शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

जळगावात जिल्ह्यात केळीला हमीभावाची गरज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:59 IST

खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भावाने उत्पादक द्विधा मन:स्थितीत

ठळक मुद्देउत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक समस्येतसध्याच्या स्पर्धात्मक शेती व्यवसायात केळी लागवड करणे अवघडखर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने केळी उत्पादक हवालदिल

आॅनलाईन लोकमतचिनावल, जि.जळगाव, दि.२५ : सद्य:स्थितीत कांदे केळी बागला वेगळे, जुनारी व वापसी केळीला वेगळे असे निरनिराळे भाव काढले जात आहेत. या काढलेल्या भावापेक्षाही व्यापारी कमी भावाने केळी मालाची मागणी करीत असल्याने उत्पादकांनी केलेला खर्चही निघू शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामुळे केळी उत्पादक त्रस्त होऊन पर्यायी पिकाच्या शोधात द्विधा मन:स्थितीत अडकला आहे. केळी बेणे खरेदी, शेताची मशागत, लागवड ते कापणीपर्यंतची आंतरमशागत, ठिबक, रासायनिक व जैविक खते यांचा करावा लागणारा खर्च पाहता केळी उत्पादक शेतकऱ्याला किमान चार आकडी भाव कायमस्वरूपी मिळाल्यास उत्पादकांच्या हाताला हात लागू शकतो. नाही तर पारंपरिक व सध्याच्या स्पर्धात्मक शेती व्यवसायात केळी लागवड करणे दुरापास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत केळीला मिळणारे भाव जेथल्या जेथे आहेत. बºयाच वेळा तर कमीच होताना पाहिले आहेत. मात्र दुसरीकडे केळी बागांसाठी लागणारे रासायनिक व जैविक खते, फवारणी औषधांच्या किमतीत चारपटीने वाढ झाली आहे. केळी बेणे, आंतरमशागतीची भरमसाट मजुरी यासह कापणीपर्यंतचा प्रचंड खर्च पाहता आजमितीस मिळणारे भाव हे केळीचे उत्पादन घेण्यापर्यंतच्या खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत.केळीला पर्यायी पीक म्हणून बघितल्या जाणाºया हळद, आले, आरवी व इतर पिके घेण्याचा प्रयत्न केळीपट्ट्यात केला गेला, मात्र या पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठीचे आधुनिक व अनुभवींच्या मार्गदर्शनाच्या अभावाने उत्पादकांची याहीकडे पाठ फिरवली जाताना दिसत आहे.

शासनाने इतर पिकांप्रमाणे केळीला हमीभाव देण्याची गरज आहे. केळी भावाचे नेमके गणितच शेतकºयांच्या आकलनापलीकडचे आहे. त्यामुळे नुकसान होत आहे.-नितीन वायकोळे,केळी उत्पादक शेतकरी, चिनावल, ता.रावेर.

टॅग्स :Jalgaonजळगावagricultureशेती