शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:41 IST

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे  जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम ...

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे 

जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सुरूच असून वेळेवर आलेल्या या या पावसामुळे कपाशीसह उडीद, मूग व इतर पिकांना फायदा झाला आहे. मात्र आता आणखी हा भिज पाऊस असाच सुरू राहिला तर बुरशी लागण्याचीही भीती शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.  या पावसामुळे धरण साठ्यातही वाढ होत असून गिरणा धरणाची पाणी पातळी ५२ टक्क्यांच्या पुढे गेली असून हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे १४ दरवाजे अजूनही उघडेच आहेत. दुसरीकडे पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणात पावासाच्या सरी सुरूच असून रविवारीदेखील दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाचे मंगळवारी पुनरागन झाले. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून सलग पाऊस   सुरूच आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे पिके तरारत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र आता हा पाऊस आणखी काही दिवस सुरूच राहिला तर कपाशीसह, उडीद, मूग व इतर पिकांनाही बुरशी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गिरणा धरणाच्या साठ्यात वाढगिरणा धरणाच्या पाणी साठ्यात या पावसामुळे वाढ होऊन धरण साठा  ५२ टक्क्यांच्यापुढे गेला आहे. धरणात ५२.१ टक्के पाणीसाठा झाला असून वाघूर धरणात ८७.४२ तर हतनूर धरणात १८.९० टक्के पाणीसाठी झाला आहे. हतनूर १४ दरवाजे उघडेचहतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे अजूनही पूर्ण उघडचेच आहे. धरणात येणाºया पाण्याचा वेग पाहता १४ आॅगस्ट रोजी धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने दरवाजे बंद करण्यात आले. यात रविवारी  १४ दरवाजे पूर्ण उघडे होते. त्यामुळे धरणातून ३१ हजार २२३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची आवक सुरूच आहे.    पांझरा पात्रात वाढणार विसर्ग पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेल्या  मालनगाव मध्यम  प्रकल्प (ता. साक्री) व जामखेडी मध्यम प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून अनुक्रमे १६१०  व ४१९  क्युसेक्स वेगाने विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे रविवारी सकाळी ९ वाजता दोन दरवाजे अर्धामीटरने  उघडण्यात आले असून  २०८० क्युसेक्स विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव