शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'वेदांता' सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे योग्य नाही, अजित पवारांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:51 IST

Ajit Pawar : पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

- जिजाबराव वाघ

चाळीसगाव : देशात  बेरोजगारीचा प्रश्न जटील झाला आहे, अशा स्थितीत ३ लाख तरुणांना रोजगाराची संधी असणारा 'वेदांता' सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे योग्य नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा. यासाठी मुख्यंत्र्यांनी प्रयत्न करावेत. उगाच पळवाटा शोधून गाजर दाखवू नये. असा घणाघात गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केला.

पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच, अजित पवार यांनी बाजार समितीला भेट देऊन तेथील अशासकीय प्रशासक मंडळाचे कामकाज जाणून घेतले.

अजित पवार पुढे म्हणाले की, मविआचे सरकार असतांना वेदांता प्रकल्प राज्यात व्हावा. यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. सवलतींही दिल्या होत्या. तळेगाव येथे देखील निश्चित झाली होती. मात्र हा प्रकल्प इतर राज्यात गेला आहे. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांचे केंद्रात चांगले संबंध आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा. दुसरा प्रकल्प येईल. अशा पळवाटा दाखवण्यासह गाजरही दाखवू नये.

यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेंचे संचालक प्रदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील,  जि.प.चे माजी सदस्य शशिकांत साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे प्रशासक दिनेश पाटील, भगवान पाटील, अतुल देशमुख, चाळीसगाव विकासोचे चेअरमन प्रदीप देवराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रविण राजपुत, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार