शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:19 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयी सांगितलेल्या आठवणी.

मान्यवर रसिकांनी बहिणाबाईला निसर्गकन्या, भूमिकन्या म्हटले आहे. खरं तर निसर्गाशी एकरूप झालेली ती भूमिकन्याच होती. आपल्या काळ्या आईवर नितांत प्रेम करणारी, तिच्यावर अपार कष्ट करणारी ती जणू काही काळ्या मातीवर हिरव्या शाईने लिहीत होती व मग ओळीओळीने असंख्य ओळींमध्ये हिरवे कोंब अंकुरले व मोठे झाल्यावर हवेसोबत डोलू लागले की, हिच्याही मनात आनंद डोलत असे, असं निसर्गाशी व काळ्या मातीशी तिचं अतूट नात होतं. निसर्गाच्या प्रत्येक घटकांवर तिचं होत होतं.पक्षी. प्राणी, नदी, वृक्ष-वेली या सर्वांशी तिचा संवाद चालायचा. माहेरच्या रस्त्यात असलेलं शेवरीचं झाड थोडं मोठं झाल्यावर त्याच्याजवळ थांबून, ‘केवढी मोठी झाली व तू!’ असं विचारणं. शेतामध्ये असलेल्या जुन्या वडाच्या झाडाला, असे बाप्पा, तू युगाचा उभा, पिढी पिढीचा अन् लांब्या दाढीचा! त्याच्या पारब्यांना पाहून त्याच्याशी बोलणं, वाड्यातील निंबाच्या वृक्षाला, ‘निंबाजीबोवा’ व गुलमोहराच्या झाडाला ‘फुलाजी महाराज’ संबोधणं तर, ‘लेकरं कडेवर घेऊन उभी.कशी माझी लेकुरवाळी रंभा!’ केळीच्या बागेतील घड आलेल्या केळीला म्हणत असे. ह्या प्रत्येकाशी तिचा असा संवाद चालत असे.शेतामध्ये असलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या सावलीमुळे पिकाचे नुकसान होते, ते तोडून टाका म्हटल्यावर बहिणाबाईनं त्याचा विरोध करत उत्तर दिलं. ‘अरे आंबे खाऊन पोट भरत असेल पण या फुलाजी महाराजाकडे, गुलमोहराकडे पाह्यल की, मन भरून जातं. ह्यावरून तिचं निसर्ग प्रेम तर दिसून येतंच; पण त्याबरोबरच तिची सौंदर्यदृष्टीही दिसून येते.तिच्या काव्यामध्येसुद्धा निसर्गाची विविध रूपं दिसून येतात. सुगरणीच्या घरट्यावर लिहिलेली ‘खोप्यामधी खोपा’ रचना सुगरणीची कलाकुसर, चातुर्य, वात्सल्य अशा अनेक भावनांना प्रकट करते. घर बांधताना माणसांनीच वन बीएचके, टु बीएचके असा विचार करावा असं नाही. सुगरणीनं पहिल्यापासूनच तो विचार केला आहे. तिच्या खोप्याचे दोन कप्पे असतात. एक आतला व दुसरा बाहेरचा, बहिणाबाईने त्याला खोप्यामधी खोपा म्हटलं आहे. आतला कप्पा मऊतंतू कापूस अशा कोमल धाग्यांनी मऊ केलेला असतो. ज्यात तिची पिलं सुरक्षित असतात. झाडाला टांगलेल्या खोप्याला बहिणाबाईनं झुलता बंगला म्हटलं आहे. ‘जीव झाडाले टांगला’ असताना पिलांची सुरक्षितता, काळजी, वात्सल्य आदी भाव व्यक्त झालेले आहेत.धरतीमातेच्या मायेबद्दल तिला जाणीव आहे. ‘अशी धरित्रीची माया, असे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट तिच्यामधी झाले जमा’ असं म्हणत धरती माता सर्वांची पोशिंदी कशी आहे, हेही सांगते. पहिला पाऊस पडला की, सर्वदूर मृद्गंध दरवळतो. बहिणाबाई म्हणते, आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी, धरतीचा परिमय माझं मन गेलं भरी, शेतात कोंब टरारून वरती आले की, शेताला गहिवरून येते ‘..... शेत जसं अंगावरती शहारे’ हे वाचत असताना आपल्या अंगावरही शहारे येतात. कोंबातून नंतर दोन पाने प्रकटतात, तेव्हा बहिणाबाई वर्णन करताना, ‘पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन’ आणि पुढे म्हणते टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी अशा प्रकारचे वर्णन निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय शक्य नाही. वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त होताना बहिणाबाई निसर्गाचा आधार घेते. अनेक उपमा तिने निसर्गातूनच घेतल्या आहेत. एवढेच काय तिला परमेश्वराचे दर्शनसुद्धा निसर्गाच्या विविध रूपांत होत असे. त्यामुळे या संपूर्ण चराचराशी, निसर्गाशी एकरूप झालेली बहिणाबाई खऱ्या अर्थाने निसर्गकन्या, भूमिकन्याच आहे.- प्रा.ए.बी. पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव