शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दहा महिन्यांपासून केळी उत्पादक शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा संपूर्ण भारतात केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे, कमी असलेल्या भावामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा संपूर्ण भारतात केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे, कमी असलेल्या भावामुळे आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच मार्च व जून २०२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, हे नुकसान होऊन आता दहा महिन्यांचा काळ झाला असून, अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही.

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळी या पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कमाल व किमान तापमानानुसार झालेल्या नुकसानीची रक्कम ऑक्टोबर महिन्यात मिळाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही वादळ व गारपिटीमुळे नुकसान झाल्याबाबत नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. जिल्ह्यात मार्च २०२० कालावधीत झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जून २०२०मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेदेखील सुमारे तीन हजार हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे केले होते. मात्र, हे पंचनामे केवळ नावालाच झाल्याची तक्रार आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जर नुकसानभरपाईची रक्कमच दिली जात नसेल तर पंचनाम्याचे ढोंग का केले जाते, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

४५ दिवसांत नुकसानभरपाईची रक्कम मिळणे गरजेचे

वादळ व गारपिटीने पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शासन निर्णयाच्या अनुषंगाने विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा करणे बंधनकारक असून, मात्र दहा महिन्यांचा काळ लोटूनही रक्कम मिळालेली नाही.

अन्यथा रस्त्यावर उतरू

या प्रश्नी खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचा कृषी सचिवांना पत्र पाठविले असून, शेतकऱ्यांना तत्काळ वादळ, गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना १२ टक्के विलंब शुल्कासहित या महिन्याअखेर नुकसानभरपाई मिळवून द्यावी अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा उन्मेष पाटील यांनी या पत्राव्दारे दिला आहे.

कोट..

शेतकऱ्यांना नुसतेच फिरवले जात असून, पीकविम्यात जाचक नियम केले आहेत. त्यानंतर पीकविम्याची रक्कमदेखील दोन महिने उशिराने मिळाली, तर आता वादळ व गारपिटीमध्ये नुकसान झाल्याची भरपाईदेखील अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

-डॉ.सत्त्वशील जाधव, शेतकरी, कठोरा