शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

कासोद्यात अग्नीतांडव, १० घरे खाक, दहा कुटुंबांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:22 IST

कासोदा ता. एरंडोल येथे सोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर जीन झोपडपट्टी या भागात अचानक आग लागून दहा घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दहा कुटुंब उघड्यावर आले आहेत.

ठळक मुद्देसोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर लागलेल्या आगीने गिळंकृत केली दहा घरेगावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करीत विझवली आगलग्नानिमित्त एका कुटुंबाने खरेदी केलेले साहित्याची राख

आॅनलाईन लोकमतकासोदा, ता. एरंडोल : येथील जीन झोपडपट्टी या अत्यंत दाटीवाटीच्या भागात सोमवारी पहाटे (दि.१९) अडीच वाजेनंतर अचानक आग लागली. त्यात दहा कुटुंबांचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतून या दहा कुटुंबांतील सदस्यांच्या अंगावरील कपडेच तेवढे शिल्लक राहिले आहेत. पहाटे पहाटेच घरांची राखरांगोळी झाल्याचे भयावह चित्र गावकऱ्यांना पहावे लागल्याने पिडीत कुटूंबांसह पहाणाºयांचेही काळीज पाणावले आहे.आनंद आणि उत्साहाने साजरा झालेल्या गुढी पाडव्याच्या उत्तर रात्री गाढ झोपेत संपूर्ण गाव असतांना अचानक पळा, पळा, धावा असा एकच गोंधळ सुरू झाल्याने जो जागा झाला तो जीन झोपडपट्टी या आठवडे बाजाराशेजारील वस्तीकडे धावू लागला. गावातील सगळ्याच जाती धर्माच्या तरूणांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत, पण तोपर्यंत रुद्रावतार धारण केलेल्या आगीने दहा कुटूंबांच्या संसाराची राख रांगोळी करून टाकली होती. अग्नीशमन दलाचीही आग विझवण्यासाठी मदत झाली.तलाठी कार्यालयाकडून पंचनामेसोमवारी सकाळपासून तलाठी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमनबाई राजू केदार (८४,५००), सुनंदाबाई विठ्ठल पाटील (२ लाख, ५ हजार ) वंदना नाना भालसिंगे (१ लाख, २७ हजार ) इंदूबाई उत्तम भालसिंगे (९००००), सुभाष नथू सोनार (२,५५०००), रतन सोनवणे (९१५००), सोनजी सोनवणे (१ लाख,९०००) द्वारकाबाई हिलाल पाटील (७६०००), युवराज किसन पाटील (१,१९०००), देविदास रामदास ठाकरे (४७०००) असे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या परिसरातील कुटूंब मोलमजूरी करून उपजिविका भागवतात. परिसरात शेकडो झोपड्या व घरे आहेत. सुदैवाने मोठ्या प्रमाणात तरूणांनी मदत केल्याने दहाच घरांवर संकट आले, नाही तर शेकडो घरे अतिशय दाटीवाटीने असल्याने मोठाच अनर्थ घडला असता. या परिसरात एखादी मोटारसायकलदेखील सरळ जाऊ शकत नाही तर पाण्याचा टँकर व इतर मदत मिळणे खूपच कठीण बाब आहे. सुमनबाई केदार या माजी ग्रामपंचायत सदस्येचे देखील घर जळून खाक झाले आहे. यातील एक आगग्रस्त सुभाष सोनार यांच्याकडे लग्न होऊ घातले आहे त्यामुळे या कुटूंबाने डाळ तांदूळसह संसारोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी केलेली होती. ती देखील खाक झाली आहे.सततची पाणीटंचाई कामी आलीकासोदा गांवात गेल्या २० वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा पाणी संग्रह करण्याची सवय जडली आहे. प्रत्येकाच्या घरात कामाच्या वस्तूंपेक्षा पाण्याची भांडी जास्त असतात. त्यामुळे घराघरात मोठा पाणीसाठा असल्याने आग विझवण्यासाठी तो कामी आला. दरम्यान, परिसरात एक पालखी आलेली होती. पालखीच्या सेवेकरींसाठी एक टँकर पाणी भरून आणला होता त्याची देखील यावेळी खूप मदत झाली. 

टॅग्स :fireआग