शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

अमळनेरचे झाले ‘बिका’नेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:17 IST

उमेदवार बाहेरचे : हाणामारीच्या घटनांचीही परंपरा

अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमि , साने गुरुजींची कर्मभूमि , श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमि आणि कधीकाळी क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या अमळनेर शहराला काही दिवसांपूर्वी लागलेल्या ‘बिका’नेर या विशेषणानंतर नुकत्याच भाजप अंतर्गत झालेल्या राडयामुळे राजकीय नेत्यांची रणभूमी असे नवीन विशेषण लागले असून पुन्हा एकदा अमळनेर शहर राज्यात चर्चेत आले आहे.कधीकाळी अमळनेरहून लंडनला जाणाऱ्या प्रताप मिलच्या सुती कपड्यामुळे म्हणा किंवा पटेल जर्दा असो किंवा प्रताप तत्वज्ञान केंद्र असो की जगप्रसिद्ध विप्रो कंपनीच्या ‘मदर युनिट’ मुळे किंवा अलीकडेच २० वर्षांपासून नावारूपाला आलेले मंगळदेव ग्रह मंदिर असो अमळनेरचे नाव नेहमी चर्चेत आणि अग्रेसर राहिले आहे. त्याचप्रमाणे राजकीय नेते व घडामोडींमुळे ही अग्रेसरच राहिले आहे.राजकीय क्षेत्र सतत चर्चेतखान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली ती तत्कालीन जनता दलाचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यामुळे! अमळनेर म्हणजे आक्रमकता हे विशेषणही लागले. मुलाला शिवीगाळ केली म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद मुंदडा यांनी नवले नावाच्या पोलीस अधिकाºयाला पोलीस स्टेशनमध्येच खाली फेकले होते. त्याच गोविंद मुंदडा यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या वादातून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर हात उचलला होता. ही राजकीय मारामारी चांगलीच रंगली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदार आणले म्हणून अनिल भाईदास पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात केलेली तक्रार व वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला.उमेदवार लादलेलेविधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक वर्षात उमेदवार बाहेरचेच विजयी झाले आहेत. १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने डॉ. बी.एस. पाटील यांना उमेदवारी दिली. ते बाहेरचे म्हणून चर्चाही झाली मात्र त्याचा फारसा परिणाम न होता ते विजयी झाले. ते तीन पंचवार्षिकमध्ये आमदार होते. त्यानंतर साहेबराव पाटील हे आमदार झाले. तेदेखील मुळचे पारोळा तालुक्यातील राजवड येथील. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील शिरीष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला. पैसा खर्च करा व निवडून या असेच या मतदार संघाबाबत झाले असून ‘अमळनेरचे ‘बिका’नेर झाले असे विशेषण लावले जात आहे.हाणामारीची परंपरानगरपालिका निवडणुकीत अनिल भाईदास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात झालेल्या मारामारीने आणि दंगलीमुळे तोडफोड नुकसान होऊन राजकीय नेत्यांनी अमळनेर ला चर्चेत आणले. कार्यकर्त्यांमध्ये गलिच्छ राजकारणाची नशा चढली. अनेक दिवस तणावपूर्वक वातावरण होते. त्यादरम्यान अनिल भाईदास पाटील व माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यातील वैमनस्य, उदय वाघ व अनिल भाईदास पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष, तसेच वाघ व बी. एस. पाटील यांच्यातील संघर्ष भाजप च्या विधानसभा व पालिका पराभवाला कारणीभूत ठरला.

टॅग्स :Politicsराजकारण