शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:41 IST

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे  जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम ...

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे 

जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सुरूच असून वेळेवर आलेल्या या या पावसामुळे कपाशीसह उडीद, मूग व इतर पिकांना फायदा झाला आहे. मात्र आता आणखी हा भिज पाऊस असाच सुरू राहिला तर बुरशी लागण्याचीही भीती शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.  या पावसामुळे धरण साठ्यातही वाढ होत असून गिरणा धरणाची पाणी पातळी ५२ टक्क्यांच्या पुढे गेली असून हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे १४ दरवाजे अजूनही उघडेच आहेत. दुसरीकडे पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणात पावासाच्या सरी सुरूच असून रविवारीदेखील दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाचे मंगळवारी पुनरागन झाले. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून सलग पाऊस   सुरूच आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे पिके तरारत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र आता हा पाऊस आणखी काही दिवस सुरूच राहिला तर कपाशीसह, उडीद, मूग व इतर पिकांनाही बुरशी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गिरणा धरणाच्या साठ्यात वाढगिरणा धरणाच्या पाणी साठ्यात या पावसामुळे वाढ होऊन धरण साठा  ५२ टक्क्यांच्यापुढे गेला आहे. धरणात ५२.१ टक्के पाणीसाठा झाला असून वाघूर धरणात ८७.४२ तर हतनूर धरणात १८.९० टक्के पाणीसाठी झाला आहे. हतनूर १४ दरवाजे उघडेचहतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे अजूनही पूर्ण उघडचेच आहे. धरणात येणाºया पाण्याचा वेग पाहता १४ आॅगस्ट रोजी धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने दरवाजे बंद करण्यात आले. यात रविवारी  १४ दरवाजे पूर्ण उघडे होते. त्यामुळे धरणातून ३१ हजार २२३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची आवक सुरूच आहे.    पांझरा पात्रात वाढणार विसर्ग पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेल्या  मालनगाव मध्यम  प्रकल्प (ता. साक्री) व जामखेडी मध्यम प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून अनुक्रमे १६१०  व ४१९  क्युसेक्स वेगाने विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे रविवारी सकाळी ९ वाजता दोन दरवाजे अर्धामीटरने  उघडण्यात आले असून  २०८० क्युसेक्स विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव