शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

दहा महिन्यांपासून केळी उत्पादक शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा संपूर्ण भारतात केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे, कमी असलेल्या भावामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा संपूर्ण भारतात केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे, कमी असलेल्या भावामुळे आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच मार्च व जून २०२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, हे नुकसान होऊन आता दहा महिन्यांचा काळ झाला असून, अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही.

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळी या पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कमाल व किमान तापमानानुसार झालेल्या नुकसानीची रक्कम ऑक्टोबर महिन्यात मिळाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही वादळ व गारपिटीमुळे नुकसान झाल्याबाबत नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. जिल्ह्यात मार्च २०२० कालावधीत झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जून २०२०मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेदेखील सुमारे तीन हजार हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे केले होते. मात्र, हे पंचनामे केवळ नावालाच झाल्याची तक्रार आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जर नुकसानभरपाईची रक्कमच दिली जात नसेल तर पंचनाम्याचे ढोंग का केले जाते, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

४५ दिवसांत नुकसानभरपाईची रक्कम मिळणे गरजेचे

वादळ व गारपिटीने पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शासन निर्णयाच्या अनुषंगाने विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा करणे बंधनकारक असून, मात्र दहा महिन्यांचा काळ लोटूनही रक्कम मिळालेली नाही.

अन्यथा रस्त्यावर उतरू

या प्रश्नी खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचा कृषी सचिवांना पत्र पाठविले असून, शेतकऱ्यांना तत्काळ वादळ, गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना १२ टक्के विलंब शुल्कासहित या महिन्याअखेर नुकसानभरपाई मिळवून द्यावी अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा उन्मेष पाटील यांनी या पत्राव्दारे दिला आहे.

कोट..

शेतकऱ्यांना नुसतेच फिरवले जात असून, पीकविम्यात जाचक नियम केले आहेत. त्यानंतर पीकविम्याची रक्कमदेखील दोन महिने उशिराने मिळाली, तर आता वादळ व गारपिटीमध्ये नुकसान झाल्याची भरपाईदेखील अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

-डॉ.सत्त्वशील जाधव, शेतकरी, कठोरा