शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कासोद्यात अग्नीतांडव, १० घरे खाक, दहा कुटुंबांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:22 IST

कासोदा ता. एरंडोल येथे सोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर जीन झोपडपट्टी या भागात अचानक आग लागून दहा घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दहा कुटुंब उघड्यावर आले आहेत.

ठळक मुद्देसोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर लागलेल्या आगीने गिळंकृत केली दहा घरेगावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करीत विझवली आगलग्नानिमित्त एका कुटुंबाने खरेदी केलेले साहित्याची राख

आॅनलाईन लोकमतकासोदा, ता. एरंडोल : येथील जीन झोपडपट्टी या अत्यंत दाटीवाटीच्या भागात सोमवारी पहाटे (दि.१९) अडीच वाजेनंतर अचानक आग लागली. त्यात दहा कुटुंबांचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतून या दहा कुटुंबांतील सदस्यांच्या अंगावरील कपडेच तेवढे शिल्लक राहिले आहेत. पहाटे पहाटेच घरांची राखरांगोळी झाल्याचे भयावह चित्र गावकऱ्यांना पहावे लागल्याने पिडीत कुटूंबांसह पहाणाºयांचेही काळीज पाणावले आहे.आनंद आणि उत्साहाने साजरा झालेल्या गुढी पाडव्याच्या उत्तर रात्री गाढ झोपेत संपूर्ण गाव असतांना अचानक पळा, पळा, धावा असा एकच गोंधळ सुरू झाल्याने जो जागा झाला तो जीन झोपडपट्टी या आठवडे बाजाराशेजारील वस्तीकडे धावू लागला. गावातील सगळ्याच जाती धर्माच्या तरूणांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत, पण तोपर्यंत रुद्रावतार धारण केलेल्या आगीने दहा कुटूंबांच्या संसाराची राख रांगोळी करून टाकली होती. अग्नीशमन दलाचीही आग विझवण्यासाठी मदत झाली.तलाठी कार्यालयाकडून पंचनामेसोमवारी सकाळपासून तलाठी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमनबाई राजू केदार (८४,५००), सुनंदाबाई विठ्ठल पाटील (२ लाख, ५ हजार ) वंदना नाना भालसिंगे (१ लाख, २७ हजार ) इंदूबाई उत्तम भालसिंगे (९००००), सुभाष नथू सोनार (२,५५०००), रतन सोनवणे (९१५००), सोनजी सोनवणे (१ लाख,९०००) द्वारकाबाई हिलाल पाटील (७६०००), युवराज किसन पाटील (१,१९०००), देविदास रामदास ठाकरे (४७०००) असे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या परिसरातील कुटूंब मोलमजूरी करून उपजिविका भागवतात. परिसरात शेकडो झोपड्या व घरे आहेत. सुदैवाने मोठ्या प्रमाणात तरूणांनी मदत केल्याने दहाच घरांवर संकट आले, नाही तर शेकडो घरे अतिशय दाटीवाटीने असल्याने मोठाच अनर्थ घडला असता. या परिसरात एखादी मोटारसायकलदेखील सरळ जाऊ शकत नाही तर पाण्याचा टँकर व इतर मदत मिळणे खूपच कठीण बाब आहे. सुमनबाई केदार या माजी ग्रामपंचायत सदस्येचे देखील घर जळून खाक झाले आहे. यातील एक आगग्रस्त सुभाष सोनार यांच्याकडे लग्न होऊ घातले आहे त्यामुळे या कुटूंबाने डाळ तांदूळसह संसारोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी केलेली होती. ती देखील खाक झाली आहे.सततची पाणीटंचाई कामी आलीकासोदा गांवात गेल्या २० वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा पाणी संग्रह करण्याची सवय जडली आहे. प्रत्येकाच्या घरात कामाच्या वस्तूंपेक्षा पाण्याची भांडी जास्त असतात. त्यामुळे घराघरात मोठा पाणीसाठा असल्याने आग विझवण्यासाठी तो कामी आला. दरम्यान, परिसरात एक पालखी आलेली होती. पालखीच्या सेवेकरींसाठी एक टँकर पाणी भरून आणला होता त्याची देखील यावेळी खूप मदत झाली. 

टॅग्स :fireआग