शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:56 IST

अमळनेर येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती. आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी भरीव निधी खेचून आणावा, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे.

डिगंबर महालेअमळनेर, जि.जळगाव : येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती.आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी भरीव निधी खेचून आणावा, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे. अर्थात आमदार पाटील यांनी पांझरा माळन नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक घेऊन त्यांच्या कामाची दिशात्मक चुणूक दाखवली आहे. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प१) निम्न तापी पाडळसरे प्रकल्प१९९८ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा प्रवास संघर्षमय आहे. युती सरकारच्या काळात याची सुरुवात झाली आहे. यास २०११ ला जलआयोगाची तत्वत: मान्यता मिळाली आहे. २०१३ला पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र त्रुटी निघाल्याने २०१४ मध्ये त्रुटींची पूर्तता करण्यात आली. २०१८ मध्ये टीएसी कमिटीची मान्यता मिळाली. या प्रकल्पासाठी सर्वाधिक निधी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणला. त्यांनी सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सातत्याने दमदार पाठपुरावा केला. पाडळसरे प्रकल्पासाठी गुंतवणूक समितीची (आयसीसी) मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. प्राप्त माहितीनुसार त्यासाठीचा प्रस्तावही अद्याप सादर होणे बाकी आहे.२) नादुरुस्त व अपूर्ण उपसा सिंचन योजनापाडळसरे धरणातील पाणी साठ्याच्या वापरापासून परिसरातील शेतकरी वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तालुक्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना. बोहरा येथील साने गुरुजी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित असती तर मारवड परिसरातील अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ह्या योजनेचे थकीत वीजबिल टंचाई निधीतून माफ करून आणले होते. तसेच संस्थेवर बसलेले प्रशासकही हटविले होते. त्यांच्यानंतर मात्र या विषयास फारशी चालना मिळाली नाही. कृषिभूषण पाटील यांच्या काळात पाडळसरे धरणाचे जे काम झाले त्यामुळे या उपसा सिंचन योजनेच्या विहीरीजवळ मोठा व कायमस्वरूपी जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्यास फक्त राजकीय इच्छाशक्तीची आणि निधीची गरज आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मारवड परिसरातील अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. परिसरातील गावांच्या पिण्याचा पाण्याचीही समस्याही सुटेल.३) माळण पांझरा नदीजोड प्रकल्पतालुक्यातील पश्चिम भागातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी माळन पांझरा नदीजोड प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी तालुक्यातील रणाईचे, खडके, निसर्डी, वाघोदे, चिमनपुरी, पिंपळे, ढेकु, गलवाडे या गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक तसेच मारवड विकास मंच, रणाईचे विकास मंच यांनी गावोगावी बैठका घेतल्या. शासनालाही जागे करण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रयत्न करून सर्वेक्षणासाठी २० लक्ष रुपये मंजूर करून आले होते. त्यामुळे सर्वेक्षणही झाले. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला अद्यापही त्याबाबतचे बिल मिळाले नसल्याचे समजते. अनिल पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवातच या प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन केली. त्यातून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची त्यांची मानसिकता सकारात्मक असल्याचे दिसते.४) धार मालपूर पाझर तलावासाठी जीवनदायी ठरणारा वळण बंधारापुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळण बंधाºयाच्या माध्यमातून धार मालपूर बंधाºयात टाकण्यात येईल. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहीरींना लाभ मिळेल. तसेच अनेक गावांचा पिण्याचा प्रश्न सुटेल. हा प्रकल्प ११ गावांच्या शेती सिंचनासाठी खूपच उपयुक्त आहे.५) सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प सुरू ठेवणेतालुक्यातील सिंचन प्रकल्पांना वीज पुरवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सोलर प्रकल्प उभारून सिंचन योजना सुरू करण्यात अशी अनेकांची दीर्घकालीन अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अनिल पाटील यांनी या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा करणे. त्यासाठी भरीव निधी आणावा, ही जनतेची आग्रही अपेक्षा आहे.

टॅग्स :DamधरणAmalnerअमळनेर