शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युती -आघाडीत आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:42 IST

‘मोदी मोदी..’, ‘चौकीदार चौर है..’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

जळगाव : मतदानाची तारीख ़जवळ येत असतानाच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अधिकच पेटल्याचे दिसत आहे़ याचाच प्रत्यय जळगावातील रोटरी भवनात आयोजित चर्चासत्रात आला़ महायुती व महाआघाडीचे दोन्ही उमेदवार व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता़ भाजपकडून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या तर त्याला राष्ट्रवादीकडून ‘चौकीदार चोर है..’ने प्रत्युत्तर देण्यात आले़ या घोषणांनी परिसर दणाणला होता़ महायुतीकडून उमेदवार आमदार उन्मेष पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी तर महाआघाडीकडून उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ दोन तासाच्या या कार्यक्रमात जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांवर जोरदार चर्चा झाली़ ‘न्यूज १८ लोकमत’च्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण नव्हे चर्चा या आमने सामने चर्चासत्राचे आयोजन रोटरी भवनात करण्यात आले होते़ यावेळी कृषी, सिंचन, रोजगार, महिलांचे प्रश्न, यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली़ दोनही पक्षांच्या उमदेवारांनी आपापली मते मांडली़ यात गुलाबराव देवकरांपेक्षा आपण पाच वर्षात चार पटीने अधिक कामे केल्याचा दावा आमदार उन्मेष पाटील यांनी केला़ यावर ‘तुम्ही एकतरी ठोस काम सांगा’ असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला़ महिलांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या माहिला आघाडीने आक्रमक भूमिका मांडत भाजपने उमेदवारी काढून घेत एका महिलेचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली़ यावर उमेदवारी कोणाला देणं न देण्ां हा निर्णय पक्षांअर्तगत असतो मात्र, उत्तर महाराष्ट्रात तीन महिलांना उमेदवारी देऊन भाजपनेच खरा महिलांचा सन्मान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला़ सिंचनाच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी झाली़ मित्रपक्षाच्या आमदारांना आंदोलने करावी लागतात असे सांगत हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला़ यावर आंदोलन हा माझा मूळ स्वभाव आहे़ तेव्हा आमदार असताना मी शेतकºयांच्या तक्रारी मांडल्याचे स्पष्टीकरण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले़ शिवसेना मंत्री खिशात राजीनामा ठेवायचे मात्र तो कधी बघितला नाही, असा टोला राष्ट्रवादीच्या गोटातून झाल्यानंतर परकिय स्त्रीने या देशावर राज्य करून नये या मुद्यावरून स्थापन झालेल्या राष्ट्रवादीला राजीनाम्यांबद्दल बोलायचा कसलाही अधिकार नसल्याचे उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले़ जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असतानाही एकाही सिंचन प्रकल्पाचे ठोस काम झाले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला यावर आतापर्यंतचा सर्वाधिक निधी सिंचनासाठी भाजप सरकारच्या काळात आल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले़ उमेदवारी बदलण्याच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ येथील सभेची आठवण करून देत उमेदवारी बदलायला हिंमत लागते. असा टोला पाटील यांनी मारला. यावर जीगर नाही तर महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे प्रत्युत्तर गुलाबराव देवकर यांनी दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव