शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

अंगणवाडी बालकांना अपघात विमा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:43 IST

अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : राज्यातील १ लाख ९ हजार अंगणवाडीतील कोट्यवधी बालकांना अपघात विमा योजनेचा लाभ नाहीबालकांना अपघात विमा प्रश्नी शासनाकडून उदासिनता

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दि.१२ रोजी एका चारचाकी वाहनाने कासोद्यातील साईबाबा मंदिराजवळ एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाºया गरीब आदिवासी मुलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. पण तिच्या दुर्दैवाने अंणवाडीत शिकत असणाºया कोणत्याही विद्यार्थ्यांना अपघात विम्याचा लाभ मिळत नसल्याची माहिती या घटनेनंतर मिळाल्याने ह्या अंगणवाडी विद्यार्थ्यांना पण अपघात विमा मिळाला पाहिजे, ही मागणी पालक वर्गातून पुढे आली आहे. यानंतर वरखेडी, ता.पाचोरा येथे १८ रोजी अंगणवाडीतील आणखी एका बालिकेचा अपघातात मृत्यू झाला.पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अशी काही दुर्घटना घडल्यास पीडित कुटुंंबाला त्वरित आधार दिला जातो. परंतु अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत.जळगाव जिल्ह्यातील ३६४० अंगणवाडीतून २ लाख ५० हजार विद्यार्थी सहा महिने ते ५ वर्षे वयोगटातून शिक्षण घेत आहेत, तर राज्यात १ लाख ९ हजार अंगणवाडीत शिक्षण घेणºया कोट्यवधी बालकांना कुठलीही अपघात विमा लागू करण्यात आलेली नसल्याने पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सध्या प्रत्येक पालकाला एक किंवा दोनच अपत्य असतात. यापैकी एकावर जरी अपघातात आघात आला तर कुटुंब सैरभैर होते. हा आघात पचवणे जिकिरीचे होते. त्यातच मोलमजुरी करणाºया गरीब कुटुंबात अशी घटना घडली तर पूर्ण कुटुंबच उघड्यावर येते. अशा कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात शासनाकडून पुढे आला पाहिजे, पण दुर्दैवाने या प्रश्नी आजपर्यंत उदासीनता दिसते आहे.अंगणवाडी बालकांना कुठल्याही अपघात विमा योजनेचे संरक्षण नाही. त्यामुळे कासोद्यातील अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेला कुठलाही लाभ देता येत नाही.-शीतल पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं.स., एरंडोलहा अतिशय गंभीर प्रश्न आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळवून देणेसाठी या अधिवेशनातच याप्रश्नी लक्ष वेधले जाईल.-आ.चिमणराव पाटील, एरंडोलइयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा मिळतो. तसा अंगणवाडीतील बालकांनादेखील असेच संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करणार आहे.-उज्वला पाटील, अध्यक्षा, जि.प., जळगावगेली आठ वर्षे मी जिल्हा परिषदेत काम करीत आहे. पण आजतागायत अंगणवाडीतील एकाही बालकाला अपघात विम्याचा लाभ मिळाला किंवा तशी घटना घडली, अशी माहिती नाही.-रफिक तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव

टॅग्स :SchoolशाळाErandolएरंडोल