शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

कोरोनाने अनाथ झालेल्या ६२ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने एक पालक गमावलेले ४०३ बालक आहेत. तर १३ जणांनी कोविडमुळे दोन्ही पालकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने एक पालक गमावलेले ४०३ बालक आहेत. तर १३ जणांनी कोविडमुळे दोन्ही पालकांना गमावले आहे. त्यातील ६२ बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच १८४ महिला विधवा झाल्याची माहितीदेखील महिला आणि बालकल्याण विभागाला प्राप्त झाली आहे. या बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठक घेतली; तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या बालकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत.

या बैठकीस जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. के. शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, आरिफ शेख, वैजयंती तळेले, योगेश मुकावार, भानुदास येवलेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की,‘ पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा ११०० रुपये शासनामार्फत बाल संगोपन योजनेद्वारे देण्यात येतात. या योजनेचा लाभ पात्र बालकांना तातडीने मिळाला पाहिजे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यासोबतच बालकांचे वारसा हक्क अबाधित राहतील, त्यांना आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

- दोन्ही पालक गमावलेली बालके - १३

- एक पालक गमावलेली बालके ४०३

- विधवा झालेल्या महिला १८४