शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:38 IST

धरणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देधरणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.धरणगाव येथे क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.

जळगाव - धरणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतीकारी आणि  प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविले जावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

धरणगाव येथे क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक सह कार्यवाहक भैयाजी जोशी, श्री. नायराणस्वामी, संस्थेचे अध्यक्ष श्री. भाईदास सोनवणे आदी उपस्थित होते.

क्रांतीकारी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा अफूचा व्यापार उध्वस्त करुन  त्यांना सळो की पळो करुन सोडले. या व्यापारातून निर्माण झालेली इंग्रजांची संपत्ती भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी वापरण्यात येवू नये असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या स्मृतीत आदिवासी बांधवांसाठी लोकोपयोगी केंद्र उभे रहावे ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

जनजाती समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. जल, जमीन आणि जंगल रक्षणाचे कार्य या समाजाने केले. अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारे कार्य करताना पारतंत्र्यात इंग्रजांविरुद्ध जोमाने लढा दिला. बाबुराव शणलाके आणि भिमा नाईक यासारख्या क्रांतिकारकांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

आदिवासी कल्याणासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. वनपट्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. 50 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी नामांकित शाळेत शिकण्याची संधी मिळाली आहे. पेसामधील आदिवासी गावांना ५ टक्के निधी थेट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. वनावर आदिवासींचा हक्क असावा यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्व भारतीय एक असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले बलिदान देशासाठी प्रेरणदायी आहे. समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रयत्न होत असून शासनासोबत सामाजिक संस्थानी कर्तव्यभावनेने पुढे आले पाहिजे असे जोशी यांनी म्हटले आहे. क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्र विकासासाठी प्रेरक ठरेल असा विश्वास व्यक्त करून केंद्रासाठी तयार केलेल्या आराखड्यास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. यावेळी नारायणस्वामी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला खा. ए.टी.पाटील, आ. स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, रा.स्व.संघाचे शरद ढोले, राजेश पाटील, चैत्राम पवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी खाज्याजी नाईक समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी फडणवीस यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार श्रीमती वाघ, अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalgaonजळगाव