शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

बँकांनाच नकोय जिल्ह्यात रोजगार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर नव्या रोजगारांच्या निर्मिती गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. शासनाने मोठे प्रकल्प जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर नव्या रोजगारांच्या निर्मिती गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. शासनाने मोठे प्रकल्प जिल्ह्यात द्यावे, अशी अपेक्षा असतानाच स्थानिक तरुणांकडून केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेत प्रस्ताव दाखल करून उद्योगांचा पाया भरला जातो. मात्र या योजनेत येणाऱ्या प्रस्तावांना बँका कचऱ्याची टोपली दाखवत असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा उद्योग केंद्राने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (पीएमईजीपी)मध्ये मंजूर केलेल्या ४८७ पैकी फक्त ५६ प्रकरणांनाच मंजुरी दिली आहे. म्हणजे फक्त १० टक्के प्रकरणांनाच जिल्ह्यातील बँका मंजुरी देत आहेत.

जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये ही योजना लागू होऊ शकते. त्यात राष्ट्रीय बँकांचा समावेश आहे. त्यातूनच ही योजना लागू केली जाते. बँकांमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले काही व्यवस्थापक हे सातत्याने अशी प्रकरणे पुढे ढकलत आहे. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी बँकांना १५ दिवसांचा अवधी असतो. मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नाही.

उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा

जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी या प्रस्तावांची पूर्तता व्हावी आणि त्याचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे. यासाठी सातत्याने बँकांकडे पाठपुरावा करतात. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाते. मात्र बँकांकडून त्याला कधीही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. बहुतेक उद्योगांच्या प्रस्तावासाठी केंद्राचे अधिकारीच अर्जदारासोबत बँकांचे खेटे मारत असल्याचेही समोर आले आहे.

मनुष्यबळाची अडचण पण किती दिवस

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्र्स्ताव गेल्यावर बहुतेक व्यवस्थापक हे अर्जच तपासूनच बघत नाही. तसेच येणाऱ्या होतकरू अर्जदारांना किरकोळ कारणे सांगून प्रस्ताव नाकारला जातो. आणि तसेच संबंधित अर्जदाराला अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगून तिष्ठत ठेवले जाते.

काय आहे ही योजना

केंद्र सरकारच्या मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयातर्फे नव्या उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही योजना राबवली जाते. त्यात १८ ते ५० या वयोगटातील अर्जदारांना उद्योग सुरू करण्यास कर्ज दिले जाते. आणि नंतर त्यावर २५ टक्के अनुदानही दिले जाते.

आकडेवारी

जिल्हा उद्योग केंद्राने पाठवलेले प्रस्ताव - ४८७

बँकांनी मजूर केलेले प्रस्ताव ५६

मंजूर प्रस्तावात सबसिडीची रक्कम - १ कोटी २ लाख ९३ हजार

सबसिडी मिळालेले उद्योजक ३४

मिळालेल्या सबसिडीची रक्कम ८२.६३ लाख