शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:46 IST

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरात्रीतून कूपनलिका पडताय कोरड्या तयार माल कापणीकरीता विनवणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. दररोज एक ना एक चालू स्थितीत असलेली कूपनलिका बंद पडत आहे किंबहुना पाण्याचा दाब अचानक कमी होत आहे.गत तीन वर्षांपासून सतत कमी होत असलेला पावसाळा आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन ठेपला आहे. जसजसा उन्हाचा पारा चढत चालला आहे तसतसा शेतकरी संकटात सापडत चालला आहे. उन्हाच्या तप्त लाटा केळीला मारक ठरत आहेच. परंतु खोडांना कमी पाणी मिळत असल्याने कडक उन्हासमोर तग धरणे कठीण झाले आहे. घडांच्या वजनामुळे खोडं मध्यभागातून आडवे पडत आहेत. यामुळे होणारे नुकसान असह्य झाले आहे तर काही ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूनदेखील पाण्याचा काहीही सहारा लागत नाही. यामुळे केळी सोडायची वेळ अली आहे. आतापर्यंत केळी जगविण्यासाठी झालेला खर्च व आता पाण्याकरिता होणारा पैसा निव्वळ वाया गेला असून, दुहेरी मार बसत आहे.पाणी पातळी खूप खोल गेली आहे. परिणामी कूपनलिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकच धोका निर्माण झाला आहे. रात्रीतून पाणी अर्धवटच निघण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत किती केळी वाचणार हा कुतूहलाचा विषय ठरणार आहे.केळी कापणीसाठी शेतकरी रडकुंडीसभाव द्याल तो द्या, पण केळी कापा, असा निरुत्साही प्रश्न शेतकरी नाइलाजात्सव व्यक्त करत आहे. गेल्या वर्षी अ‍ॅडव्हान्स लागवड केलेल्या शेतकºयांच्या केळी बागेत मालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. मात्र मागणी नसल्याचे कारण दाखवत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन माल खेरेदी करण्याचा फंडा सुरू असून, शेतकºयांना नागवले जात आहे. शेवटी बागेत माल खराब होऊन फेकण्यापेक्षा जो भाव मिळेल तो द्या पण माल कापा, असा टाहो फोडत आहे .पिलबाग तर नकोचनवती मालाला उचल जेमतेम असताना पिलबाग तर नकोच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उभे असलेले पिलबाग फेकून देण्यातच धन्यता मानली जाणार आहे. ६ जून २०१८ ला केºहाळेसह परिसरात संपूर्ण महसूल मंडळातील केळी बाग वादळामुळे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी पिलबाग ठेवण्यास पसंती दिली होती. जेणेकरून कमी खर्चात उत्पादन येईल. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता झालेला खर्च निघणे अवघड झाले आहे. परिणामी या पिलबागांचा फटका नवती केळीला बसत आहे .टरबूज ठरले केळीला अडसरकेळीला पर्याय म्हणून बºयाच शेतकºयांनी टरबूज लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली होती. ती आजही सुरू आहे. त्या मानाने उत्पादनसुद्धा खूप घेतल.े मात्र तेसुद्धा भावाअभावी गाफील ठरले आणि अति प्रमाणात उत्पादन आल्यामुळे केळीच्या मागणीला अडसर ठरले आहे.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर