शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेंदुर्णी न.प.निवडणूक : भाजप विरोधकांना चपराक, मतदारांची विकासाला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:01 IST

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देशेंदुर्णीची निवडणूक विधानसभेची ट्रेलरशिवसेना व मनसेसाठी धक्कादायक निकालभाजपा विरोधात सर्व पक्ष अशी स्थिती तरीही विजय

मोहन सारस्वतजामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे.शेंदुर्णीच्या लढतीकडे विधानसभेची ट्रेलर म्हणुन पाहिले गेले. पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीत भाजप बहुमतात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेंदुर्णीतील मतदारांनी पंचायत समितीसाठी व जिल्हापरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडुन दिले होते. याची आठवण काही कार्यकर्ते यावेळी करुन देतात. यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर शहरातील मतदारांचा बदललेला कौल निर्णायक मानावा लागेल.भाजपच्या नेतृत्वाखालील ग्रा.पं.च्या कारभारातील उणे दुणे विरोधकांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांसमोर ठेवली. झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला. भाजपने देखील त्याला जशास तसे उत्तर देऊन आपली बाजू मांडली. या आरोप प्रत्यारोपात मतदारांनी मात्र आपला कौल भाजपला दिल्याने त्यांचा विकासावर व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.भाजपकडुन पैशांचा मोठा वापर झाला व पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचे विरोधक म्हणतात, यात सत्य किती व असत्य किती हा वादाचा व संशोधनाचा विषय आहे. लोकशाही मार्गाने मतदारांनी दिलेला कौल सर्वांनीच मान्य केला पाहिजे.या निवडणुकीत प्रथमच शिवसेना व मनसे स्वबळावर लढल्याने त्यांचे पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहचले. निवडणुकीतील जय, पराजय हे पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याने पराभवाची चिंता न करता नव्या उमेदीने वाटचाल करण्याचा संदेश मतदारांनी त्यांना दिला आहे. शिवसेनेची आक्रमकता व आमदार किशोर पाटील यांची मंत्री महाजन विरोधी भूमिका शेंदुर्णीच्या माध्यमातुन समोर आली.भाजपने शेंदुर्णीकरांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्याची जबाबदारी पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजया खलसे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची आहे. पाणी, आरोग्य या मुलभुत सुविधा मतदारांना पाहिजे, त्या पुरविण्याची हमी भाजपने घ्यावी.नगरपंचायतीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीच्या चार नगरसेवकांना जागल्याची भुमीका घ्यावी लागेल. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवुन विकास कामे करवून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. निवडणुक प्रचारातील कटुता विसरुन शहरासाठी एकत्रित काम करण्याची संधी मिळाली असल्याने त्याचे सोने करावे अशी नागरीकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJamnerजामनेरGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाShiv Senaशिवसेना