शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

भुजबळ यांची फटकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST

ओबीसी आरक्षणासाठी जे येथे जमले आहेत. त्यांनी सावध राहावे, जास्त विरोध केला, तर तुमच्यामागे आयकर विभाग लागेल. जे घाबरतील ...

ओबीसी आरक्षणासाठी जे येथे जमले आहेत. त्यांनी सावध राहावे, जास्त विरोध केला, तर तुमच्यामागे आयकर विभाग लागेल. जे घाबरतील त्यांनी थेट भाजपमध्ये जावे. म्हटले एकदम स्वच्छ व्हाल, असा टोला मारून भुजबळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी गुलाबराव पाटील हे कॅबिनेट बैठकीत ओबीसींच्या प्रश्नांवर कायमच सहकार्य करत असतात, असे सांगितले, तर तुरुंगात असताना आमदार कपिल पाटील यांच्यामुळे जीव वाचला, असेही भुजबळ म्हणाले.

खासगीतही आरक्षण द्या -भुजबळ

सध्या देशात दोन जण विकत आहेत आणि दोन जण विकत घेत आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. केंद्र सरकारविरोधात २००६ मध्ये आंदोलन केले. त्यावेळी आयआयटी आणि आयआयएमसारख्या केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली होती. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंह यांनी यात लक्ष घातले आणि आरक्षण मिळाले होते. २०१७ मध्ये अचानक आरक्षण काढून टाकण्यात आले. नंतर पुन्हा निवडणुका जवळ आल्यावर आरक्षण देण्यात आले. या मधल्या काळात जे नुकसान झाले. त्याची भरपाई कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सारे काही आरक्षण संपवण्यासाठी -भुजबळ

परिषद संपल्यावर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ओबीसींची जनगणना करण्यास केंद्राने नकार दिला आहे, तसेच इम्पेरिकल डेटादेखील दिला जात नाही. आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या जातात. हा सर्व प्रकार आरक्षण संपवण्यासाठी आहे. आरक्षण हे घटनेने दिले असून, त्यासाठी सर्व ओबीसींनी एकत्र यायला हवे. लढाई द्यायला हवी. लोकशाहीत लढाई देण्याचे काही टप्पे असतात. त्यात पहिला टप्पा हा जनजागृतीचा असतो. त्यासाठीच ही परिषद आहे.’

परिषदेत मांडलेले ठराव

- १९३१ नंतर जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे २०२१ आणि त्यानंतरच्या सर्व जनगणना या जातीनिहाय करण्यात यातव्या.

- केंद्राने रोहिणी आयोगाला जो इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून दिला आहे. तोच डेटा राज्य सरकारला द्यावा, तसेच सर्वोच्च न्यायालयात सादर करावा.

- घटनेच्या १६ व्या कलमात समान संधीचा हक्क व आरक्षणाची तरतूद आहे. त्यामुळे कुठलाही कायदेशीर आधार नसलेली ५० टक्के आरक्षणाची अट रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात यावी.

- ओबीसींना नोकरी आणि शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी क्रिमिलेअरची वार्षिक मर्यादा ठरवली आहे. ही अट रद्द करण्यात यावी.

- पूर्णपणे खासगी असलेल्या कंपन्या, कारखाने आणि संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद केली जावी आणि त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी.

- सायन्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातदेखील आरक्षण दिले गेले पाहिजे. त्यानुसार सर्व खासगी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद लागू करण्यात यावी.

- सध्याच्या तरतुदीनुसार एससी, एसटींना पदोन्नतीत आरक्षण आहे. ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे.

- जिल्ह्यातील ५४ ओबीसी जाती आणि मुस्लीम समाजातील १३ जमातींची एकजूट उभारत ‘आम्ही सर्व ओबीसी’ हीच आमची ओळख, असा निर्धार करत आहोत. या जिल्ह्यात ओबीसी हक्क समन्वय समिती या मंचाची निर्मिती करत आहोत. रक्षणासाठी ही समिती संवैधानिक मार्गाने राज्यभरात आंदोलन करेल.