शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

तापीतून पाणी उचलणाऱ्या संस्थांनी पाइपलाइनची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 19:37 IST

हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील पालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे उपविभाग विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले तापी नदी पात्रात १५ पर्यंत प्रतीक्षा

भुसावळ , जि.जळगाव : हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील नगरपालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे उपविभाग विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. दरम्यान, नदी पात्रातून सोडण्यात येणाºया पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्यामुळे संबंधित संस्थांतर्फे यापुढे पाईप लाईनची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा तापी पात्रातून पाणी मिळणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.येथील तापी पात्राच्या बंधाºयातील पाणी ८ रोजी संपले आहे. त्यामुळे शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. हतनूर प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात यावे , अशी मागणी नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे . मात्र ९ रोजी यावल, धरणगाव, चोपडा, अमळनेर या पालिकांसाठी उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी अमळनेरपर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे १५ तारखेच्या नंतर तापी पात्रातून सोडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता चौधरी यांनी दिली.भुसावळ पालिकेसह दीपनगर विद्युत प्रकल्प, रेल्वे, आरपीडी, जळगाव एमआयडीसीसाठी मात्र नदीपात्रातून पाणी सोडावे लागत असल्यामुळे दोन ते चार दिवस म्हणजे १५ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. १५ रोजी हतनूर प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतरही हे पाणी किमान पाच ते सहा दिवस शहरात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना या पाण्यासाठी तब्बल आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याची चोरी केल्यास गुन्हा दाखल होणारदरम्यान, तापी नदीपात्रातून त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी हे केवळ पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. हे पाणी सिंचनासाठी चोरून घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा गेटचे नुकसान केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पाटबंधारे खात्यातर्फे देण्यात आला आहे.भविष्यात नदीपात्रातून सोडणारे पाणी होणार बंददरम्यान, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीतून नदीपात्रातून पाणी सोडल्यानंतर या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. बाष्पीभवन होते. त्यामुळे ३० ते १०० किलोमीटर अंतरासाठी २० टक्के पाण्याची मागणी असते. धरणातून मात्र ७५ ते ८० टक्के पाणी सोडावे लागते. पाण्याचा हा अपव्यय रोखण्यासाठी तापी नदी पात्रातून पाणी उचलणाºया भुसावळ पालिका, दीपनगर वीज केंद्र, रेल्वे, जलगाव एमआयडीसीसह सर्वच संस्थांनी पाण्यासाठी पाइपलाइनची व्यवस्था करून पाणी घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. ज्या संस्था नदीपात्राच्या भरवशावर राहतील, त्यांना भविष्यात पाणी मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.‘अमृत’चे पाणी हतनूरच्या सोर्समधूनच घेणार- मुख्याधिकारी दोरकुळकरजिल्हाधिकाºयांच्या सूचनेसंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधला असता, अमृत योजनेचे नियोजन प्रकल्पाच्या सोर्समधूनच करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे भविष्यात पाईपलाईन टाकूनच शहराला पाणी आणण्यात येणार आहे. यावर्षी भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे तापी नदी पात्रातील पाण्यावरच शहर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांचा आदेश मात्र अद्यापही प्राप्त झाला नसल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ