शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

रावेर तालुक्यातील कोट्यवधींची केळी बनली पशुंचे खाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 19:28 IST

रावेर तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांची केळी मातीमोल झाली आहे. बागांमध्ये खोडांवरच गतप्राण झालेली ही केळी वाया जाण्यात जमा असल्याने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी ती गुराढोरांपुढे टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे गाय, बैल, म्हशी यांची चंगळ झाली आहे. एवढेच काय मेंढपाळांनी या अकाली सुगीचा लाभ उचलत आपल्या शेळ्या मेंढ्यांना खाद्य म्हणून केळीचे घड टाकणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देसुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणेराज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा

लोकमत न्यूज नेटवर्करावेर, दि.१७ : तालुक्यात गेल्या पंधरवड्यात वादळी पावसामुळे जमीनदोस्त होऊन मातीमोल बनलेल्या केळीचा आता चक्क पशुंचे खाद्य म्हणून वापर होत असून हतबल झालेल्या केळी उत्पादकांना हे दुर्दैवी चित्र आपल्या डोळ्यासमोर पहावे लागत आहे.दरम्यान, शासकीय मदतीच्या अपेक्षेने बहुसंख्य केळी उत्पादकांनी आपल्या बागातील उद्ध्वस्त केळीचे खोड तसेच ठेवले असून पंधरा दिवस उलटून गेले तरी मदतीची काहीही घोषणा नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांच्या अस्वस्थेत भर पडली आहे.ंअसा खर्च आणि असे नुकसानतालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त झाली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचा सरासरी हिशोब धरला तर केळीच्या प्रतिखोडामागे किमान १०० रूपये प्रमाणे खर्च झाला आहे. अशा ९० लाख केळी खोडांमागे ९० कोटी रुपयांचा उत्पादन खर्च व २० किलोच्या रासप्रमाणे ८५ टक्के उत्पादनाची सरासरी धरली तर १५ लाख ३० हजार क्विंटल केळीमाल मातीमोल झाल्याने सरासरी २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु शेतकºयांनी यंदाच्या केळी उत्पन्नातून पाहिलेले हिरवे स्वप्न थेट मेंढ्या, बकºया व गुरांच्या घशात जात असल्याने व राज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा दिला जात असल्याचे पाहून शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.