शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

अंगणवाडी बालकांना अपघात विमा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:43 IST

अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : राज्यातील १ लाख ९ हजार अंगणवाडीतील कोट्यवधी बालकांना अपघात विमा योजनेचा लाभ नाहीबालकांना अपघात विमा प्रश्नी शासनाकडून उदासिनता

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दि.१२ रोजी एका चारचाकी वाहनाने कासोद्यातील साईबाबा मंदिराजवळ एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाºया गरीब आदिवासी मुलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. पण तिच्या दुर्दैवाने अंणवाडीत शिकत असणाºया कोणत्याही विद्यार्थ्यांना अपघात विम्याचा लाभ मिळत नसल्याची माहिती या घटनेनंतर मिळाल्याने ह्या अंगणवाडी विद्यार्थ्यांना पण अपघात विमा मिळाला पाहिजे, ही मागणी पालक वर्गातून पुढे आली आहे. यानंतर वरखेडी, ता.पाचोरा येथे १८ रोजी अंगणवाडीतील आणखी एका बालिकेचा अपघातात मृत्यू झाला.पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अशी काही दुर्घटना घडल्यास पीडित कुटुंंबाला त्वरित आधार दिला जातो. परंतु अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत.जळगाव जिल्ह्यातील ३६४० अंगणवाडीतून २ लाख ५० हजार विद्यार्थी सहा महिने ते ५ वर्षे वयोगटातून शिक्षण घेत आहेत, तर राज्यात १ लाख ९ हजार अंगणवाडीत शिक्षण घेणºया कोट्यवधी बालकांना कुठलीही अपघात विमा लागू करण्यात आलेली नसल्याने पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सध्या प्रत्येक पालकाला एक किंवा दोनच अपत्य असतात. यापैकी एकावर जरी अपघातात आघात आला तर कुटुंब सैरभैर होते. हा आघात पचवणे जिकिरीचे होते. त्यातच मोलमजुरी करणाºया गरीब कुटुंबात अशी घटना घडली तर पूर्ण कुटुंबच उघड्यावर येते. अशा कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात शासनाकडून पुढे आला पाहिजे, पण दुर्दैवाने या प्रश्नी आजपर्यंत उदासीनता दिसते आहे.अंगणवाडी बालकांना कुठल्याही अपघात विमा योजनेचे संरक्षण नाही. त्यामुळे कासोद्यातील अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेला कुठलाही लाभ देता येत नाही.-शीतल पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं.स., एरंडोलहा अतिशय गंभीर प्रश्न आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळवून देणेसाठी या अधिवेशनातच याप्रश्नी लक्ष वेधले जाईल.-आ.चिमणराव पाटील, एरंडोलइयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा मिळतो. तसा अंगणवाडीतील बालकांनादेखील असेच संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करणार आहे.-उज्वला पाटील, अध्यक्षा, जि.प., जळगावगेली आठ वर्षे मी जिल्हा परिषदेत काम करीत आहे. पण आजतागायत अंगणवाडीतील एकाही बालकाला अपघात विम्याचा लाभ मिळाला किंवा तशी घटना घडली, अशी माहिती नाही.-रफिक तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव

टॅग्स :SchoolशाळाErandolएरंडोल