शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

भुसावळ तालुक्यात पिकांची नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:57 IST

भुसावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री व तहसीलदारांना निवेदन सादरपिकांना फुटले कोंब

भुसावळ : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, महसूल यंत्रणेमार्फत सरसकट पंचनामे करून तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे.तालुक्यात मागील सहा सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका , तळवेल, पिंपळगाव खुर्द, दर्यापूर, सुनसगाव, वांजोळा जोगलखेडा, पिंपळगाव बुद्रूक, वेल्हाळा, सुसरी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद, मूग,तुर,कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. जोरदार पावसामुळे किन्ही, सुनसगाव, वांजोळा, जोगलखेडा, खडका या ठिकाणी संततधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहे. या पावसामुळे मूग,उडीद, भुईमूग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगांना झाडावरच कों फुटले असून, ते पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच कोरोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याहीवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली.सलग सहा सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे, अशीही विनंती त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :RainपाऊसBhusawalभुसावळ