शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

भुसावळला बाराशे रिक्षाची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 9:28 PM

दररोजची सहा लाखाची उलाढाल ठप्प । रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

वासेफ पटेल।भुसावळ : जंक्शनच्या ठिकाणी शहराच्या मध्यभागापासून कानाकोपऱ्यापर्यंत तब्बल बाराशे रिक्षा चालतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे रिक्षाची चाकं थांबली आहेत. यामुळे शहरातील दररोजची तब्बल सहा लाखाची उलाढाल ठप्प झाल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.जिल्हा निर्मितीकडे वाटचाल सुरू असलेल्या महत्त्वाच्या जंक्शन ठिकाणी ३० पेक्षा जास्त रिक्षा स्टॉप च्या माध्यमातून दररोज बाराशे पेक्षा जास्त रिक्षाचालक संपूर्ण शहराच्या कानाकोपºया पर्यंत शहरवासियांना सेवा देऊन आपला उदरनिर्वाह भागवतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने रिक्षाचालकांवर पयार्यी काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.शहरात रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजचे तसेच बसस्थानक समोरील रिक्षाचे मुख्य थांबे आहेत. या ठिकाणाहून प्रवाशांना साधारण शहराच्या आठ ते दहा किलोमीटर पर्यंत सेवा देण्यासाठी प्रतिसिट १५ ते २० रुपये प्रमाणे भाडे आकारले जाते.दिवसभरातून एक रिक्षा चालक जवळपास ५०० रुपयांपर्यंतची कमाई करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो याच पैशातून रिक्षाचा मेंटेनन्स सुद्धा करत असतो.शासनाने रिक्षा चालकांकडे गाभिर्याने लक्ष द्यावे व त्यांना पर्यायी कामाची व्यवस्था करून द्यावी किंबहुना शासनाच्या अत्यावशक सेवेसाठी रिक्षाचालकांना तरी संधी द्यायला हवी.- दिलीप कोळी, अध्यक्ष, सेन्ट अलाँयसेस स्कूल चालक-मालक परिवहन समिती, भुसावळ.