शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

रावेर तालुक्यातील कोट्यवधींची केळी बनली पशुंचे खाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 19:28 IST

रावेर तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांची केळी मातीमोल झाली आहे. बागांमध्ये खोडांवरच गतप्राण झालेली ही केळी वाया जाण्यात जमा असल्याने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी ती गुराढोरांपुढे टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे गाय, बैल, म्हशी यांची चंगळ झाली आहे. एवढेच काय मेंढपाळांनी या अकाली सुगीचा लाभ उचलत आपल्या शेळ्या मेंढ्यांना खाद्य म्हणून केळीचे घड टाकणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देसुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणेराज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा

लोकमत न्यूज नेटवर्करावेर, दि.१७ : तालुक्यात गेल्या पंधरवड्यात वादळी पावसामुळे जमीनदोस्त होऊन मातीमोल बनलेल्या केळीचा आता चक्क पशुंचे खाद्य म्हणून वापर होत असून हतबल झालेल्या केळी उत्पादकांना हे दुर्दैवी चित्र आपल्या डोळ्यासमोर पहावे लागत आहे.दरम्यान, शासकीय मदतीच्या अपेक्षेने बहुसंख्य केळी उत्पादकांनी आपल्या बागातील उद्ध्वस्त केळीचे खोड तसेच ठेवले असून पंधरा दिवस उलटून गेले तरी मदतीची काहीही घोषणा नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांच्या अस्वस्थेत भर पडली आहे.ंअसा खर्च आणि असे नुकसानतालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त झाली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचा सरासरी हिशोब धरला तर केळीच्या प्रतिखोडामागे किमान १०० रूपये प्रमाणे खर्च झाला आहे. अशा ९० लाख केळी खोडांमागे ९० कोटी रुपयांचा उत्पादन खर्च व २० किलोच्या रासप्रमाणे ८५ टक्के उत्पादनाची सरासरी धरली तर १५ लाख ३० हजार क्विंटल केळीमाल मातीमोल झाल्याने सरासरी २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु शेतकºयांनी यंदाच्या केळी उत्पन्नातून पाहिलेले हिरवे स्वप्न थेट मेंढ्या, बकºया व गुरांच्या घशात जात असल्याने व राज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा दिला जात असल्याचे पाहून शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.