शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

वाहतुकीच्या कोंडीचा एएसपींनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:11 IST

जळगावच्या सुरत रेल्वेगेटवरील प्रकार

ठळक मुद्देतब्बल साडे तीन तास नागरिक झाले हैराण

जळगाव : शहरातील सुरत रेल्वेगेटजवळ बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास साईडपट्टी खचल्याने त्यात ट्रक रुतून तब्बल साडे तीन तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. यात सर्वात मोठा फटका बसला तो सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांना. ते स्वत: या वाहतुक कोंडीत दीड तास अडकले.दरम्यान, वाहतूक विभागाचे १५ ते १६ कर्मचारी, आरपीएफचे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुनही ते निष्फळ ठरले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक ही दुध फेडरेशनकडील सुरत रेल्वेगेटकडून होत आहे. त्यातच सुरत रेल्वेगेट हे दिवसभरात येणाऱ्या-जाणाºया रेल्वेमुळे १९ ते २० वेळा बंद होते. यामुळे या गेटजवळ वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे.विद्यार्थ्यांना घरी जाण्यास विलंबदहावी व बारावीच्या परीक्षा सुरु असल्यामुळे दुपारी परीक्षा देवून घरी जाणाºया विद्यार्थ्यांचे या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. दुपारी २ वाजेनंतर परीक्षा संपल्यानंतर ममुराबाद, आव्हाणे, कानळदा, विदगाव, भोकर या भागातील विद्यार्थी रात्री ८ वाजेपर्यंत घरी पोहचले. आपले पाल्य सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी न आल्याने पालक देखील चिंतेत होते. यामुळे अनेकांकडून आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, बसस्थानकात फोन करत पाल्यांबाबतची माहिती घेतली. तर वाहतूककोंडीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनीही इतर नागरिकांच्या मोबाईलवरून पालकांना उशीरा येण्याचे कारण देत असल्याचे दिसून आले.वाहनधारकांमध्ये वादकोंडी इतकी भयंकर होती की, वाहनधारकांना आपले वाहने पुढे देखील सरकवता येत नव्हते. वाहनांचा धक्का लागल्यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये चांगलाच वाद देखील झाले. काही वाहनधारकांची वाहनांवरुनच बाचाबाची झालेली पहायला मिळाली. तसेच पायी जाणाºया नागरिकांना देखील जागा शिल्लक नसल्याने अनेक नागरिक रेल्वे लाईनवरुन धोकेदायक पध्दतीने मार्ग काढत होते.आरपीएफचे जवानही वैतागलेवाहनांची संख्या वाढत जात असल्याने वाहतूक विभागाकडून या ठिकाणी अतिरीक्त कर्मचारी बोलविण्यात आले. तसेच रेल्वे पोलीसांनी देखील कर्मचारी बोलावून घेतले. त्यांनी देखील जिकरीचे प्रयत्न करुनही वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहतूक कर्मचारीही वैतागलेले होते.नीलाभ रोहन यांच्या सुरक्षा रक्षकाची कसरत... सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन हे अवैध धंद्यावर कारवाईसाठी जात असताना ते देखील वाहतूक कोंडीत साडेतीन तास अडकले होते. त्यांच्यासोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही वाहतूककोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही उपयोग झाला नाही. सायंकाळी ६.३० वाजता वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच रोहोन यांचीही सुटका झाली.दहा ते बारा बसेसही अडकल्या... मालवाहतूक ट्रक, वाळूच्या ट्रॅक्टरमुळे या वाहतूककोंडीत अधिक भर टाकलेली पहायला मिळाली. रेल्वेगेटच्या दोन्हीही बाजूस दहा ते बारा बसेस अडकल्या होत्या. यामुळे बसेसचे संपूर्ण वेळापत्रक देखील कोलमडले होते. मालधक्क्याकडून येणारी सर्व वाहने देखील या ठिकाणी अडकले होते.चारही रस्त्यांवर लागल्या वाहनांच्या रांगाबुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मालगाडी कॉस झाल्यानंतर या गेटजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. गेटजवळ येणाºया एसके आॅईलमील कडील रस्ता, जुना हायवे, एसएमआयटी कॉलेज व रेल्वे मालधक्का या चारही रस्त्यांकडून एकाच वेळी वाहने आल्यामुळे ही वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच रेल्वेगेट पुन्हा-पुन्हा बंद होत असल्याने वाहनांची संख्या ही वाढतच गेली. यामुळे सुरत रेल्वेगेटपासून एसके आॅईल मील, निमखेडी नाका व एसएमआयटी कॉलेजपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने वाहनधारकांना या ठिकाणी उभ राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसून आला नाही.