शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

मराठीसंबंधी ‘कुणी’ गंभीर व्हायला हवेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:33 IST

‘‘मराठीसंबंधी सरकार गंभीर नाही. निव्वळ समिती करणे आणि आलेले अहवाल ठेवून देणे अशा प्रकारे सरकारची वागणूक आहे.’’ असं जेव्हा ...

‘‘मराठीसंबंधी सरकार गंभीर नाही. निव्वळ समिती करणे आणि आलेले अहवाल ठेवून देणे अशा प्रकारे सरकारची वागणूक आहे.’’ असं जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक वगैरे म्हणतात आणि मराठी भाषेसाठी पाच मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही मांडणार असं सांगतात तेव्हा प्रश्न उभा राहतो, ‘‘गेल्या २०-२५ वर्षांपासून महाराष्टÑातील दिग्गज साहित्यिक काय करीत होते?’ आज राज्यभरातील २४ साहित्य संस्था, मराठीप्रेमी, शिक्षक संघटना व साहित्यिक जेव्हा मराठी भाषेविषयीच्या प्रश्नांबाबत मुंबईत धरणे आंदोलन करतात तेव्हा मराठी माध्यमांच्या शाळांची जी हालत (?) आज झालीये त्याला पूर्णत: सरकार जबाबदार आहे की समाज, याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा.अमराठी शाळांमधील मराठी सक्तीचा कायदा करणे, मराठी शाळांचा बृहत आराखडा राबविणे, मराठी भाषा भवन मुंबईत बांधणे,, मराठी भाषा धोरण राबवणे आणि गाव तिथे ग्रंथालय धोरणानुसार वाचन संस्कृतीच्या विकासासाठी काम करणे हे मुद्दे समोर ठेवत साहित्यिक तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत तेव्हा सेमी व इंग्रजी माध्यमांबाबत ते ‘काही’ बोलणार आहेत? आज महाराष्टÑात मोजक्या ‘प्युअर’ मराठी माध्यमाच्या शाळा सेमीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर माना टाकत असता दिग्गज साहित्यिकांनी एवढ्या १५-२० वर्षात कोणते ‘कडक’ पाऊल ऊचलत आंदोलन (तेही रस्त्यावर येत) केले होते? महाराष्टÑात इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्णत: बंद केल्या पाहिजेत, असे म्हणणारे साहित्यिक कोठे आहेत. राजकारण्यांना मराठी भाषेचे महत्व समजले नाही, हे म्हणणे सोपेय, पण एकूणच मराठी समाजाला साहित्यिकांना तरी ‘मराठी’ चे खरं महत्व समजलेय का? जर समजले असते तर आज राज्यभरातून ५०० प्रतिनिधी नव्हे पाच-पंचवीस लाख प्रतिनिधी आंदोलनात सामिल झाले असते. पण तेवढी ताकद नाही मराठी समाजात आहे ना मराठी साहित्यिकांमध्ये.-चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

टॅग्स :Jalgaonजळगाव