शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:45 IST

रविवारी रात्री झालेल्या वादळी वाºयासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या.

उचंदे/चांगदेव, ता.मुक्ताईनगर : येथे व परिसरात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाºयासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यासोबतच मका, ज्वारी, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हळहळ व्यक्त करीत आहे.चांगदेव परिसरात २० सप्टेंबरला रात्री दहा वाजता आलेल्या वादळी वाºयासह पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची केळी जमीनदोस्त झाली आहे. मका, ऊस, कापूस, ज्वारी जमीनदोस्त झाली आहे. शेतकºयांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.उचंदेसह परिसरातील खामखेडा, पंचाने, मेळसांगवे आदी गावातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीवर असलेली केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पूर्णत: झोपली आहे तर ज्वारीचे व मक्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून उचंदा परिसरात काही ना काही कारणास्तव शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या महिनाभरापासून केळीवरील सीएमव्ही व्हायरसमुळे शेतकरी आपली केळी वाचवण्यासाठी मेहनत घेत आहे. शासनाने पंचनामे केले परंतु तेही २५ ते ३० टक्क्यांच्या आत केले आहे. यामुळे केळी उत्पादकांचा लागलेला खर्चदेखील निघणार नाही. या संकटावर मात करत असताना पुन्हा वादळाने केळी, कपाशी, ज्वारी, मका या पिकांवर घाला घातला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fruitsफळेMuktainagarमुक्ताईनगर