शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्यांचा सुगंध दरवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:42 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, आत्मा, कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजन

जळगाव : पावसाळा आठवलं की, तोेंडाला पाणी आणणाऱ्या रानभाज्यांचा घमघमाट जाणवू लागतो. बाजारपेठेत अभावानेच दिसणाºया या रानभाज्यांची चव मात्र अनेकांच्या जीभेवर रेंगाळत राहते. पण याच रानभाज्यांचा सुगंध रविवारी जळगावात दरवळला. अनेक रानभाज्या एकाच छताखाली खरेदी करण्याची संधीही नागरिकांना मिळाली.निमित्त होते, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र जळगाव व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवचे! या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रोटरी क्लब जळगाव वेस्टचे प्रेसिडेंट तुषार चित्ते, सचिव प्रविण जाधव, रमण जाजू, डॉ. राजेश पाटील, किरण राणे, सुनिल अग्रवाल, डॉ. सुशिलकुमार राणे, प्रकल्प अध्यक्ष योगेश भोळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की,रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पाहता त्याचा आहारात वापर वाढला पाहिजे.रानभाज्या, त्यांची माहिती व त्यांचे आहारातील महत्व याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. अनंत पाटील तसेच मु. जे. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे मनोजकुमार चोपडा यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सरिता खाचणे व कावेरी राजपूत यांनी केले.उमेश पाटील व सहकाऱ्यांनी लिहीलेल्या रानभाज्या या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवा१ आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.२ कोरोनाच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे. रानभाज्यांचाही प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये मोठा वाटा असल्याचे पालकमंत्री म्हणाले.चांगला प्रतिसादया रानभाजी महोत्सवाला शेतकरी अन् ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ५०हून अधिक शेतकºयांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल यावेळी लावले होते. ग्राहकांनीही या रानभाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सुरक्षित अंतर पाळून ग्राहकांनी खरेदी केली. अनेक रानभाज्या बाजारपेठेतही उपलब्ध होत नाही, त्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहकांनीही खरेदीचा आनंद लुटला.रानभाज्या हातोहात संपल्यारविवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत रानभाज्यांचा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील सर्व रानभाज्या दुपारी १ वाजताच संपून गेल्या.विशेष म्हणजे या रानभाज्या कशा बनवायच्या याची कृतीही काही शेतकºयांनी स्टॉलवर लावली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव