शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

जन्मकथा एका नाटकाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 13:55 IST

आज मराठी नाटकाला महाराष्ट्रातला प्रेक्षक पारखा झाला आहे. गावोगावी नाटय़गृहे आहेत खरी; पण ती नाटकावाचून सुनी आहेत.

 आज  मराठी नाटकाला  महाराष्ट्रातला प्रेक्षक पारखा झाला आहे. गावोगावी नाटय़गृहे आहेत खरी; पण ती नाटकावाचून सुनी आहेत. पूर्वी मुंबई पुण्याकडच्या नाटक कंपन्या नाटकाचे दौरे काढून महाराष्ट्र पिंजून काढत असत. गावोगावी नाटक होत असे. सोबत स्थानिक हौशी नाटय़ कलावंत आपापली कला सादर करीत असत. एकूणच उत्साहाचे वातावरण होते. जितके नाटकाचे प्रयोग मुंबई-पुण्यात व्हायचे तितकेच किंबहुना जास्तच बाहेर व्हायचे. कालांतराने हा उत्साह  मावळला. दूरचित्रवाणी, मोबाइल, संगणक या अनेकांनी मानवी जीवनावर आक्रमण केले आणि जगण्याची, करमणुकीची परिमाणं बदलली. माणूस आत्ममगA व्हायला लागला. त्याला समाजाची गरज भासेनाशी झाली. त्याचं एकटेपण हे राहिलं नाही. हातातल्या मोबाइलमध्ये तो रममाण झाला. त्याला नाटय़गृहात जावून नाटक पहाण्याची गरज उरली नाही. वेळ आणि पैसा दोन्हीची तो बचत करू लागला म्हणाना! याने झालं काय की नाटक अस्ताला जाते की काय असे भय निर्माण झाले. आजही मराठी नाटकाची स्थिती ही जवळपास अशीच आहे. 

राज्य शासनाने सुरू केलेल्या नाटकांना जे काही अनुदान मिळते ते जणू मरणासन्न रुग्णाला सलाईन लावून जिवंत ठेवावे अशीच अवस्था आहे आणि हे येवढे सारे असूनही मराठी नाटकाचे  निर्माते  मात्र स्वत:च्याच  विश्वात गर्क  आहेत. मिळणा:या फक्त शनिवार आणि रविवारच्या बूकींगमधे आणि अनुदानाच्या  भिक्षेत ते समाधानी आहेत. अर्थात त्यांचेही काही चुकत नाही. एक तर त्याना दूरचित्रवाणीशी फाईट द्यायची आहे . त्यातून प्रेक्षकांना म्हणे नाटकात सेलेब्रिटीच लागतो. त्यामुळे असा सेलेब्रिटी जर नाटकात घ्यायचा म्हणजे त्याच्या तारखा, त्याचं मानधन आणि बाकी अनेक मुद्यावर त्याला तडजोड करावी लागते. वाहतूक खर्च परवडत नाही. नटांच्या नाईटस् परवडत नाही, होणारे खर्च व मिळणारे बुकिंग याचे प्रमाण व्यस्त आहे. मग कशाला तो मुंबईबाहेरच्या प्रेक्षकांचा  विचार तो करत बसेल?
या सा:याच मुद्यांवर विचार करताना एक बाब ठळकपणे समोर आली ती म्हणजे आज मुंबई पुणेवगळता संपूर्ण महाराष्ट्र हा नाटकाविना उपाशी आहे. त्याला नाटक तर पहायचे आहे पण नाटक नाही अशी स्थिती आहे. मग काय करता येईल याचा विचार सुरू  झाला. परिस्थिती तर आटोक्यात नाही पण नाटक तर झाले पाहिजे. नाटक होत नाही कारण ते आर्थिकदृष्टय़ा ते परवडत नाही. मग ते परवडेल कसे याच्याविषयी मंथन सुरू झाले. सगळ्यात मोठा खर्च येतो तो म्हणजे वाहतुकीचा खर्च. या खर्चात मोठा वाटा हा नाटकाच्या नेपथ्याच्या, सामानाच्या वाहतुकीचा असतो आणि मग त्यानंतर होणारी कलावंतांची वाहतूक.
 पहिला विचार केला आणि निर्णयाप्रत आलो ते हे की नाटकाचा खर्च कमी करताना पहिला भर द्यायचा तो वाहतूक खर्चावर. हा खर्च कमी करण्यासाठी नाटकाचे नेपथ्यच जर गौण ठरवले तर? म्हणजे नेपथ्याशिवाय नाटक केले तर? नेपथ्याशिवाय केलेल्या तरीपण  गाजलेल्या नाटकांचा संदर्भ लक्षात घेता  हे शक्य होते. गाढवाचं लगA, विच्छा माझी पुरी करा, व:हाड निघालंय लंडनला (एकपात्री प्रयोग ). हे काही रंगमंचावर सादर होताना नेपथ्याविनाच होत असून, प्रचंड लोकप्रिय झालेले होते. मग हाच फॉम्यरुला आपण वापरला तर? नाटक करायचे ते विना नेपथ्याचे. ज्या नाटकाला कोणताही  विशिष्ठ रंगमंच लागणार नाही. - हेमंत कुलकर्णी