शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

रानभाज्यांचा सुगंध दरवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:42 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, आत्मा, कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजन

जळगाव : पावसाळा आठवलं की, तोेंडाला पाणी आणणाऱ्या रानभाज्यांचा घमघमाट जाणवू लागतो. बाजारपेठेत अभावानेच दिसणाºया या रानभाज्यांची चव मात्र अनेकांच्या जीभेवर रेंगाळत राहते. पण याच रानभाज्यांचा सुगंध रविवारी जळगावात दरवळला. अनेक रानभाज्या एकाच छताखाली खरेदी करण्याची संधीही नागरिकांना मिळाली.निमित्त होते, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र जळगाव व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवचे! या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रोटरी क्लब जळगाव वेस्टचे प्रेसिडेंट तुषार चित्ते, सचिव प्रविण जाधव, रमण जाजू, डॉ. राजेश पाटील, किरण राणे, सुनिल अग्रवाल, डॉ. सुशिलकुमार राणे, प्रकल्प अध्यक्ष योगेश भोळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की,रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पाहता त्याचा आहारात वापर वाढला पाहिजे.रानभाज्या, त्यांची माहिती व त्यांचे आहारातील महत्व याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. अनंत पाटील तसेच मु. जे. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे मनोजकुमार चोपडा यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सरिता खाचणे व कावेरी राजपूत यांनी केले.उमेश पाटील व सहकाऱ्यांनी लिहीलेल्या रानभाज्या या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवा१ आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.२ कोरोनाच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे. रानभाज्यांचाही प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये मोठा वाटा असल्याचे पालकमंत्री म्हणाले.चांगला प्रतिसादया रानभाजी महोत्सवाला शेतकरी अन् ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ५०हून अधिक शेतकºयांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल यावेळी लावले होते. ग्राहकांनीही या रानभाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सुरक्षित अंतर पाळून ग्राहकांनी खरेदी केली. अनेक रानभाज्या बाजारपेठेतही उपलब्ध होत नाही, त्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहकांनीही खरेदीचा आनंद लुटला.रानभाज्या हातोहात संपल्यारविवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत रानभाज्यांचा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील सर्व रानभाज्या दुपारी १ वाजताच संपून गेल्या.विशेष म्हणजे या रानभाज्या कशा बनवायच्या याची कृतीही काही शेतकºयांनी स्टॉलवर लावली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव