शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंजली दमानिया काढताहेत सबळ पुराव्यांअभावी पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:55 IST

अब्रुनुकसानी खटल्याप्रकरणी खडसे यांचा आरोप : ‘आरोप हास्यास्पद’-दमानिया

जळगाव : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये अब्रुनुकसानीचे खटले दाखल केले आहेत. परंतु दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या गेल्या ३ वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दमानिया यांच्यावर केला आहे.जळगावात रविवार, १२ जानेवारी रोजी बोलताना खडसे यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी दमानिया यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले होते. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे आमचे म्हणणे होते.त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध २७ ठिकाणी दमानिया यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहे.दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यांनिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रुनुकसानीपोटी भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे या दाव्यांमध्ये म्हटले आहे.जळगाव न्यायालयातदेखील भाजप कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांनी अ‍ॅड. व्ही. एच. पाटील यांच्यावतीने दमानिया यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे. तीन वर्षांपासून विविध न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. मात्र दमानिया ह्या पुरावे सादर करू शकलेल्या नाहीत. प्रत्येक सुनावणीला पुढची तारीख मागतात. तसेच वेगवेगळ््या ठिकाणी सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करतात. त्या पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरल्याने अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला. या वेळी अंजली दमानिया यांच्याव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या विषयावर बोलण्यास खडसेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला.राजकारणात काम न उरल्याने खडसेंचे रिकामे उद्योग-दमानिया४एकनाथराव खडसे यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि हास्यास्पद आहेत. राजकारणात त्यांना आता काहीही काम उरलेले नसल्यानेच ते असले उद्योग करीत आहेत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्यावर पलटवार केला.४त्या म्हणाल्या की, खडसे यांच्याविरोधात माझी लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याठिकाणी मी एक हजार १०० पानांची याचिका दाखल केली असून त्यात खडसे यांच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामुळे दमानिया न्यायालयात पुरावे सादर करू शकल्या नाहीत, त्या पळ काढत आहेत, हे आरोप हास्यास्पद आहेत. एवढेच नाही तर पुण्याला जो ‘सी समरी रिपोर्ट’ दाखल करण्यात आला होता, त्याला आव्हान देणारी प्रोटेस्ट पिटीशन दाखल केली होती. त्यावर आता ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.४जळगाव न्यायालयात अशोक लाडवंजारी यांनी जो दावा दाखल केला आहे, असे खडसे सांगत आहेत. परंतु, ते खोटं बोलत आहेत. तो खोटा दावा स्वत: खडसे यांनी केला आहे. त्यात २३ जानेवारीला सुनावणीस आपण हजर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव