शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मराठीसंबंधी ‘कुणी’ गंभीर व्हायला हवेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:33 IST

‘‘मराठीसंबंधी सरकार गंभीर नाही. निव्वळ समिती करणे आणि आलेले अहवाल ठेवून देणे अशा प्रकारे सरकारची वागणूक आहे.’’ असं जेव्हा ...

‘‘मराठीसंबंधी सरकार गंभीर नाही. निव्वळ समिती करणे आणि आलेले अहवाल ठेवून देणे अशा प्रकारे सरकारची वागणूक आहे.’’ असं जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक वगैरे म्हणतात आणि मराठी भाषेसाठी पाच मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही मांडणार असं सांगतात तेव्हा प्रश्न उभा राहतो, ‘‘गेल्या २०-२५ वर्षांपासून महाराष्टÑातील दिग्गज साहित्यिक काय करीत होते?’ आज राज्यभरातील २४ साहित्य संस्था, मराठीप्रेमी, शिक्षक संघटना व साहित्यिक जेव्हा मराठी भाषेविषयीच्या प्रश्नांबाबत मुंबईत धरणे आंदोलन करतात तेव्हा मराठी माध्यमांच्या शाळांची जी हालत (?) आज झालीये त्याला पूर्णत: सरकार जबाबदार आहे की समाज, याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा.अमराठी शाळांमधील मराठी सक्तीचा कायदा करणे, मराठी शाळांचा बृहत आराखडा राबविणे, मराठी भाषा भवन मुंबईत बांधणे,, मराठी भाषा धोरण राबवणे आणि गाव तिथे ग्रंथालय धोरणानुसार वाचन संस्कृतीच्या विकासासाठी काम करणे हे मुद्दे समोर ठेवत साहित्यिक तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत तेव्हा सेमी व इंग्रजी माध्यमांबाबत ते ‘काही’ बोलणार आहेत? आज महाराष्टÑात मोजक्या ‘प्युअर’ मराठी माध्यमाच्या शाळा सेमीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर माना टाकत असता दिग्गज साहित्यिकांनी एवढ्या १५-२० वर्षात कोणते ‘कडक’ पाऊल ऊचलत आंदोलन (तेही रस्त्यावर येत) केले होते? महाराष्टÑात इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्णत: बंद केल्या पाहिजेत, असे म्हणणारे साहित्यिक कोठे आहेत. राजकारण्यांना मराठी भाषेचे महत्व समजले नाही, हे म्हणणे सोपेय, पण एकूणच मराठी समाजाला साहित्यिकांना तरी ‘मराठी’ चे खरं महत्व समजलेय का? जर समजले असते तर आज राज्यभरातून ५०० प्रतिनिधी नव्हे पाच-पंचवीस लाख प्रतिनिधी आंदोलनात सामिल झाले असते. पण तेवढी ताकद नाही मराठी समाजात आहे ना मराठी साहित्यिकांमध्ये.-चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

टॅग्स :Jalgaonजळगाव