शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या भेटीतून प्रगटले विश्वाचे आर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

अर्पण लोढा जामनेर : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें । अशीच अवस्था दोन संतांच्या भेटीतून प्रगटली आणि ...

अर्पण लोढा

जामनेर : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें । अशीच अवस्था दोन संतांच्या भेटीतून प्रगटली आणि अवघेचि जालें देहब्रह्म... असा अनुभव फर्दापूर परिसर आणि जामनेर तालुक्यातील बंजारा समाजाला आला. जैन समाजातर्फे आचार्य कल्पवृक्षनंदी महाराज तर बंजारा समाजाच्यावतीने श्याम चैतन्य महाराज यांच्या भेटीतून हे आर्त प्रगटले आणि पूर्वापार चालत आलेली प्राणी बळींची प्रथा बंद करण्याचा निर्णय बंजारा समाजाने घेत आदर्श निर्माण केला.

फर्दापूर परिसरातील फर्दापूर तांडा, जंगला तांडा, वरखेड़ी तांडा, निंबायती, लिहा तांडा व आजूबाजूच्या परिसरातील बंजारा समाजातील लोक नवस फेडण्यासाठी प्राण्यांचा बळी देत होते. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू होती. फर्दापूर येथील दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरासमोर प्राणी बळीचा हा प्रकार घडत होता.

दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भाविक येत असल्याने मोठीच चिंतेची बाब झाली होती.

जैन संत प. पू. आचार्य श्री १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज यांनी पुढाकार घेत बंजारा समाजाचे श्याम चैतन्य महाराज यांना हा प्रकार सांगितला. यावर काही दिवसांपूर्वी फर्दापूर येथे दोन्ही संतांची भेट झाली.

यानंतर शाम चैतन्य महाराज यांनी या परिसरातील बंजारा बांधवांची बैठक घेतली आणि या तीर्थस्थानासमोर कुठल्याही प्रकारे प्राण्यांचा बळी दिला जाऊ नये, असे आवाहन केले. या आवाहनाला समाजातील लोकांनी होकार दिला. त्यांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या तीर्थस्थानासमोरील हा प्रकार आता पूर्णत: बंद झाला आहे.

यावेळी बंजारा समाजाचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव चव्हाण, मोरसिंग राठोड, एन. टी. चव्हाण, सरपंच हिरालाल जाधव यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

फोटो

300721\1632-img-20210730-wa0058.jpg

समाज बांधवाना संबोधित करताना श्याम चैतन्य जी महाराज आणि प. पु. आचार्य कल्पवृक्ष नंनदीजी महाराज

फोटो :- अर्पण लोढा,वाकोद