शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील कोट्यवधींची केळी बनली पशुंचे खाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 19:28 IST

रावेर तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांची केळी मातीमोल झाली आहे. बागांमध्ये खोडांवरच गतप्राण झालेली ही केळी वाया जाण्यात जमा असल्याने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी ती गुराढोरांपुढे टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे गाय, बैल, म्हशी यांची चंगळ झाली आहे. एवढेच काय मेंढपाळांनी या अकाली सुगीचा लाभ उचलत आपल्या शेळ्या मेंढ्यांना खाद्य म्हणून केळीचे घड टाकणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देसुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणेराज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा

लोकमत न्यूज नेटवर्करावेर, दि.१७ : तालुक्यात गेल्या पंधरवड्यात वादळी पावसामुळे जमीनदोस्त होऊन मातीमोल बनलेल्या केळीचा आता चक्क पशुंचे खाद्य म्हणून वापर होत असून हतबल झालेल्या केळी उत्पादकांना हे दुर्दैवी चित्र आपल्या डोळ्यासमोर पहावे लागत आहे.दरम्यान, शासकीय मदतीच्या अपेक्षेने बहुसंख्य केळी उत्पादकांनी आपल्या बागातील उद्ध्वस्त केळीचे खोड तसेच ठेवले असून पंधरा दिवस उलटून गेले तरी मदतीची काहीही घोषणा नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांच्या अस्वस्थेत भर पडली आहे.ंअसा खर्च आणि असे नुकसानतालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त झाली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचा सरासरी हिशोब धरला तर केळीच्या प्रतिखोडामागे किमान १०० रूपये प्रमाणे खर्च झाला आहे. अशा ९० लाख केळी खोडांमागे ९० कोटी रुपयांचा उत्पादन खर्च व २० किलोच्या रासप्रमाणे ८५ टक्के उत्पादनाची सरासरी धरली तर १५ लाख ३० हजार क्विंटल केळीमाल मातीमोल झाल्याने सरासरी २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु शेतकºयांनी यंदाच्या केळी उत्पन्नातून पाहिलेले हिरवे स्वप्न थेट मेंढ्या, बकºया व गुरांच्या घशात जात असल्याने व राज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा दिला जात असल्याचे पाहून शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.