शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

बारामती पालिका जिंकण्याबाबत मागे हटणार नाही : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:19 IST

अजित पवार यांचे वक्तव्य बालीशपणाचे

जामनेर, जि.जळगाव : जळगाव, धुळे महानगरपालिकेत भाजपला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले असून अहमदनगरची सत्ता भाजपकडे आहे. कामाच्या जोरावर भाजपची सर्वत्र विजयी आगेकूच सुरु आहे. बारामती पालिका जिंकण्याचे ध्येय आहेच, त्यात गैर काहीही नाही. पक्षाने आदेश दिल्यास मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी जामनेरात मांडली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत सहभागी नेत्यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर चौफेर टीका केली. महाजन यांनी बारामती पालिके संदर्भात केलेल्या विधानाबाबतदेखील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी टीका केली होती.जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येणार नाहीराष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी सांगितले की, मतदारांमध्ये राष्ट्रवादीला जनाधार राहिला नसल्याने या पक्षाचे नेते बिनबुडाचे आरोप करीत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बालीश आरोप करावे, याचेच आश्चर्य वाटते, अशी टिप्पणीही महाजन यांनी केली. ते पुढे म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षांची स्थिती वाईट असून मतदारांमध्ये त्यांना विश्वासार्हता राहिलेली नाही. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. सरकारवर खोटे आरोप करुन मतदान मिळत नसते, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असेही आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले.मतपत्रिकेद्वारेही मतदार विरोधकांना नाकारल्याशिवाय राहणार नाहीइव्हीएमबद्दल बालीश आरोप पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावे याचेच आश्चर्य वाटते. इतरांच्या आरोपांची दखल घेण्याइतपत ते मोठे नाही. कोणत्याही निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घ्या, मतदार तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.चुकीची माहिती देऊन दिशाभूल करु नकाजामनेर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल विरोधक करीत आहेत. यंदा कमी झालेल्या पावसामुळे टंचाई जाणवेल, मात्र सद्यस्थितीत तालुक्यात एकही टँकर सुरु नसताना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिशाभूल करणारे विधान विरोधक करीत असल्याने त्यांच्यावर मतदारांचा विश्वास नसल्याचेही महाजन म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव