शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावातील तरुणीला दहशतवादी बनविण्याचा प्रयत्न - आईची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 11:53 IST

८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्दे मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेऊन घटनाक्रम केला कथन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - प्रेम प्रकरणातून पळवून नेलेल्या मुलीला जबरदस्तीने दहशतवादी करण्याचा प्रयत्न केला गेला, तिने नकार दिला असता तिचा खून करुन मृत शरीराची विल्हेवाट लावल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार ८ जणांविरुध्द खून, खोटे दस्ताऐवज व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीला पळवून नेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी पीडित मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेऊन घटनाक्रम कथन केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणात १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश रामानंद नगर पोलिसांना दिले आहेत.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार,शेख वसीम शेख अहमद (रा.दंगलग्रस्त कॉलनी, जळगाव) याने ७ जून २०१७ रोजी शहरातील एका २१ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. त्यानंतर शेख अहमद शेख गुलाब , शकीराबी शेख अहमद , शेख इम्रान शेख अहमद , शेख अब्दुल शेख अजीज, सईद अब्दुल अजीज शेख व सोहेल खान अब्दुल खान अय्युब खान यांनी कट रचून मुलीला पळवून लावले तर शेख वसीम याने तिच्याशी लग्न करुन दहशतवादी कार्यात सहभागी करण्याचा प्रयत्न केला. तिने या कृत्यास नकार दिल्याने त्यांनी तिचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली.काझी मोहम्मद इस्लमा (रा.बांद्रा, मुंबई) याने धर्मांतर केल्याबाबतचे खोटे दस्ताऐवज केले. २७ आॅगस्ट २०१७ नंतर हे सर्व कारस्थान झाले आहे. त्यानुसार या आठ जणांविरुध्द कलम ३०२, २०१ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा