शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

महाराष्ट्रात पहिलाच वानप्रस्थाश्रम साकारतोय बहादरपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 19:38 IST

महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

ठळक मुद्देरेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांची माहितीमहाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम असल्याचा नीलिमा मिश्रा यांचा दावा

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. लोकवर्गणीतून हा हा आश्रम उभा राहावा यासाठी त्यांनी नववर्षापासून गावोगावी फिरून मदतीसाठी फिरणे सुरू केले आहे.प्रश्न- वानप्रस्थाश्रम उभारण्याची कल्पना कशी सुचली?नीलिमा दीदी- लहानपणी पाहिले होते की एका वृद्धाने आपल्या सुनेकडे जेवण मागितले होते. तिने त्या वृद्ध सासऱ्याच्या तोंडावर दोन रुपयांचे नाणे फेकून मारले होते. तेव्हा या वृद्धांसाठी काही तरी करावे या उद्देशाने प्रयत्न करीत होते.गेल्या २१ वर्षांपासून समाजात वावरताना असे जाणवले की, समाजात असे अनेक लोक आहेत की त्यांच्या तरुण वा वृद्धपणातील अपेक्षा राहून गेल्या आहेत. काही तरी वेगळे करण्याची उर्मी राहून गेली. ते करण्यासाठी या लोकांना वानप्रस्थाश्रम उभे करून त्याचा सामाजिक वा वैयक्तिक इच्छा पूर्ती व्हावी यासाठी ही कल्पना ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुचली.प्रश्न- वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी शासनाचे अनुदान का नाही?नीलिमा दीदी- या वानप्रस्थाश्रमासाठी शासनाचा निधी घेतला तर शासनाच्या अटी, शर्ती आणि शासनाच्या बंधनात हा वानप्रस्थाश्रम चालवावा लागेल. वानप्रस्थाश्रमाची माझ्या मनातील संकल्पना खूप वेगळी आहे.प्रश्न- वानप्रस्थाश्रमाची नेमकी वेगळी काय संकल्पना आहे?नीलिमा दीदी- या वानप्रस्थाश्रम बहादरपूर येथे ग्रामपंचायतीच्या तीन एकर जागेत उभा करावयाचा आहे. या वानप्रस्थाश्रमात वर्षभरातून ५० ते ७५ वर्ष वयोगटातील व्यक्तीला तीन वेळा १५ दिवसांसाठी या ठिकाणी राहायला मिळेल. त्या दरम्यान त्यांच्या मनातील राहिलेला गोष्टी म्हणजे संगीत, गायन पोहणे, शिकणे, वाचन करणे, विविध खेळ खेळणे, सामाजिक कार्य करणे या सर्व गोष्टींसाठी त्यांना या वानप्रस्थाश्रमात सोयी उपलब्ध करून त्याचे स्वप्न पूर्ण केले जातील. कोणतीही बंधने त्यांच्यावर नसतील.प्रश्न- वृद्धाश्रम आणि वानप्रस्थाश्रम यात नेमका काय फरक?नीलिमा दीदी- वृद्धाश्रम ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी हा वानप्रस्थाश्रम आहे. या वानप्रस्थाश्रमात येणाºया प्रत्येक वृद्ध व्यक्तीची कुटुंबापासून ताटातूट होणार नाही. काही दिवस वानप्रस्थाश्रमात राहून पुन्हा तो कुटुंबात रममाण होईल. हाच फरक वृद्धाश्रम आणि वानप्रस्थाश्रम राहील.प्रश्न- वानप्रस्थाश्रमासाठी पायी यात्रेतून काय हेतू साधणार?नीलिमा दीदी- गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना. आपण लोकांना बचत गटाच्या माध्यमातून जोडले गेलो आहेत. याचा फायदा वानप्रस्थाश्रम उभारणीच्या कामासाठी करून घ्यावा म्हणून पहिल्या ४० दिवसांच्या खान्देश पायी यात्रेतून या वानप्रस्थाश्रमासाठी कार्यकर्ते उभारणी होईल. लोकांशी मुक्तपणे संवाद साधला जाईल. लोकांच्या भावना कळतील. वानप्रस्थाश्रमासाठी निधी लोकवर्गणीतून उभा करता यावा हाच हेतू आहे.प्रश्न- वानप्रस्थाश्रमासाठी निधी कसा उभा करणार?नीलिमा दिदी- वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी एखादा मोठा उद्योजक यांनी निधी ही दिला असता. पण लोकवर्गणीतून हा पैसा उभा राहिला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातून हा पैसा गोळा केला जाणार आहे. त्यासाठी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली उत्पादन त्यात मसाला, हळद लोणचे, धना पावडर या सर्व साहित्याचे एक ५०० रुपये किमतीचे किट तयार करण्यात आले आहे. ते ग्रामीण भागात पदयात्रा वेळी लोकांना सांगितले जाते. महिला ते किट खरेदी करतात व यातून जो नफा आहे तो वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी वापरला जाणार आहे.प्रश्न- या पदयात्रेसाठी लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे?नीलिमा दीदी- गेल्या ११ दिवसांपासून पदयात्रेच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी दिल्या. लोकांचा प्रचंड सकारात्मक प्रतिसाद आहे. लोक स्वत:हून या वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी वैयक्तिक आर्थिक मदत करीत आहे. एवढ्या एक दीड वर्षात हा अद्ययावत असा वानप्रस्थाश्रम उभारला जाईल, याबाबत आशावादी आहे.निराधार लोकांसाठी अम्मा छत्रालय उभारणार असल्याची भावना नीलिमा मिश्रा यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा