शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

युती -आघाडीत आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:42 IST

‘मोदी मोदी..’, ‘चौकीदार चौर है..’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

जळगाव : मतदानाची तारीख ़जवळ येत असतानाच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अधिकच पेटल्याचे दिसत आहे़ याचाच प्रत्यय जळगावातील रोटरी भवनात आयोजित चर्चासत्रात आला़ महायुती व महाआघाडीचे दोन्ही उमेदवार व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता़ भाजपकडून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या तर त्याला राष्ट्रवादीकडून ‘चौकीदार चोर है..’ने प्रत्युत्तर देण्यात आले़ या घोषणांनी परिसर दणाणला होता़ महायुतीकडून उमेदवार आमदार उन्मेष पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी तर महाआघाडीकडून उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ दोन तासाच्या या कार्यक्रमात जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांवर जोरदार चर्चा झाली़ ‘न्यूज १८ लोकमत’च्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण नव्हे चर्चा या आमने सामने चर्चासत्राचे आयोजन रोटरी भवनात करण्यात आले होते़ यावेळी कृषी, सिंचन, रोजगार, महिलांचे प्रश्न, यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली़ दोनही पक्षांच्या उमदेवारांनी आपापली मते मांडली़ यात गुलाबराव देवकरांपेक्षा आपण पाच वर्षात चार पटीने अधिक कामे केल्याचा दावा आमदार उन्मेष पाटील यांनी केला़ यावर ‘तुम्ही एकतरी ठोस काम सांगा’ असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला़ महिलांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या माहिला आघाडीने आक्रमक भूमिका मांडत भाजपने उमेदवारी काढून घेत एका महिलेचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली़ यावर उमेदवारी कोणाला देणं न देण्ां हा निर्णय पक्षांअर्तगत असतो मात्र, उत्तर महाराष्ट्रात तीन महिलांना उमेदवारी देऊन भाजपनेच खरा महिलांचा सन्मान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला़ सिंचनाच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी झाली़ मित्रपक्षाच्या आमदारांना आंदोलने करावी लागतात असे सांगत हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला़ यावर आंदोलन हा माझा मूळ स्वभाव आहे़ तेव्हा आमदार असताना मी शेतकºयांच्या तक्रारी मांडल्याचे स्पष्टीकरण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले़ शिवसेना मंत्री खिशात राजीनामा ठेवायचे मात्र तो कधी बघितला नाही, असा टोला राष्ट्रवादीच्या गोटातून झाल्यानंतर परकिय स्त्रीने या देशावर राज्य करून नये या मुद्यावरून स्थापन झालेल्या राष्ट्रवादीला राजीनाम्यांबद्दल बोलायचा कसलाही अधिकार नसल्याचे उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले़ जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असतानाही एकाही सिंचन प्रकल्पाचे ठोस काम झाले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून झाला यावर आतापर्यंतचा सर्वाधिक निधी सिंचनासाठी भाजप सरकारच्या काळात आल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले़ उमेदवारी बदलण्याच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ येथील सभेची आठवण करून देत उमेदवारी बदलायला हिंमत लागते. असा टोला पाटील यांनी मारला. यावर जीगर नाही तर महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे प्रत्युत्तर गुलाबराव देवकर यांनी दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव