शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रावेर तालुक्यातील तांदलवाडी पाठोपाठ अटवाड्यातूनही केळी निर्यात केंद्रास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:14 IST

क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत.

ठळक मुद्देरावेरच्या दक्षिणेतून पूर्वेकडे वाहू लागले केळी निर्यातीचे वारेविशाल रामेश्वर अग्रवाल यांचा कृषीसेवाभावाचा वारसा

रावेर, जि.जळगाव : क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत. तालुक्याचा कर्जोद, वाघोड, खानापूर, निरूळ व चोरवड भाग म्हणजे चंद्रावरील काळ्या खाचखळग्यांसारखा समृद्धीला लाजवणारा वाळवंट होऊ पाहत असताना मात्र लगतच्या तापी काठावरील अटवाडे गावात केळी निर्यात केंद्राचा शनिवारी प्रारंभ झाल्याने केळी उत्पादकांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावशिवारातील तरूण शेतकऱ्यांनी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड करीत स्वंयचलीत यंत्राद्वारे विद्राव्य खतांचे फर्टिगेशन तथा फळ निगा तंत्रज्ञानासह केळीचे काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान अवलंबून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाचे केंद्र ठरले आहे. किंबहुना या पारंपरिक शेतीची कात टाकून व्यावसायिक शेतीची कास धरणाऱ्या उद्यमशील शेतकऱ्यांनी तांदलवाडी गावाला केळी निर्यात केंद्राची ओळख निर्माण करून दिली.त्या पावलावर पाऊल ठेवत अटवाडे येथील विशाल रामेश्वर अग्रवाल या आॅटोमोबाईल इंजिनीअर असलेल्या युवा शेतकºयाने आपल्या दातृत्वशील आजोबा शंकरलाल अग्रवाल यांच्या कृषीसेवाभावाचा वारसा पुढे चालवत, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीचे गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाला सुरूवात केली. जळगाव येथील निर्यातक्षम केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी निर्यातक्षम केळीचे जैन इरिगेशन द्वारा अरब राष्ट्रांत निर्यात केली. मात्र, तांदलवाडीप्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागातील या वाळवंटात केळी निर्यात केंद्र फुलावे अशी अभिलाषा बाळगून विशाल अग्रवाल यांनी आजपासून ऋची निर्यात केंद्राची स्थापना करून स्वत:च्या शेतातील गुणात्मक दर्जाची निर्यातक्षम केळीची पॅकेजींग प्रक्रिया पूर्ण करून ओमान या अरब राष्ट्रात नियार्तीला शुभारंभ केला. मुंबई तथा गुजरात मध्ये मुख्यालय असलेल्या देसाई फ्रुट या मध्यस्थ कंपनीद्वारा निर्यातीला शुभारंभ केला आहे. यावेळी माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील, सरपंच गणेश महाजन, उपसरपंच चंद्रकात पाटील, संतोष पाटील, भास्कर कुयटे, नितीन पाटील, रामेश्वर अग्रवाल, वरूण अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. दररोज २० टन निर्यातक्षम केळी सतत चार ते पाच दिवस सावदा येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये निर्यात करण्यासाठी साठवून व तपमान नियंत्रीत करून कंटेनरने मुंबई जेएनपीटी बंदरावरून ओमान या आखाती राष्ट्रात तब्बल २१ दिवसांनी पोहोचणार आहे.सद्य:स्थितीत खानापूर पंचक्रोशीतील निर्यातक्षम केळी उत्पादकांची केळी तात्पुरत्या स्वरूपात शेतातचं पॅकेजिंगची प्रक्रिया करून देसाई फ्रुट कंपनीची एजन्सी घेऊन ही केळी निर्यात केली जाणार आहे. आॅक्टोबरपासून पॅकेजिंग हाऊस उभारून ऋची निर्यात केंद्राला मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न राहील.-विशाल अग्रवाल, अटवाडे, ता.रावेर

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर