शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात पिकांची नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:57 IST

भुसावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री व तहसीलदारांना निवेदन सादरपिकांना फुटले कोंब

भुसावळ : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, महसूल यंत्रणेमार्फत सरसकट पंचनामे करून तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे.तालुक्यात मागील सहा सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका , तळवेल, पिंपळगाव खुर्द, दर्यापूर, सुनसगाव, वांजोळा जोगलखेडा, पिंपळगाव बुद्रूक, वेल्हाळा, सुसरी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद, मूग,तुर,कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. जोरदार पावसामुळे किन्ही, सुनसगाव, वांजोळा, जोगलखेडा, खडका या ठिकाणी संततधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहे. या पावसामुळे मूग,उडीद, भुईमूग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगांना झाडावरच कों फुटले असून, ते पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच कोरोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याहीवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली.सलग सहा सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे, अशीही विनंती त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :RainपाऊसBhusawalभुसावळ