शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांची फटकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST

ओबीसी आरक्षणासाठी जे येथे जमले आहेत. त्यांनी सावध राहावे, जास्त विरोध केला, तर तुमच्यामागे आयकर विभाग लागेल. जे घाबरतील ...

ओबीसी आरक्षणासाठी जे येथे जमले आहेत. त्यांनी सावध राहावे, जास्त विरोध केला, तर तुमच्यामागे आयकर विभाग लागेल. जे घाबरतील त्यांनी थेट भाजपमध्ये जावे. म्हटले एकदम स्वच्छ व्हाल, असा टोला मारून भुजबळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी गुलाबराव पाटील हे कॅबिनेट बैठकीत ओबीसींच्या प्रश्नांवर कायमच सहकार्य करत असतात, असे सांगितले, तर तुरुंगात असताना आमदार कपिल पाटील यांच्यामुळे जीव वाचला, असेही भुजबळ म्हणाले.

खासगीतही आरक्षण द्या -भुजबळ

सध्या देशात दोन जण विकत आहेत आणि दोन जण विकत घेत आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. केंद्र सरकारविरोधात २००६ मध्ये आंदोलन केले. त्यावेळी आयआयटी आणि आयआयएमसारख्या केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली होती. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंह यांनी यात लक्ष घातले आणि आरक्षण मिळाले होते. २०१७ मध्ये अचानक आरक्षण काढून टाकण्यात आले. नंतर पुन्हा निवडणुका जवळ आल्यावर आरक्षण देण्यात आले. या मधल्या काळात जे नुकसान झाले. त्याची भरपाई कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सारे काही आरक्षण संपवण्यासाठी -भुजबळ

परिषद संपल्यावर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ओबीसींची जनगणना करण्यास केंद्राने नकार दिला आहे, तसेच इम्पेरिकल डेटादेखील दिला जात नाही. आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या जातात. हा सर्व प्रकार आरक्षण संपवण्यासाठी आहे. आरक्षण हे घटनेने दिले असून, त्यासाठी सर्व ओबीसींनी एकत्र यायला हवे. लढाई द्यायला हवी. लोकशाहीत लढाई देण्याचे काही टप्पे असतात. त्यात पहिला टप्पा हा जनजागृतीचा असतो. त्यासाठीच ही परिषद आहे.’

परिषदेत मांडलेले ठराव

- १९३१ नंतर जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे २०२१ आणि त्यानंतरच्या सर्व जनगणना या जातीनिहाय करण्यात यातव्या.

- केंद्राने रोहिणी आयोगाला जो इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून दिला आहे. तोच डेटा राज्य सरकारला द्यावा, तसेच सर्वोच्च न्यायालयात सादर करावा.

- घटनेच्या १६ व्या कलमात समान संधीचा हक्क व आरक्षणाची तरतूद आहे. त्यामुळे कुठलाही कायदेशीर आधार नसलेली ५० टक्के आरक्षणाची अट रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात यावी.

- ओबीसींना नोकरी आणि शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी क्रिमिलेअरची वार्षिक मर्यादा ठरवली आहे. ही अट रद्द करण्यात यावी.

- पूर्णपणे खासगी असलेल्या कंपन्या, कारखाने आणि संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद केली जावी आणि त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी.

- सायन्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातदेखील आरक्षण दिले गेले पाहिजे. त्यानुसार सर्व खासगी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद लागू करण्यात यावी.

- सध्याच्या तरतुदीनुसार एससी, एसटींना पदोन्नतीत आरक्षण आहे. ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे.

- जिल्ह्यातील ५४ ओबीसी जाती आणि मुस्लीम समाजातील १३ जमातींची एकजूट उभारत ‘आम्ही सर्व ओबीसी’ हीच आमची ओळख, असा निर्धार करत आहोत. या जिल्ह्यात ओबीसी हक्क समन्वय समिती या मंचाची निर्मिती करत आहोत. रक्षणासाठी ही समिती संवैधानिक मार्गाने राज्यभरात आंदोलन करेल.