शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

७७९ कोटींचे जाऊ द्या हो, आधी खड्ड्यांमध्ये मुरुम टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:16 IST

खराब रस्त्यांमुळे पाठ, मणक्याचा त्रास : मुरुम टाकण्याचा मुहूर्त केव्हा?

जळगाव : शहरात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली आहे. सर्वदूर चिखल पसरला आहे. तसेच खराब रस्ते व खड्डयामुळे वाहनधारकांना पाठ व कंबर दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे ७७९ कोटींचा निधीतून काय कामे होतील ते करा मात्र, आधी खराब रस्त्यांमध्ये मुरुम टाका असेच जळगावकर म्हणत आहेत.अमृत योजनेमुळे जळगावकरांना कधी नव्हे तेवढा त्रास यंदाच्या पावसाळ्यात सहन करावा लागत आहे. आधी रस्त्यांची पुर्णपुणे वाट लागलेली. त्यातच पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदल्यानंतर त्या रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती न झाल्यामुळे खोदण्यात आलेल्या भागाची सर्व माती रस्त्यावर पसरून चिखल तयार झाला आहे. चिखलाचा आधीच त्रास होत असताना त्यातच खराब रस्त्यांमध्ये तयार झालेल्या खड्डयांची भर पडली आहे. रायसोनी नगरात तर पायी चालणेही अवघड झालेले आहे. मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनेही फेऱ्याने न्यावी लागत आहे.वाहनांचेही होत आहे नुकसानखराब रस्त्यांमुळे व खड्डयामुळे केवळ माणसांच्या पाठीच्या मणक्यांचीच नाही तर दुचाकी व चारचाकी वाहनांचीही वाट लागत आहे. खड्डयांमुळे मोटारसायकलच्या टायर ट्यूबपासून कारच्या बॉडीपर्यंत अनेक पार्ट्स खराब होत आहेत. शॉकअप खराब होत आहे. तसेच चिखलामुळे वाहने अनेक ठिकाणी घसरत असल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. रिंगरोड, जिल्हाधिकारी निवासस्थानपुढील रस्ता, शिवाजी नगर या भागातील रस्त्ये मधोमध खोदल्यामुळे सर्वच रस्ते खराब झाले आहेत.पावसानंतर धुलीकणांच्या प्रमाणात होते वाढपावसामुळे सध्या रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर रस्ते कोरडे झाल्यांनंतर धुलीकणांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ असते. यामुळे देखील आरोग्यवर परिणाम होत असून, श्वसनाचे विकार मोठया प्रमाणात होतात.तसेच अँलर्जी असणाºया रुणांना त्रास होतो. सर्दी, खोकला आणि डोळे चुरचुरणे आदींचा त्रास होऊ शकतो. तसेच धुळीमुळे त्वचेचे विकार होतात.खचलेल्या रस्त्यांमुळे जास्त त्रास‘लोकमत’ ने शहरातील काही पाहणी केली. अमृतमुळे खोदलेल्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून केलेल्या दुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी आता पावसामुुळे खोदलेला भाग मुख्य रस्त्यांपासून खोल गेला आहे. त्यामुळे एक ते दीड इंचापासून ४ ते ५ इंच खालीपर्यंतचे शेकडो खड्डे शहरात तयार झाले आहेत. तसेच या खड्डयामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डयांची खोली देखील वाहनधारकांना कळत नाही.त्यामुळे वाहनधारकांना कंबरेपासून ते मानेपर्यंतच्या भागाला जोरदार झटका बसतो. कंबरेच्या वरील माकड हाड व पाठीचा मणका दाबला जाऊन मानेपर्यंत त्याच्या वेदना जाणवत आहेत. कधी कधी थेट मेंदूपर्यंत कळ जाते. हाडे ठिसूळ असलेल्या व्यक्तीला हा धक्का अतिशय वेदनादायी ठरतो.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव