शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना जळगावातून संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:10 IST

अटलजींकडून मिळालेली कौतुकाची थाप आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ - संजय हांडे

ठळक मुद्देभाषण संगीतबद्ध कसे होऊ शकते?‘केशवस्मृती’ परिवाराची उपस्थिती

जळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन कवितांना संगीतबद्ध करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामधूनच त्यांची भेट झाली व त्यांनी दोन्ही कविता ऐकून दिलेली कौतुकाची थाप माझ्यासाठी आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ असल्याचे भावनिक उद््गार जळगावातील संगीतकार संजय हांडे यांनी काढले.अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी होण्यासह सान्निध्य मिळत त्यांच्या कवितांना संगीत देण्याचे भाग्य जळगावातील संजय हांडे यांना मिळाले आहे. या बाबत हांडे यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली.‘ही ओळ माझी नाही....’वाजपेयी यांच्या आठवणी जागविताना संजय हांडे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना संगीत देण्याची संकल्पना मला सुचली. त्यानुसार सर्व नियोजन झाले ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ या कवितेस प्रथम संगीत देण्यात आले. ही कविता संगीतबद्ध करताना सुरुवातीला मी ‘जय जय धरती माता....’ अशी ओळ जोडत कवितेला सुरुवात केली. ही कविता त्यांना दाखविण्यासाठी गेलो त्या वेळी माझ्या सोबत ज्येष्ठ संगीतकार नौशाद हेदेखील होते. त्यावेळी वाजपेयी यांनी कविता पाहताच विचारले, पहिली ओळ माझी नाही, ती कोणी केली. त्यावर नौशाद यांनी सांगितले, ‘ये इस बच्चे की कमाल है...’, नको असल्यास काढून टाकतो, असे सांगताच वाजपेयी म्हणाले, नाही-नाही राहू, चांगली सुरूवात आहे. हे कौतूक ऐकून मला मोठा अभिमान वाटल्याचे हांडे म्हणाले. हे गीत २००२ ते २००४ या काळात विविध दूरचित्रवाणी वाहिणीनर प्रकाशितही झाले.भाषण संगीतबद्ध कसे होऊ शकते?वाजपेयी यांच्या ‘भारत जमिन का तुकडा नही....’ या दुसऱ्या गीताविषयी बोलताना हांडे म्हणाले, हे गीत म्हणजे वाजपेयी यांचे प्रत्यक्षात भाषण आहे. ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ ही कविता संगीतबद्ध केल्यानंतर पुन्हा भाषणाचा अंश संगीतबद्ध करण्याविषयी गेलो असता त्या वेळी ते म्हणाले, ‘फिरसे आ गये...’ त्या वेळी मी वारंवार येईल असे उत्तर देत मी माझी संकल्पना सांगितली. त्यावर ते म्हणाले हे भाषण आहे, ते संगीतबद्ध कसे होणार, मात्र मी त्यांना विश्वास दिला. त्यानुसार ते संगीतबद्ध करीत त्यांना ऐकविण्यासाठी गेलो असता ‘भाषण संगीतबद्ध होऊ शकते याचा मी कधी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली व कौतूक केले.‘केशवस्मृती’ परिवाराची उपस्थिती‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ ही कविता संगीतबद्ध करण्याची संकल्पना संजय हांडे यांनी डॉ. अविनाश आचार्य यांना सांगितली. त्या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. त्यानुसार केशस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, हिरानंद मंधवाणी, संजय हांडे, जयेश दोशी, उदय भालेराव हे दिल्ली येथे अटलविहारी वाजयेपी यांच्या प्रधानमंत्री निवासस्थानावर गेले. तेथे ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ या गीताचे चित्रीकरण करण्यात आले. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांचीही भूमिका असून त्या वेळी वाजपेयी यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाल्याची आठवण प्रतिष्ठानचे प्रमुख भरत अमळकर यांनी सांगितली. विशेष म्हणजे या कविताचे हक्क प्रतिष्ठानला मिळाले आहे. प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन असलेल्या या कवितेस ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांनी संगीत दिले आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीJalgaonजळगाव