शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आर्टीकल - घरातील शाळेला करूया समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

प्रत्येकाच्या क्षमता व आवडीनुसार ऑनलाईन प्रगती करता येऊ शकते आहे. विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येत आहेत. ऑफलाईनच्या तुलनेने ...

प्रत्येकाच्या क्षमता व आवडीनुसार ऑनलाईन प्रगती करता येऊ शकते आहे. विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येत आहेत. ऑफलाईनच्या तुलनेने घरबसल्या स्वस्त माहिती उपलब्ध होऊ शकते. कमी वेळात व कमी श्रमात माहिती ऑनलाईन उपलब्ध होत असून ऑनलाईन साक्षरता व तंत्रज्ञानाशी जवळीक साधता येत आहे. ज्ञानाचे खूप मोठे भांडार ऑनलाईन शिक्षणाने उघडले असून ज्ञानाचे आदान-प्रदान करणे सोपे जात आहे. ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याने मनोरंजनातून शिक्षण आणि दृकश्राव्य साधनांचा वापर करून शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेतले जात आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे पाहिल्यानंतर त्याच्या मर्यादा अथवा तोटे सुद्धा लक्षात घ्यावे लागतील. शहरी भागात ऑनलाईन शिक्षण सुरू असताना ग्रामीण भागात मात्र उपकरणांचा अभाव असल्याने पूर्णतः ऑनलाईन शक्य होत नाही.

प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल यासाठी सरकारने देखील विविधांगी पावले उचलली आहेत. जूनच्या सुरुवातीला प्रत्येक वर्गाची पाठ्यपुस्तके घरपोच पोचविण्यात आली. दीक्षा ॲप, युट्युब, टिलीमिली, सह्याद्री वाहिनी, जिओ टिव्ही यांच्या माध्यमातून शिक्षण संवाद सुरू झाला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यघटकातील सुमारे पंचवीस टक्के पाठ्यघटक कपात करण्यात आले आहेत. शिक्षक, शाळा, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षण पद्धती कशा पद्धतीने राबवता येईल याचा देखील विचार शालेय शिक्षण विभागामार्फत केला जात आहे.

ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणात पालकांची भूमिका देखील महत्वपूर्ण आहे. त्याकरिता प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची पाठ्यपुस्तके हाताळली पाहिजे. पाठ्यपुस्तकांच्या सुरुवातीला असलेल्या अध्ययन निष्पत्ती किमान एकदा वाचाव्यात. पाल्याच्या शिक्षणाविषयी सकारात्मकता बाळगावी. मुलांशी संवाद साधून चर्चा करावी. पाल्याच्या अध्ययनासाठी सहकार्य करावे. शाळा व शिक्षकांकडून आलेला अभ्यास व मुलांची सांगड कशी घालता येईल याकडे लक्ष द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्क्रीन टाईम ठरवावा. दिवसातून किती वेळ टीव्ही आणि मोबाईल मुलांना दिला पाहिजे याकडे बारकाईने लक्ष द्यावे. ज्यादा क्लासेसची सक्ती अजिबात करू नये आणि सर्वात महत्वाचे मानसिक स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवावे. कारण गेल्या नऊ महिन्यांपासून आपली मुले घरातच असल्याने मानसिक स्वास्थ्य सांभाळणे खूप महत्त्वाचे झाले आहे.

शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. हा विद्यार्थी गेल्या नऊ महिन्यांपासून घरात असल्याने त्याची नेमकी भूमिका काय यावरही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन कमी आणि ऑफलाईन जास्त अभ्यास कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. यासाठी वाचन व लेखनावर भर द्यावा. प्रश्नोत्तरांपेक्षा पाठ व कवितांच्या आकलनावर भर द्यावा. न समजलेल्या घटकांविषयी पालक व शिक्षकांशी संवाद साधावा. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव द्यावा. घरी असल्यामुळे आई-वडिलांच्या कामात मदत करावी आणि सर्वात महत्वाचे आपल्या स्वभावात चिडचिड न आणता मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नये.

अशा पद्धतीने शिक्षणक्षेत्रात झालेला हा खूप मोठा बदल स्वीकारणे शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा, अधिकारी, शासन-प्रशासन यांनी स्वीकारणे गरजेचे झाले आहे. झालेला हा बदल स्विकारला आणि समजून घेतले की सारे काही सोपे होऊ शकणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात आलेली ही शाळा समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने यात सहभाग नोंदविणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर मग, झालेला बदल स्वीकारूया आणि आपल्या प्रत्येकाच्या घरातील शाळेला समृद्ध करूया.

- डॉ. जगदीश पाटील, (मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती, पुणे)