शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अंजली दमानिया काढताहेत सबळ पुराव्यांअभावी पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:55 IST

अब्रुनुकसानी खटल्याप्रकरणी खडसे यांचा आरोप : ‘आरोप हास्यास्पद’-दमानिया

जळगाव : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये अब्रुनुकसानीचे खटले दाखल केले आहेत. परंतु दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या गेल्या ३ वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दमानिया यांच्यावर केला आहे.जळगावात रविवार, १२ जानेवारी रोजी बोलताना खडसे यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी दमानिया यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले होते. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे आमचे म्हणणे होते.त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध २७ ठिकाणी दमानिया यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहे.दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यांनिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रुनुकसानीपोटी भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे या दाव्यांमध्ये म्हटले आहे.जळगाव न्यायालयातदेखील भाजप कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांनी अ‍ॅड. व्ही. एच. पाटील यांच्यावतीने दमानिया यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे. तीन वर्षांपासून विविध न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. मात्र दमानिया ह्या पुरावे सादर करू शकलेल्या नाहीत. प्रत्येक सुनावणीला पुढची तारीख मागतात. तसेच वेगवेगळ््या ठिकाणी सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करतात. त्या पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरल्याने अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला. या वेळी अंजली दमानिया यांच्याव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या विषयावर बोलण्यास खडसेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला.राजकारणात काम न उरल्याने खडसेंचे रिकामे उद्योग-दमानिया४एकनाथराव खडसे यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि हास्यास्पद आहेत. राजकारणात त्यांना आता काहीही काम उरलेले नसल्यानेच ते असले उद्योग करीत आहेत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्यावर पलटवार केला.४त्या म्हणाल्या की, खडसे यांच्याविरोधात माझी लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याठिकाणी मी एक हजार १०० पानांची याचिका दाखल केली असून त्यात खडसे यांच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामुळे दमानिया न्यायालयात पुरावे सादर करू शकल्या नाहीत, त्या पळ काढत आहेत, हे आरोप हास्यास्पद आहेत. एवढेच नाही तर पुण्याला जो ‘सी समरी रिपोर्ट’ दाखल करण्यात आला होता, त्याला आव्हान देणारी प्रोटेस्ट पिटीशन दाखल केली होती. त्यावर आता ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.४जळगाव न्यायालयात अशोक लाडवंजारी यांनी जो दावा दाखल केला आहे, असे खडसे सांगत आहेत. परंतु, ते खोटं बोलत आहेत. तो खोटा दावा स्वत: खडसे यांनी केला आहे. त्यात २३ जानेवारीला सुनावणीस आपण हजर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव