शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘भावांतर’ने धान्य उत्पादकांना भरपाई, ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:15 IST

मध्यप्रदेशातील वाढीव हमी भावामुळे भाव वाढण्याची शक्यता

ठळक मुद्देजळगाव धान्य बाजारतही जाणवणार परिणामपावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - धान्य तसेच कडधान्यास सरकारकडून जाहीर झालेला हमी भाव खरेदीदारांनी न दिल्यास त्यामध्ये असलेल्या फरकाची रक्कम आता सरकारच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मध्यप्रदेश सरकारने ‘भावांतर’ नावाची ही योजना सुरू केली असून यंदा जादा हमी भावदेखील जाहीर केल्याने गव्हाचे भाव वाढून त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही होणार असल्याचे संकेत व्यापा-यांनी दिले आहे. या योजनेमुळे धान्य उत्पादक शेतक-यांना दिलासा तर मिळणार आहे, मात्र ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.कृषी पिकासाठी सरकार हमी भाव जाहीर करते, मात्र प्रत्यक्षात शेतकºयास जाहीर झालेला भाव मिळत नसल्याचे बºयाच वेळा दिसून येते. त्यामुळे शेतकरी हमी भावापासून वंचित राहत असतो. यासाठी मध्यप्रदेश सरकारने धान्यासाठी ‘भावांतर’ योजना सुरू करून शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.शेतक-यांच्या खात्यात होणार फरक जमागव्हाचे मोठे उत्पादन व जळगाव जिल्ह्यातही गव्हाचा पुरवठा करणाºया मध्यप्रदेशात सरकार गव्हाला दोन हजार रुपये हमी भाव देत आहे. हा भाव जाहीर झाल्यानंतर शेतकºयांनी त्यांचा माल विक्रीसाठी नेला असता तेथे गव्हाला दोन हजार रुपये भाव न मिळता केवळ १८०० रुपयेच भाव दिला तर यातील २०० रुपयांची फरकाची रक्कम सरकार संबंधित शेतकºयाच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र यासाठी ज्या भावात माल विकला त्यांची पावती व सातबारा उतारा शेतकºयांस सादर करावा लागणार आहे. हमी भावापेक्षा जास्त भावाने विक्री झाली तर त्यावर सरकारचा काहीच आक्षेप राहणार नाही, हे विशेष.जळगाव जिल्ह्यात परिणाममहाराष्ट्रात गव्हाला प्रति क्विंटल १७३५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने जळगाव जिल्ह्यात बहुतांश गहू हा मध्यप्रदेशातून येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेशातील या योजनेचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश सरकार हमी भावच दोन हजार रुपये देत असल्याने व्यापारी त्या भावात खरेदी करतील तर साहजिकच किरकोळ बाजारात यंदा गव्हाचे भाव वाढण्याचे संकेत दिले जात आहे. सध्या जळगावच्या बाजारात जुन्या गव्हाचे भाव २००० ते २१०० रुपये आहेत, मात्र आता मध्यप्रदेशातील नवीन मालाची आवक वाढल्यानंतर यामध्ये वाढ होणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.....तर शेतक-यांना पावत्या मिळणार नाहीगव्हाचा दर्जा, बाजारात असलेले कमी भाव यामुळे व्यापाºयांना हमी भावात गव्हाची खरेदी करणे परवडणार नसल्याने ते त्या भावात माल घेणार नाही. तसेच हमी भावापेक्षा कमी भावात माल खरेदी केला तर कारवाईची भीती राहणार किंवा कमी भावात माल घेतला तरी त्याच्या पावत्या व्यापारी शेतकºयांना देणार नाही, अशीही शक्यता या योजनेमुळे आहे. परिणामी पावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही, असे जानकारांनी सांगितले.जळगावच्या बाजारपेठेत मध्यप्रदेशातून गव्हाची जास्त आवक असते. तेथे हमी भाव वाढवून देण्यासह ‘भावांतर’ योजना सुरू केल्याने त्याचा परिणाम होऊन गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन

टॅग्स :JalgaonजळगावMarket Yardमार्केट यार्ड