शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दोन दिवसात केळी दरात 112 रुपयांची घसरण

By admin | Updated: March 26, 2017 15:40 IST

दोनच दिवसात केळीच्या दरात क्विंटलमागे 112 रुपयांची घसरण झाली आहे.

 आंध्रप्रदेशातून आवक वाढली : उन्हाचा तडाखा वाढल्याने घसरण कायम राहणार

 
जळगाव, दि.26 : आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातून केळीची मोठय़ा प्रमाणात झालेली आवक आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने दोनच दिवसात केळीच्या दरात  क्विंटलमागे 112 रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमान व उन्हाळी फळाची आवक यामुळे दरातील घसरण आगामी काळात कायम राहणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
बनाना सिटी म्हणून ओळखल्या जाणा:या जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, भुसावळ या भागात सर्वाधिक केळीचे उत्पन्न घेतले जाते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आंध्रप्रदेशातून उच्च प्रतीच्या केळीची मोठय़ा प्रमाणात आवक सुरु झाली आहे. त्यामुळे जळगाव व ब:हाणपूर जिल्ह्यातील केळीच्या दरात अचानक घसरण सुरु झाली आहे. दोनच दिवसात केळीच्या दरात प्रति क्विंटल 112 रुपयांची घसरण झाली आहे.
सलग 85 दिवस भाव टिकून
यावर्षी नवतीच्या केळीची कापणी कमी असल्याने जानेवारी ते आजर्पयत केळीचे भाव टिकून होते. कांदे बागातील देखील केळीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. सलग 85 दिवस भाव टिकून राहणे हे जळगाव जिल्ह्यातील केळी भावाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण बाब आहे. 
केळी दरात घसरण कायम राहणार
 जळगावात मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा बसत असतो. एप्रिल व मे महिन्यात तापमान 45 डिग्री सेल्सीअसर्पयत पोहचते. या काळात केळीची काढणी झाल्यानंतर ती परिपक्व होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आगामी काळात देखील केळीच्या दरात घसरण कायम राहणार आहे.
उन्हाळी फळांची आवक वाढली
सध्या बाजारात टरबूज, डांगर, द्राक्ष, संत्रा व काही प्रमाणात आंबा या फळाची आवक वाढली आहे. हंगामी फळांचे भाव देखील ग्राहकांच्या आवाक्यात असल्याने केळी ऐवजी ग्राहक ही फळे खरेदी करीत असतो. त्यामुळे केळीच्या मागणीला काही प्रमाणात फटका आहे.
केळीचे असे आहेत दर
केळीचा 23 रोजी प्रति क्विंटल 1582 रुपये भाव होता. त्यात 1450 भाव आणि 22 रुपये फरक होता. मात्र रविवारी केळीचा प्रति क्विंटल 1470 भाव होता. त्यात 1350 भाव व 20 रुपये फरक होता. ब:हाणपूरच्या बाजारात केळीचा भाव हा 751 ते 1607 दरम्यान प्रतिक्विंटल भाव होता.