शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:46 IST

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरात्रीतून कूपनलिका पडताय कोरड्या तयार माल कापणीकरीता विनवणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. दररोज एक ना एक चालू स्थितीत असलेली कूपनलिका बंद पडत आहे किंबहुना पाण्याचा दाब अचानक कमी होत आहे.गत तीन वर्षांपासून सतत कमी होत असलेला पावसाळा आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन ठेपला आहे. जसजसा उन्हाचा पारा चढत चालला आहे तसतसा शेतकरी संकटात सापडत चालला आहे. उन्हाच्या तप्त लाटा केळीला मारक ठरत आहेच. परंतु खोडांना कमी पाणी मिळत असल्याने कडक उन्हासमोर तग धरणे कठीण झाले आहे. घडांच्या वजनामुळे खोडं मध्यभागातून आडवे पडत आहेत. यामुळे होणारे नुकसान असह्य झाले आहे तर काही ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूनदेखील पाण्याचा काहीही सहारा लागत नाही. यामुळे केळी सोडायची वेळ अली आहे. आतापर्यंत केळी जगविण्यासाठी झालेला खर्च व आता पाण्याकरिता होणारा पैसा निव्वळ वाया गेला असून, दुहेरी मार बसत आहे.पाणी पातळी खूप खोल गेली आहे. परिणामी कूपनलिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकच धोका निर्माण झाला आहे. रात्रीतून पाणी अर्धवटच निघण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत किती केळी वाचणार हा कुतूहलाचा विषय ठरणार आहे.केळी कापणीसाठी शेतकरी रडकुंडीसभाव द्याल तो द्या, पण केळी कापा, असा निरुत्साही प्रश्न शेतकरी नाइलाजात्सव व्यक्त करत आहे. गेल्या वर्षी अ‍ॅडव्हान्स लागवड केलेल्या शेतकºयांच्या केळी बागेत मालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. मात्र मागणी नसल्याचे कारण दाखवत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन माल खेरेदी करण्याचा फंडा सुरू असून, शेतकºयांना नागवले जात आहे. शेवटी बागेत माल खराब होऊन फेकण्यापेक्षा जो भाव मिळेल तो द्या पण माल कापा, असा टाहो फोडत आहे .पिलबाग तर नकोचनवती मालाला उचल जेमतेम असताना पिलबाग तर नकोच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उभे असलेले पिलबाग फेकून देण्यातच धन्यता मानली जाणार आहे. ६ जून २०१८ ला केºहाळेसह परिसरात संपूर्ण महसूल मंडळातील केळी बाग वादळामुळे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी पिलबाग ठेवण्यास पसंती दिली होती. जेणेकरून कमी खर्चात उत्पादन येईल. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता झालेला खर्च निघणे अवघड झाले आहे. परिणामी या पिलबागांचा फटका नवती केळीला बसत आहे .टरबूज ठरले केळीला अडसरकेळीला पर्याय म्हणून बºयाच शेतकºयांनी टरबूज लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली होती. ती आजही सुरू आहे. त्या मानाने उत्पादनसुद्धा खूप घेतल.े मात्र तेसुद्धा भावाअभावी गाफील ठरले आणि अति प्रमाणात उत्पादन आल्यामुळे केळीच्या मागणीला अडसर ठरले आहे.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर