शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

यावल येथे अतिरिक्त साठवण तलाव प्रस्तावास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:38 IST

शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या सध्याच्या तलावाव्यतिरिक्त अतिरिक्त साठवण तलावाच्या कामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देयावल शहरास किमान पाच महिने पाणी पुरणारगाळ काढण्याची सुविधाही होणार

यावल, जि.जळगाव : शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या सध्याच्या तलावाव्यतिरिक्त अतिरिक्त साठवण तलावाच्या तीन कोटी १४ लाख ३१ हजारांच्या कामाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन्ही तलाव एकदा भरले तर किमान पाच महिने शहरास पाणी टंचाई भासणार नसून, उन्हाळ्यातील टंचाई दूर होणार आहे.यावल शहरास हतनूर धरणावरून पाटचारी मार्गे यावल शहरातील साठवण तलावात पाणीसाठाी केला जातो. १९९९ मध्ये ३०० एमएलडी क्षमतेच्या तलावाचे काम होऊन शहरास पाणीपुरवठा केला जातो. तेव्हापासून तलावातील गाळ न काढल्याने तसेच तलावास गळती होत असल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने शहरास ४५ ते ५० दिवसच पाणीपुरवठा होऊ शकतो. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेने २२ फेब्रुवारी व १३ मार्च २०१७ च्या सर्वसाधारण सभेत नवीन साठवण तलाव बाधण्याच्या विषयास मंजुरी घेतली होती मात्र साडेतीन वर्ष होऊनदेखील या तलावाचे काम रखडले. प्रभारी नगराध्यक्ष नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या कारकीर्र्दीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या कामाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मंजुरी मिळवून तातडीने प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील योजनेतून तीन कोटी १४ लाख ३१ हजार ८६ रुपयांच्या कामाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. ही माहिती नगराध्यक्ष नौशाद तडवी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली आहे.दोन्ही तलावामुळे शहरास पाच महिने साठा पुरेलदोन्ही तलाव भरल्यानंतर शहरास हा साठा किमान पाच महिने पुरेल. हतनूर धरणातून वर्षभरासाठी सहा ते सात आवर्तन घ्यावे लागत होते. आता वर्षातून फक्त चार आवर्तण मिळाली तरी शहराची तहान भागवता येणार आहे. तसेच आता तलावातील गाळ काढणेही सोपे जाईल कारण एक तलाव भरलेला असला म्हणजे शहरवासीयांसाठी अडचण भासणार नाही. केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद झाल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीYawalयावल