शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अमळनेरचे झाले ‘बिका’नेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:17 IST

उमेदवार बाहेरचे : हाणामारीच्या घटनांचीही परंपरा

अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमि , साने गुरुजींची कर्मभूमि , श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमि आणि कधीकाळी क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या अमळनेर शहराला काही दिवसांपूर्वी लागलेल्या ‘बिका’नेर या विशेषणानंतर नुकत्याच भाजप अंतर्गत झालेल्या राडयामुळे राजकीय नेत्यांची रणभूमी असे नवीन विशेषण लागले असून पुन्हा एकदा अमळनेर शहर राज्यात चर्चेत आले आहे.कधीकाळी अमळनेरहून लंडनला जाणाऱ्या प्रताप मिलच्या सुती कपड्यामुळे म्हणा किंवा पटेल जर्दा असो किंवा प्रताप तत्वज्ञान केंद्र असो की जगप्रसिद्ध विप्रो कंपनीच्या ‘मदर युनिट’ मुळे किंवा अलीकडेच २० वर्षांपासून नावारूपाला आलेले मंगळदेव ग्रह मंदिर असो अमळनेरचे नाव नेहमी चर्चेत आणि अग्रेसर राहिले आहे. त्याचप्रमाणे राजकीय नेते व घडामोडींमुळे ही अग्रेसरच राहिले आहे.राजकीय क्षेत्र सतत चर्चेतखान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली ती तत्कालीन जनता दलाचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यामुळे! अमळनेर म्हणजे आक्रमकता हे विशेषणही लागले. मुलाला शिवीगाळ केली म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद मुंदडा यांनी नवले नावाच्या पोलीस अधिकाºयाला पोलीस स्टेशनमध्येच खाली फेकले होते. त्याच गोविंद मुंदडा यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या वादातून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर हात उचलला होता. ही राजकीय मारामारी चांगलीच रंगली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदार आणले म्हणून अनिल भाईदास पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात केलेली तक्रार व वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला.उमेदवार लादलेलेविधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक वर्षात उमेदवार बाहेरचेच विजयी झाले आहेत. १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने डॉ. बी.एस. पाटील यांना उमेदवारी दिली. ते बाहेरचे म्हणून चर्चाही झाली मात्र त्याचा फारसा परिणाम न होता ते विजयी झाले. ते तीन पंचवार्षिकमध्ये आमदार होते. त्यानंतर साहेबराव पाटील हे आमदार झाले. तेदेखील मुळचे पारोळा तालुक्यातील राजवड येथील. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील शिरीष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला. पैसा खर्च करा व निवडून या असेच या मतदार संघाबाबत झाले असून ‘अमळनेरचे ‘बिका’नेर झाले असे विशेषण लावले जात आहे.हाणामारीची परंपरानगरपालिका निवडणुकीत अनिल भाईदास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात झालेल्या मारामारीने आणि दंगलीमुळे तोडफोड नुकसान होऊन राजकीय नेत्यांनी अमळनेर ला चर्चेत आणले. कार्यकर्त्यांमध्ये गलिच्छ राजकारणाची नशा चढली. अनेक दिवस तणावपूर्वक वातावरण होते. त्यादरम्यान अनिल भाईदास पाटील व माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यातील वैमनस्य, उदय वाघ व अनिल भाईदास पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष, तसेच वाघ व बी. एस. पाटील यांच्यातील संघर्ष भाजप च्या विधानसभा व पालिका पराभवाला कारणीभूत ठरला.

टॅग्स :Politicsराजकारण