शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:18 IST

भगवान विष्णूंची हजारे नावे आहेत. त्यात सर्वात सोपे व श्रेष्ठ रामनाम आहे. रामरक्षामध्ये शेवटचा श्लोक सांगतो की विष्णूंची सहस्र ...

भगवान विष्णूंची हजारे नावे आहेत. त्यात सर्वात सोपे व श्रेष्ठ रामनाम आहे. रामरक्षामध्ये शेवटचा श्लोक सांगतो की विष्णूंची सहस्र नामे एका बाजूस व रामनाम एका बाजूस आहे. किंमत सारखीच! ज्याप्रमाणे एक रुपयाच्या हजार नोटा व एक हजाराची एकच नोट किंमत समान होते तसे ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे.. सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानने’ भगवान श्रीकृष्ण स्वत: भगवद्गीतेत म्हणतात हा संसार दु:खालय आहेत. अशाश्वत व अस्थिर आहे म्हणून या दु:खालय संसारात सुख कसे मिळेल संतांच्या भाषेत बोलायचे झाले तर असे ‘संसार दु:खमूळ चहूकडे इंगळे। विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळा।’ हा संसार दु:खाला कारणीभूत आहे. संसारात सुख शोधत आहात तर या दु:खरूपी संसारात सुख कसे मिळणार. आता दु:खाचे काही प्रकार आहेत ‘कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडेथोडे सबदुखी, सुखी शाम के दास’ या जगात फक्त ज्याने भगवंताचे नामजप आपल्या मुखात घेतले आहेत तोच नशीबान जगात आहे. दु:खरुपी संसारात सुखी आहे. एक संत संसारात सुख कसे मिळेल ते आपल्या मस्तीत सांगायचेआराम की तलब है तो बस एक काम कर, आ राम की शरण में और राम राम करयही आराम पानेका एक उपाय आहे. या दु:खरुपी संसारात सुख प्राप्त करण्याचा एकच उपाय आहे. रामनाम हेच खरे मनुष्य जीवनाचे सार. हे भगवान श्रीरामाला प्राप्त करणे हीच जीवनाची सार्थकता आहे. यामध्ये मनुष्याचे कल्याण आहे राम हेच मनुष्य जीवनाचे परम लक्ष आहे. कारण राम नावामध्ये खूप ताकद आहे. आपण जर राम नाम घेतले तर राम स्वत: पद देऊन आपल्यासारखे करतो.‘राम म्हणता रामची होईजे। पदी बसून पदवी घेईजे। म्हणून मनुष्य जीवनाचे सार राम आहे. यात सुख व कल्याण आहे. आपला तो एक देव करुनी घ्यावा तेणे विण जिवा सुख नव्हे आपल्या जीवनात सुख प्राप्त करावा असे वाटत असेल किंवा शेवट गोड व्हावा, असं वाटत असेल तर राम राम म्हणा.-सुनील महाराज शास्त्री,नशिराबाद

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव