शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:03 IST

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही.

मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यातच, आगामी पोटनिवडणुकीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण ते तात्पुरत्या निर्णयाने गोठवलं आहे. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला आत मशाल घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. तर, शिंदे गटालाही नवीन चिन्ह लवकरच मिळणार आहे. तर, उद्धव ठाकरेंनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं असून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निश्चित झालं आहे. त्यावरुन, माजी मंत्री सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसेच, बाळासाहेबांची शिवसेना ही संघाची असल्याचा योग जुळून येत असल्याचंही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं असून त्यांच्या शिवसेनेचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं राहणार आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांना अधिकृत चिन्ह मिळालेले नाही. मात्र, त्यांच्या शिवसेनेचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे राहणार आहे. एकंदरीतच शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून महाराष्ट्रातल राजकारण ढवळून निघाल आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. 

संघाची स्थापना बाळासाहेबांनी केली

शिंदे गटाला बाळासाहेब यांची शिवसेना अस नाव मिळालं. दुसरीकडे संघाची स्थापना बाळासाहेब देवरस यांनी केली आहे. त्यामुळे, बाळासाहेब या नावाचा योगायोग या ठिकाणी जुळून आला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची सेना ही संघाची सेना असा अर्थ या ठिकाणी योगायोगाने निघतो, असे मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केले. धनुष्यबाण हे चिन्ह जनमानसात पूर्णपणे रुजल होतं, आता जे नवीन चिन्ह मिळाले आहे, ते रुजवण्यासाठी मोठे परिश्रम दोन्ही गटाला करावे लागतील. मात्र, दुसरीकडे संघटना ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे त्यांना प्रचाराला सोपं जाणार असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले .      पावसाच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळावी

परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं आहे. तर, कापूस पिकावर लाल्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, संकटात असलेल्या शेतकऱ्याला आधीच्या नुकसानीतील अद्यापही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे म्हणत खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आता, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचेही लवकरात लवकर पंचनामे करावे, अधिकाधिक मदत शेतकऱ्याला मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी सरकारकडून व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेeknath khadseएकनाथ खडसेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ