शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

ठरावाला टाळून ५६ लाखांच्या निविदा उघडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालकांच्या खेळण्यांसाठी असलेल्या ५६ लाखांच्या निविदा उघडू नये, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालकांच्या खेळण्यांसाठी असलेल्या ५६ लाखांच्या निविदा उघडू नये, असा सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या सभेत ठराव झालेला असतानाही या निविदा उघडण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून जि. प. च्या सभांना व ठरावांना कुठलेच महत्त्व राहिले नसून याचे खेळणे झाल्याचा आरोप शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात निधी प्राप्त झाल्यामुळे निधी असेल तरच निविदा उघडाव्यात असा सभांमध्ये ठराव झाला होता. मात्र, तरीही या निविदा उघडण्यात आल्या. हे समजल्यानंतर महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर अध्यक्षांच्या स्वाक्षरीने त्या उघडण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. असे जर असेल तर सभांमधील ठराव काय कामाचे, असा सवाल नानाभाऊ यांनी उपस्थित केला आहे. जि.प.चा अर्थसंकल्प हा २०१९ -२० चा २९ कोटींचा होता. आले होते केवळ ९ कोटी असे असताना निधी असेल तरच कामे आपापल्या जबाबदारीवर करा, असे अर्थ विभागाकडून स्पष्ट सूचित केले जात आहे. तरी अशा प्रकारे निविदा उघडणे म्हणजे हा खेळ सुरू असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

निधी परत जाण्याच्या मार्गावर

जिल्हा परिषदेला डीपीडीसीकडून मिळालेला निधी वापरासाठी दोन वर्षांची मुदत असते. मात्र, अद्यापही अनेक कामांच्या निविदाच झाल्या नसल्याने हा निधी परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कुठलेही नियोजन नसल्याने हा प्रकार होत असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाला टाळाटाळच

२० ग्रामपंचायींतचे चार वर्षापासून लेखापरीक्षणच झाले नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप ग्रामपंचायत विभागाकडून कुठल्याही ठोस हालचाली होत नसून, होईल, बघू, करू अशा प्रकारे हा विषय टाळला जात असल्याचे चित्र आहे. यासह लेखापरीक्षण झालेल्या व गैरव्यवहार झालेल्या ग्रामपंचायतीकडून होणारी वसूलीही थंडबस्त्यात आहे.

कोरोनामुळे स्मार्ट ग्रामपुरस्कार रखडले

स्मार्ट ग्राम पुरस्कारांना जाहीर होऊन वीस दिवसांपेक्षा जास्त अवधी होऊनही हे पुरस्कार वितरीत झाले नसून आता कोरोनामुळे निर्बंध आल्याने हे पुरस्कार रखडले आहे. ग्रामसेवक पुरस्कारांसारखीच या पुरस्कारांची स्थिती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावांना बक्षीस केवळ कागदावरच राहिल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत विभागाची ही चालढकल भूमिका असल्याचा आरोप मात्र होत आहे.