शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युती -आघाडीत आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:42 IST

‘मोदी मोदी..’, ‘चौकीदार चौर है..’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

जळगाव : मतदानाची तारीख ़जवळ येत असतानाच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अधिकच पेटल्याचे दिसत आहे़ याचाच प्रत्यय जळगावातील रोटरी भवनात आयोजित चर्चासत्रात आला़ महायुती व महाआघाडीचे दोन्ही उमेदवार व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता़ भाजपकडून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या तर त्याला राष्ट्रवादीकडून ‘चौकीदार चोर है..’ने प्रत्युत्तर देण्यात आले़ या घोषणांनी परिसर दणाणला होता़ महायुतीकडून उमेदवार आमदार उन्मेष पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी तर महाआघाडीकडून उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ दोन तासाच्या या कार्यक्रमात जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांवर जोरदार चर्चा झाली़ ‘न्यूज १८ लोकमत’च्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण नव्हे चर्चा या आमने सामने चर्चासत्राचे आयोजन रोटरी भवनात करण्यात आले होते़ यावेळी कृषी, सिंचन, रोजगार, महिलांचे प्रश्न, यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली़ दोनही पक्षांच्या उमदेवारांनी आपापली मते मांडली़ यात गुलाबराव देवकरांपेक्षा आपण पाच वर्षात चार पटीने अधिक कामे केल्याचा दावा आमदार उन्मेष पाटील यांनी केला़ यावर ‘तुम्ही एकतरी ठोस काम सांगा’ असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला़ महिलांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या माहिला आघाडीने आक्रमक भूमिका मांडत भाजपने उमेदवारी काढून घेत एका महिलेचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली़ यावर उमेदवारी कोणाला देणं न देण्ां हा निर्णय पक्षांअर्तगत असतो मात्र, उत्तर महाराष्ट्रात तीन महिलांना उमेदवारी देऊन भाजपनेच खरा महिलांचा सन्मान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला़ सिंचनाच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी झाली़ मित्रपक्षाच्या आमदारांना आंदोलने करावी लागतात असे सांगत हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला़ यावर आंदोलन हा माझा मूळ स्वभाव आहे़ तेव्हा आमदार असताना मी शेतकºयांच्या तक्रारी मांडल्याचे स्पष्टीकरण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले़ शिवसेना मंत्री खिशात राजीनामा ठेवायचे मात्र तो कधी बघितला नाही, असा टोला राष्ट्रवादीच्या गोटातून झाल्यानंतर परकिय स्त्रीने या देशावर राज्य करून नये या मुद्यावरून स्थापन झालेल्या राष्ट्रवादीला राजीनाम्यांबद्दल बोलायचा कसलाही अधिकार नसल्याचे उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले़ जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असतानाही एकाही सिंचन प्रकल्पाचे ठोस काम झाले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला यावर आतापर्यंतचा सर्वाधिक निधी सिंचनासाठी भाजप सरकारच्या काळात आल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले़ उमेदवारी बदलण्याच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ येथील सभेची आठवण करून देत उमेदवारी बदलायला हिंमत लागते. असा टोला पाटील यांनी मारला. यावर जीगर नाही तर महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे प्रत्युत्तर गुलाबराव देवकर यांनी दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव