शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

बारामती पालिका जिंकण्याबाबत मागे हटणार नाही : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:19 IST

अजित पवार यांचे वक्तव्य बालीशपणाचे

जामनेर, जि.जळगाव : जळगाव, धुळे महानगरपालिकेत भाजपला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले असून अहमदनगरची सत्ता भाजपकडे आहे. कामाच्या जोरावर भाजपची सर्वत्र विजयी आगेकूच सुरु आहे. बारामती पालिका जिंकण्याचे ध्येय आहेच, त्यात गैर काहीही नाही. पक्षाने आदेश दिल्यास मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी जामनेरात मांडली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत सहभागी नेत्यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर चौफेर टीका केली. महाजन यांनी बारामती पालिके संदर्भात केलेल्या विधानाबाबतदेखील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी टीका केली होती.जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येणार नाहीराष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी सांगितले की, मतदारांमध्ये राष्ट्रवादीला जनाधार राहिला नसल्याने या पक्षाचे नेते बिनबुडाचे आरोप करीत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बालीश आरोप करावे, याचेच आश्चर्य वाटते, अशी टिप्पणीही महाजन यांनी केली. ते पुढे म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षांची स्थिती वाईट असून मतदारांमध्ये त्यांना विश्वासार्हता राहिलेली नाही. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. सरकारवर खोटे आरोप करुन मतदान मिळत नसते, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असेही आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले.मतपत्रिकेद्वारेही मतदार विरोधकांना नाकारल्याशिवाय राहणार नाहीइव्हीएमबद्दल बालीश आरोप पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावे याचेच आश्चर्य वाटते. इतरांच्या आरोपांची दखल घेण्याइतपत ते मोठे नाही. कोणत्याही निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घ्या, मतदार तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.चुकीची माहिती देऊन दिशाभूल करु नकाजामनेर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल विरोधक करीत आहेत. यंदा कमी झालेल्या पावसामुळे टंचाई जाणवेल, मात्र सद्यस्थितीत तालुक्यात एकही टँकर सुरु नसताना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिशाभूल करणारे विधान विरोधक करीत असल्याने त्यांच्यावर मतदारांचा विश्वास नसल्याचेही महाजन म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव