शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भाजप- शिवसेना युती माझ्यामुळेच झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:59 IST

गिरीश महाजनांनी थोपटली स्वत:चीच पाठ

ठळक मुद्दे कॉँग्रेस व राष्टÑवादीचे २५ जण वेटींगवर असल्याचा दावा

जळगाव : भाजपा व शिवसेनेची युती ही माझ्यामुळेच झाली असल्याचा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी शहरातील सागरपार्क मैदानावर झालेल्या युतीच्या मेळाव्यात केला. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात गिरीश महाजन यांच्यासाठी आपण युती केली असल्याचा खुलासा केला असल्याचे सांगत महाजनांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.भाजपा व शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली असून, ही आता देखील कायम आहे. पूर्वी ज्या प्रकारे शिवसेनेकडून शब्दांचे हल्ले चढवले जात होते. ते आता होत नाही. जसे युतीमध्ये वरच्या स्तरावर चांगले सुरु आहे. तसेच खालच्या पातळीवर देखील चांगले राहील, असे महाजन यावेळी म्हणाले. हल्ली मला ‘संकटमोचक’, ‘सुपरमॅन’ अशा शब्दांच्या बिरुदावल्या लावल्या जात असून, ‘गिरीश महाजन आहे. म्हणून सर्व काही ठिक होईल’ असे म्हटले जात आहे. मात्र, या अर्विभात राहू नका, कारण मी एकटा काहीही करू शकत नसून,आपण सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले.राज ठाकरेंच्या जिभेला हाड नाहीमहाजन यांनी राज ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल करत त्यांच्या जिभेला हाडच नसून, ते काहीही बडबड करत असल्याचा आरोप महाजनांनी केला. ज्यांचा पक्षाचा एकही नगरसेवक, आमदार निवडून येत नाही. ते राष्टÑीय सुरक्षेच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.विखेंच्या प्रवेशामुळे कॉँग्रेस दुभंगलीसुजय विखे पाटील यांनी राष्टÑवादीकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांनी ती उमेदवारी दिली नाही.त्यामुळे ही सुजय विखेला आपल्या पक्षात घेण्याची संधी मी सोडली नाही. कारण कॉँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा भाजपात येत असल्याने कॉँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होणार होती. त्यामुळेच विखेंना भाजपात आपण घेतले असल्याचा खुलासा महाजन यांनी केला. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे कॉँग्रेस आता दुभंगली असल्याचे ते म्हणाले.हीच बाब रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्याबाबतीतही घडली.आता कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसचे २५ जण भाजपात येण्यास उत्सुक असून, त्यांचा मार्ग देखील जळगावमधून जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या.आता या निवडणुकीत ४५ जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण