शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कासोद्यात अग्नीतांडव, १० घरे खाक, दहा कुटुंबांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:22 IST

कासोदा ता. एरंडोल येथे सोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर जीन झोपडपट्टी या भागात अचानक आग लागून दहा घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दहा कुटुंब उघड्यावर आले आहेत.

ठळक मुद्देसोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर लागलेल्या आगीने गिळंकृत केली दहा घरेगावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करीत विझवली आगलग्नानिमित्त एका कुटुंबाने खरेदी केलेले साहित्याची राख

आॅनलाईन लोकमतकासोदा, ता. एरंडोल : येथील जीन झोपडपट्टी या अत्यंत दाटीवाटीच्या भागात सोमवारी पहाटे (दि.१९) अडीच वाजेनंतर अचानक आग लागली. त्यात दहा कुटुंबांचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतून या दहा कुटुंबांतील सदस्यांच्या अंगावरील कपडेच तेवढे शिल्लक राहिले आहेत. पहाटे पहाटेच घरांची राखरांगोळी झाल्याचे भयावह चित्र गावकऱ्यांना पहावे लागल्याने पिडीत कुटूंबांसह पहाणाºयांचेही काळीज पाणावले आहे.आनंद आणि उत्साहाने साजरा झालेल्या गुढी पाडव्याच्या उत्तर रात्री गाढ झोपेत संपूर्ण गाव असतांना अचानक पळा, पळा, धावा असा एकच गोंधळ सुरू झाल्याने जो जागा झाला तो जीन झोपडपट्टी या आठवडे बाजाराशेजारील वस्तीकडे धावू लागला. गावातील सगळ्याच जाती धर्माच्या तरूणांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत, पण तोपर्यंत रुद्रावतार धारण केलेल्या आगीने दहा कुटूंबांच्या संसाराची राख रांगोळी करून टाकली होती. अग्नीशमन दलाचीही आग विझवण्यासाठी मदत झाली.तलाठी कार्यालयाकडून पंचनामेसोमवारी सकाळपासून तलाठी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमनबाई राजू केदार (८४,५००), सुनंदाबाई विठ्ठल पाटील (२ लाख, ५ हजार ) वंदना नाना भालसिंगे (१ लाख, २७ हजार ) इंदूबाई उत्तम भालसिंगे (९००००), सुभाष नथू सोनार (२,५५०००), रतन सोनवणे (९१५००), सोनजी सोनवणे (१ लाख,९०००) द्वारकाबाई हिलाल पाटील (७६०००), युवराज किसन पाटील (१,१९०००), देविदास रामदास ठाकरे (४७०००) असे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या परिसरातील कुटूंब मोलमजूरी करून उपजिविका भागवतात. परिसरात शेकडो झोपड्या व घरे आहेत. सुदैवाने मोठ्या प्रमाणात तरूणांनी मदत केल्याने दहाच घरांवर संकट आले, नाही तर शेकडो घरे अतिशय दाटीवाटीने असल्याने मोठाच अनर्थ घडला असता. या परिसरात एखादी मोटारसायकलदेखील सरळ जाऊ शकत नाही तर पाण्याचा टँकर व इतर मदत मिळणे खूपच कठीण बाब आहे. सुमनबाई केदार या माजी ग्रामपंचायत सदस्येचे देखील घर जळून खाक झाले आहे. यातील एक आगग्रस्त सुभाष सोनार यांच्याकडे लग्न होऊ घातले आहे त्यामुळे या कुटूंबाने डाळ तांदूळसह संसारोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी केलेली होती. ती देखील खाक झाली आहे.सततची पाणीटंचाई कामी आलीकासोदा गांवात गेल्या २० वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा पाणी संग्रह करण्याची सवय जडली आहे. प्रत्येकाच्या घरात कामाच्या वस्तूंपेक्षा पाण्याची भांडी जास्त असतात. त्यामुळे घराघरात मोठा पाणीसाठा असल्याने आग विझवण्यासाठी तो कामी आला. दरम्यान, परिसरात एक पालखी आलेली होती. पालखीच्या सेवेकरींसाठी एक टँकर पाणी भरून आणला होता त्याची देखील यावेळी खूप मदत झाली. 

टॅग्स :fireआग