाने पक्षाचा विस्तार केला व गेल्या काही वर्षातील निवडणुकांमध्ये या पक्षाला सातत्याने यश येत आहेत. मग ते अगती ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा, विधानसभा व सहकार संस्था, पालिका, महापालिका, नगरपंचायती ते जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपर्यंत या पक्षाने यश मिळविले आहे. मात्र गत काळाचे अवलोकन करता विविध ठिकाणी सत्तेत असताना या पक्षाला ही सत्ता पचविता येत नसल्याचेच लक्षात येत आहे. जिल्हा परिषदेच्या बैठकीतील वादावरून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. १२० कोटींचा विकास निधी मिळतो. तो वाटपावरून विरोधकांनी ओरड करणे ठिक आहे पण सत्ताधारीच जर गोंधळ घालत असतील तर... ते दुर्दैवच म्हणावे लागेल. सत्ताधाऱ्यांची एक परंपरा पूर्वी होती आणि आजही आहे, ती म्हणजे सत्ताधारी विकास निधी अगोदर आपापल्या मतदार संघांमध्ये वाटून उरलेला किरकोळ निधी विरोधकांना देतात. मात्र पक्षातील जिल्ह्याचे राजकारण जिल्हा परिषदेत आले आणि त्यातून निधी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला. सत्ताधाºयांच्या बंडामुळे जिल्हा परिषदेत विरोधक प्रबळ झाल्याची स्थिती आहे. भविष्यात याचे पडसादही उमटू शकतात. पक्षातील दुहीमुळे ‘चलो गाव की ओर’ हा नारा उलटा होत आहे की काय? अशी परिस्थिती या पक्षात दिसून येत आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव