शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

रावेर तालुक्यातील तांदलवाडी पाठोपाठ अटवाड्यातूनही केळी निर्यात केंद्रास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:14 IST

क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत.

ठळक मुद्देरावेरच्या दक्षिणेतून पूर्वेकडे वाहू लागले केळी निर्यातीचे वारेविशाल रामेश्वर अग्रवाल यांचा कृषीसेवाभावाचा वारसा

रावेर, जि.जळगाव : क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत. तालुक्याचा कर्जोद, वाघोड, खानापूर, निरूळ व चोरवड भाग म्हणजे चंद्रावरील काळ्या खाचखळग्यांसारखा समृद्धीला लाजवणारा वाळवंट होऊ पाहत असताना मात्र लगतच्या तापी काठावरील अटवाडे गावात केळी निर्यात केंद्राचा शनिवारी प्रारंभ झाल्याने केळी उत्पादकांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावशिवारातील तरूण शेतकऱ्यांनी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड करीत स्वंयचलीत यंत्राद्वारे विद्राव्य खतांचे फर्टिगेशन तथा फळ निगा तंत्रज्ञानासह केळीचे काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान अवलंबून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाचे केंद्र ठरले आहे. किंबहुना या पारंपरिक शेतीची कात टाकून व्यावसायिक शेतीची कास धरणाऱ्या उद्यमशील शेतकऱ्यांनी तांदलवाडी गावाला केळी निर्यात केंद्राची ओळख निर्माण करून दिली.त्या पावलावर पाऊल ठेवत अटवाडे येथील विशाल रामेश्वर अग्रवाल या आॅटोमोबाईल इंजिनीअर असलेल्या युवा शेतकºयाने आपल्या दातृत्वशील आजोबा शंकरलाल अग्रवाल यांच्या कृषीसेवाभावाचा वारसा पुढे चालवत, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीचे गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाला सुरूवात केली. जळगाव येथील निर्यातक्षम केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी निर्यातक्षम केळीचे जैन इरिगेशन द्वारा अरब राष्ट्रांत निर्यात केली. मात्र, तांदलवाडीप्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागातील या वाळवंटात केळी निर्यात केंद्र फुलावे अशी अभिलाषा बाळगून विशाल अग्रवाल यांनी आजपासून ऋची निर्यात केंद्राची स्थापना करून स्वत:च्या शेतातील गुणात्मक दर्जाची निर्यातक्षम केळीची पॅकेजींग प्रक्रिया पूर्ण करून ओमान या अरब राष्ट्रात नियार्तीला शुभारंभ केला. मुंबई तथा गुजरात मध्ये मुख्यालय असलेल्या देसाई फ्रुट या मध्यस्थ कंपनीद्वारा निर्यातीला शुभारंभ केला आहे. यावेळी माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील, सरपंच गणेश महाजन, उपसरपंच चंद्रकात पाटील, संतोष पाटील, भास्कर कुयटे, नितीन पाटील, रामेश्वर अग्रवाल, वरूण अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. दररोज २० टन निर्यातक्षम केळी सतत चार ते पाच दिवस सावदा येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये निर्यात करण्यासाठी साठवून व तपमान नियंत्रीत करून कंटेनरने मुंबई जेएनपीटी बंदरावरून ओमान या आखाती राष्ट्रात तब्बल २१ दिवसांनी पोहोचणार आहे.सद्य:स्थितीत खानापूर पंचक्रोशीतील निर्यातक्षम केळी उत्पादकांची केळी तात्पुरत्या स्वरूपात शेतातचं पॅकेजिंगची प्रक्रिया करून देसाई फ्रुट कंपनीची एजन्सी घेऊन ही केळी निर्यात केली जाणार आहे. आॅक्टोबरपासून पॅकेजिंग हाऊस उभारून ऋची निर्यात केंद्राला मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न राहील.-विशाल अग्रवाल, अटवाडे, ता.रावेर

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर