शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना जळगावातून संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:10 IST

अटलजींकडून मिळालेली कौतुकाची थाप आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ - संजय हांडे

ठळक मुद्देभाषण संगीतबद्ध कसे होऊ शकते?‘केशवस्मृती’ परिवाराची उपस्थिती

जळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन कवितांना संगीतबद्ध करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामधूनच त्यांची भेट झाली व त्यांनी दोन्ही कविता ऐकून दिलेली कौतुकाची थाप माझ्यासाठी आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ असल्याचे भावनिक उद््गार जळगावातील संगीतकार संजय हांडे यांनी काढले.अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी होण्यासह सान्निध्य मिळत त्यांच्या कवितांना संगीत देण्याचे भाग्य जळगावातील संजय हांडे यांना मिळाले आहे. या बाबत हांडे यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली.‘ही ओळ माझी नाही....’वाजपेयी यांच्या आठवणी जागविताना संजय हांडे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना संगीत देण्याची संकल्पना मला सुचली. त्यानुसार सर्व नियोजन झाले ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ या कवितेस प्रथम संगीत देण्यात आले. ही कविता संगीतबद्ध करताना सुरुवातीला मी ‘जय जय धरती माता....’ अशी ओळ जोडत कवितेला सुरुवात केली. ही कविता त्यांना दाखविण्यासाठी गेलो त्या वेळी माझ्या सोबत ज्येष्ठ संगीतकार नौशाद हेदेखील होते. त्यावेळी वाजपेयी यांनी कविता पाहताच विचारले, पहिली ओळ माझी नाही, ती कोणी केली. त्यावर नौशाद यांनी सांगितले, ‘ये इस बच्चे की कमाल है...’, नको असल्यास काढून टाकतो, असे सांगताच वाजपेयी म्हणाले, नाही-नाही राहू, चांगली सुरूवात आहे. हे कौतूक ऐकून मला मोठा अभिमान वाटल्याचे हांडे म्हणाले. हे गीत २००२ ते २००४ या काळात विविध दूरचित्रवाणी वाहिणीनर प्रकाशितही झाले.भाषण संगीतबद्ध कसे होऊ शकते?वाजपेयी यांच्या ‘भारत जमिन का तुकडा नही....’ या दुसऱ्या गीताविषयी बोलताना हांडे म्हणाले, हे गीत म्हणजे वाजपेयी यांचे प्रत्यक्षात भाषण आहे. ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ ही कविता संगीतबद्ध केल्यानंतर पुन्हा भाषणाचा अंश संगीतबद्ध करण्याविषयी गेलो असता त्या वेळी ते म्हणाले, ‘फिरसे आ गये...’ त्या वेळी मी वारंवार येईल असे उत्तर देत मी माझी संकल्पना सांगितली. त्यावर ते म्हणाले हे भाषण आहे, ते संगीतबद्ध कसे होणार, मात्र मी त्यांना विश्वास दिला. त्यानुसार ते संगीतबद्ध करीत त्यांना ऐकविण्यासाठी गेलो असता ‘भाषण संगीतबद्ध होऊ शकते याचा मी कधी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली व कौतूक केले.‘केशवस्मृती’ परिवाराची उपस्थिती‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ ही कविता संगीतबद्ध करण्याची संकल्पना संजय हांडे यांनी डॉ. अविनाश आचार्य यांना सांगितली. त्या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. त्यानुसार केशस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, हिरानंद मंधवाणी, संजय हांडे, जयेश दोशी, उदय भालेराव हे दिल्ली येथे अटलविहारी वाजयेपी यांच्या प्रधानमंत्री निवासस्थानावर गेले. तेथे ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ या गीताचे चित्रीकरण करण्यात आले. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांचीही भूमिका असून त्या वेळी वाजपेयी यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाल्याची आठवण प्रतिष्ठानचे प्रमुख भरत अमळकर यांनी सांगितली. विशेष म्हणजे या कविताचे हक्क प्रतिष्ठानला मिळाले आहे. प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन असलेल्या या कवितेस ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांनी संगीत दिले आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीJalgaonजळगाव