शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा पाच महिन्यानंतर सर्व दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:15 IST

आजपासून ‘सम-विषम’ बंद : बाजारपेठेत चैतन्य येण्याचा व्यापाऱ्यांना विश्वास

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद व नंतर सम-विषम पद्धतीने सुरू झालेल्या बाजारपेठेतील सर्व दुकाने आता पाच महिने १० दिवसांनंतर सोमवार, ३१ आॅगस्टपासून पूर्णपणे सुरू होणार आहे. यामुळे आता व्यापाराला अधिक गती येऊन बाजारपेठेत अधिक चैतन्य येईल, असा विश्वास व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २२ मार्च रोजी असलेला ‘जनता कर्फ्यू’ व त्यानंतर २३ मार्चपासून करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यानंतर १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील व्यापारी संकुल वगळता रस्त्यांवरील दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र व्यापारी संकुले बंद असल्याने ती सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. यात २० जुलैपासून ही संकुले सुरू करण्याची मुभा देण्यात आली खरी मात्र त्यात २० पेक्षा कमी दुकाने असलेले संकूल सम-विषम पद्धतीने उघडावी व इतर मोठ्या संकुलांना केवळ आॅनलाईन व्यवसायाची परवानगी देण्यात आली. यात ही संकुले सुरू झाले तरी आॅनलाईन व्यवहाराच्या पुरेसा सुविधा नसल्याने व्यापारी वर्ग चिंतेतच होते.त्यानंतर मात्र ५ आॅगस्टपासून व्यापारी संकुलांमध्ये प्रत्यक्ष व्यवसायाचीही परवानगी देण्यात आली.मात्र त्यातही आठवड्यातील चारच दिवस दुकाने सुरू ठेवता येतील अशी अट टाकण्यात आली. मात्र, तरीही रविवार व शनिवार वगळता सर्व दुकाने दररोज उघडण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत होती.अखेर मनपाने व्यापाऱ्यांच्या मागणीवर शिक्कामोर्तब करीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता शनिवार व रविवार वगळता इतर दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडता येणार आहे. शनिवार व रविवार केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहणार आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव