शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

‘भावांतर’ने धान्य उत्पादकांना भरपाई, ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:15 IST

मध्यप्रदेशातील वाढीव हमी भावामुळे भाव वाढण्याची शक्यता

ठळक मुद्देजळगाव धान्य बाजारतही जाणवणार परिणामपावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - धान्य तसेच कडधान्यास सरकारकडून जाहीर झालेला हमी भाव खरेदीदारांनी न दिल्यास त्यामध्ये असलेल्या फरकाची रक्कम आता सरकारच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मध्यप्रदेश सरकारने ‘भावांतर’ नावाची ही योजना सुरू केली असून यंदा जादा हमी भावदेखील जाहीर केल्याने गव्हाचे भाव वाढून त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही होणार असल्याचे संकेत व्यापा-यांनी दिले आहे. या योजनेमुळे धान्य उत्पादक शेतक-यांना दिलासा तर मिळणार आहे, मात्र ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.कृषी पिकासाठी सरकार हमी भाव जाहीर करते, मात्र प्रत्यक्षात शेतकºयास जाहीर झालेला भाव मिळत नसल्याचे बºयाच वेळा दिसून येते. त्यामुळे शेतकरी हमी भावापासून वंचित राहत असतो. यासाठी मध्यप्रदेश सरकारने धान्यासाठी ‘भावांतर’ योजना सुरू करून शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.शेतक-यांच्या खात्यात होणार फरक जमागव्हाचे मोठे उत्पादन व जळगाव जिल्ह्यातही गव्हाचा पुरवठा करणाºया मध्यप्रदेशात सरकार गव्हाला दोन हजार रुपये हमी भाव देत आहे. हा भाव जाहीर झाल्यानंतर शेतकºयांनी त्यांचा माल विक्रीसाठी नेला असता तेथे गव्हाला दोन हजार रुपये भाव न मिळता केवळ १८०० रुपयेच भाव दिला तर यातील २०० रुपयांची फरकाची रक्कम सरकार संबंधित शेतकºयाच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र यासाठी ज्या भावात माल विकला त्यांची पावती व सातबारा उतारा शेतकºयांस सादर करावा लागणार आहे. हमी भावापेक्षा जास्त भावाने विक्री झाली तर त्यावर सरकारचा काहीच आक्षेप राहणार नाही, हे विशेष.जळगाव जिल्ह्यात परिणाममहाराष्ट्रात गव्हाला प्रति क्विंटल १७३५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने जळगाव जिल्ह्यात बहुतांश गहू हा मध्यप्रदेशातून येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेशातील या योजनेचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश सरकार हमी भावच दोन हजार रुपये देत असल्याने व्यापारी त्या भावात खरेदी करतील तर साहजिकच किरकोळ बाजारात यंदा गव्हाचे भाव वाढण्याचे संकेत दिले जात आहे. सध्या जळगावच्या बाजारात जुन्या गव्हाचे भाव २००० ते २१०० रुपये आहेत, मात्र आता मध्यप्रदेशातील नवीन मालाची आवक वाढल्यानंतर यामध्ये वाढ होणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.....तर शेतक-यांना पावत्या मिळणार नाहीगव्हाचा दर्जा, बाजारात असलेले कमी भाव यामुळे व्यापाºयांना हमी भावात गव्हाची खरेदी करणे परवडणार नसल्याने ते त्या भावात माल घेणार नाही. तसेच हमी भावापेक्षा कमी भावात माल खरेदी केला तर कारवाईची भीती राहणार किंवा कमी भावात माल घेतला तरी त्याच्या पावत्या व्यापारी शेतकºयांना देणार नाही, अशीही शक्यता या योजनेमुळे आहे. परिणामी पावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही, असे जानकारांनी सांगितले.जळगावच्या बाजारपेठेत मध्यप्रदेशातून गव्हाची जास्त आवक असते. तेथे हमी भाव वाढवून देण्यासह ‘भावांतर’ योजना सुरू केल्याने त्याचा परिणाम होऊन गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन

टॅग्स :JalgaonजळगावMarket Yardमार्केट यार्ड