शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने केळी कापणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 9:06 PM

आमदारद्वयींसह पालकमंत्र्यांचे प्रयत्न : जिल्हाभरातील केळी उत्पादकांना दिलासा

चिनावल, ता. रावेर : केळी वाहतुकीत येणारी अडचण दूर झाल्यामुळे गुरुवार पासून केळी कापणीला सुरुवात झाली असून हा माल ट्रकमध्येही भरला जाऊ लागला आहे. शासनाने या मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिली असताना केवळ बाहेरील राज्यात ट्रक्स नेता येत नव्हते. मात्र आमदार शिरीष चौधरी आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर हा प्रश्न सुटू शकला.कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे काढणी योग्य परिपक्व झालेले केळी काढून विक्रीस तयार असताना देशभर लोकडाऊन असल्यामुळे उत्तर भारतातील बाजारपेठा देखील बंद आहेत त्यामुळे केळी बाजारात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होते की काय अशी महाभयंकर परिस्थिती केळी उत्पादक शेतकरी राजावर ओढावली होती. त्यात तोंडावर असलेले हसू आता अश्रूत परिवर्तित होणार असताना केळी फळाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळून नियार्तीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी कोचुर येथील पंकज पाटील व कमलाकर पाटील यांचेसह मोठे वाघोदा, सावदा, उधळी, रणगाव, रायपुर , खिर्डी, निंबोल, ऐनपुर, तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील तर चिनावल खिरोदा, रोझोदा, सावखेडा, कुंभारखेडा, येथील शेतकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांना फोनवरून केली होती. दोघा आमदरांनी लागलीच अ‍ॅक्शन मोडमध्ये येत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकºयांची कैफियत मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याने शेतकºयांबाबतीत संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच पंजाब , उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने केळी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.केळी मजुरांची सुरक्षा ही गरजेचीआजपासून केळी कापणी सुरुवात झाली असली तरी एका मालगाडीवर किमान वीस ते कमाल चाळीस केळी मजूर लागत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांना मास्क व हात मोजे याचे सह सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे असे मत केळी युनियनचे उपाध्यक्ष कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.