शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:46 IST

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरात्रीतून कूपनलिका पडताय कोरड्या तयार माल कापणीकरीता विनवणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. दररोज एक ना एक चालू स्थितीत असलेली कूपनलिका बंद पडत आहे किंबहुना पाण्याचा दाब अचानक कमी होत आहे.गत तीन वर्षांपासून सतत कमी होत असलेला पावसाळा आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन ठेपला आहे. जसजसा उन्हाचा पारा चढत चालला आहे तसतसा शेतकरी संकटात सापडत चालला आहे. उन्हाच्या तप्त लाटा केळीला मारक ठरत आहेच. परंतु खोडांना कमी पाणी मिळत असल्याने कडक उन्हासमोर तग धरणे कठीण झाले आहे. घडांच्या वजनामुळे खोडं मध्यभागातून आडवे पडत आहेत. यामुळे होणारे नुकसान असह्य झाले आहे तर काही ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूनदेखील पाण्याचा काहीही सहारा लागत नाही. यामुळे केळी सोडायची वेळ अली आहे. आतापर्यंत केळी जगविण्यासाठी झालेला खर्च व आता पाण्याकरिता होणारा पैसा निव्वळ वाया गेला असून, दुहेरी मार बसत आहे.पाणी पातळी खूप खोल गेली आहे. परिणामी कूपनलिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकच धोका निर्माण झाला आहे. रात्रीतून पाणी अर्धवटच निघण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत किती केळी वाचणार हा कुतूहलाचा विषय ठरणार आहे.केळी कापणीसाठी शेतकरी रडकुंडीसभाव द्याल तो द्या, पण केळी कापा, असा निरुत्साही प्रश्न शेतकरी नाइलाजात्सव व्यक्त करत आहे. गेल्या वर्षी अ‍ॅडव्हान्स लागवड केलेल्या शेतकºयांच्या केळी बागेत मालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. मात्र मागणी नसल्याचे कारण दाखवत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन माल खेरेदी करण्याचा फंडा सुरू असून, शेतकºयांना नागवले जात आहे. शेवटी बागेत माल खराब होऊन फेकण्यापेक्षा जो भाव मिळेल तो द्या पण माल कापा, असा टाहो फोडत आहे .पिलबाग तर नकोचनवती मालाला उचल जेमतेम असताना पिलबाग तर नकोच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उभे असलेले पिलबाग फेकून देण्यातच धन्यता मानली जाणार आहे. ६ जून २०१८ ला केºहाळेसह परिसरात संपूर्ण महसूल मंडळातील केळी बाग वादळामुळे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी पिलबाग ठेवण्यास पसंती दिली होती. जेणेकरून कमी खर्चात उत्पादन येईल. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता झालेला खर्च निघणे अवघड झाले आहे. परिणामी या पिलबागांचा फटका नवती केळीला बसत आहे .टरबूज ठरले केळीला अडसरकेळीला पर्याय म्हणून बºयाच शेतकºयांनी टरबूज लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली होती. ती आजही सुरू आहे. त्या मानाने उत्पादनसुद्धा खूप घेतल.े मात्र तेसुद्धा भावाअभावी गाफील ठरले आणि अति प्रमाणात उत्पादन आल्यामुळे केळीच्या मागणीला अडसर ठरले आहे.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर