शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
2
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
3
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
4
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
5
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
7
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
8
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
9
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
10
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
11
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
12
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
13
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
14
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
15
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
16
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
17
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
18
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
19
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
20
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

केळी विमा अदा न करता विमा कंपनीने पुसली तोंडाला पाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

रावेर : सन २०१९-२०च्या हवामानावर आधारित केळी फळ पीकविमा योजनेतील वेगवान वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीचा संरक्षित विम्याची रक्कम ...

रावेर : सन २०१९-२०च्या हवामानावर आधारित केळी फळ पीकविमा योजनेतील वेगवान वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीचा संरक्षित विम्याची रक्कम सप्टेंबर २०२०मध्ये अदा करणे बंधनकारक असताना अखिल भारतीय कृषी विमा कंपनीने रावेर तहसीलदारांना ३० एप्रिलपर्यंत, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ३० जूनपर्यंत संरक्षित विम्याची रक्कम अदा करण्याचा दुसर्‍यांदा दिलेल्या अल्टिमेटमला पाने पुसली आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

हवामानावर आधारित केळी फळ पीकविमा योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये वेगवान वार्‍यामुळे जून महिन्याच्या पूर्वार्धात हजारो हेक्टर जमीनदोस्त झालेल्या केळीबागांचे शासनस्तरावरून व विमा कंपनीने वस्तुतः नुकसानीचे पंचनामे केले होते. संबंधित विमा योजनेंतर्गत नुकसानीनंतर ४५ दिवसांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात संरक्षित विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक होते. मात्र सप्टेंबर २०२०नंतर आता तब्बल नऊ महिने लोटली तरीही संरक्षित विम्याच्या रकमा आपद‌्ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडल्या नसल्याची शोकांतिका आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये केर्‍हाळे बुद्रूक येथील अमोल गणेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. ३० एप्रिलपर्यंत संरक्षित विम्याच्या रकमा खात्यात जमा न झाल्यास कोविड साथरोगाचे निर्बंध झुगारून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

तत्संबंधी शासनाने गंभीर दखल घेऊन विमा कंपनीकडे पाठपुरावा केला असता तक्रारदार शेतकर्‍यांच्या परिसरातील संरक्षित विम्याच्या रकमा बँक खात्यात जमा करून उर्वरित आपद‌्ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या.

दरम्यान, यंदा जून महिन्याच्या आरंभीच वादळी पावसाने पुन्हा हजारो हेक्टर केळी बागा भुईसपाट झाल्याने पाहणी दौर्‍यास आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मागील नुकसानीचे संरक्षित विम्याच्या रकमा अद्यापही मिळाल्या नसल्याचा पाढा वाचून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नाकर्तेपणाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

त्या अनुषंगाने पालकमंत्री पाटील व खासदार खडसे यांनी संबंधित सन २०१९-२० मधील भारतीय कृषी पीकविमा कंपनी व यंदाची बजाज अलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याबाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने ३० जूनपावेतो सन २०१९-२० मधील वेगवान वार्‍यांमुळे झालेल्या केळी नुकसानीचा संरक्षित विमा शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन संबंधित विमा कंपनीने दिले होते. मात्र पालकमंत्री व खासदार खडसे यांना विमा कंपनीने दुसर्‍यांदा दिलेल्या अल्टिमेटमला पाने पुसली आहेत. आजपावेतो केळी फळपीक संरक्षित विम्यापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात दमडी जमा झाली नाही. यामुळे विमा कंपनीच्या नाकर्तेपणाबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

संबंधित विमा कंपनीकडून तब्बल नऊ महिन्यांचे व्याज व दंडाची रक्कम शासनाने वसूल करून द्यावी अन्यथा त्या विलंबाबाबत शासनाचे विमा कंपनीवर नियंत्रण नसल्याने शासनाने दंड व व्याजाची रक्कम अदा करावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून होत आहे.