शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पुन्हा नटसम्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:35 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन पुरवणी’त ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी...

आपल्या सर्वसामान्य जगण्यात काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे पुनर्अनुभव हे सतत हवेहवेसे वाटत असतात. एखाद्या वस्तूचा वापर असो, एखादा खाद्यपदार्थ असो की एखादं गाणं असो.. ते पुन्हा पुन्हा अनुभवावं असं वाटतं. त्याचा कंटाळा नाही येत. त्याची गोडी ही अवीट असते आणि अशा काही गोष्टी, घटना, अनुभव, कलाकृती हे जगणं सुसह्य करीत असतात.साधारणत: सत्तरीच्या दशकात मराठी रंगभूमीवर एक अद्भुत आविष्कार झाला आणि तो इतका प्रभावी ठरला की मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांवर आजही गारूड करीत आहे आणि तो आविष्कार म्हणजे नटसम्राट. हे नाटक. कै.वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या दिव्य प्रतिभेचा तो एक उत्तुंग अविष्कार आहे. या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक ऊर्जा निर्माण केली. सुरुवातीला जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा या नाटकातील प्रमुख भूमिका म्हणजेच अप्पासाहेब बेलवलकरांची म्हणजे नटसम्राटाची भूमिका ही मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ कलावंत डॉ.श्रीराम लागू यांनी साकारली व ती खऱ्या अर्थाने अजरामर केली. या भूमिकेला डॉक्टरांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, तर या नाटकाने डॉक्टरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.नाटक चालतंय म्हटल्यावर त्याचे शेकड्याने प्रयोग झालेत आणखी होऊ पाहात होते. पण डॉक्टरांचा नेहमीप्रमाणे संयमीत स्वभाव आडवा आला आणि त्यांनी याचे प्रयोग थांबवले. त्यांनी प्रयोग करणे थांबवले पण नाटक थोडीच थांबणारे होते. त्यांच्या पाठोपाठ नटश्रेष्ठ दत्ता भट यांनी त्या भूमिकेचे शिवधनुष्य लीलया पेलले आणि मग एक अहमहमिकाच लागली. मराठी रंगभूमीवरील अनेक ज्येष्ठ नटांनी या नाटकाचे आव्हान पेलले व ते आपापल्या वकूबानुसार सिद्ध करून दाखवले.हे नाटक म्हणजे असंख्य पैलू असलेला लखलखीत हिरा आहे, असे म्हटले तर अतिशोयोक्ती होणार नाही. एखादी कलाकृती प्रेक्षकांना भावते ती त्यातील कंटेंटमुळे. त्यातील गर्र्भित अर्थामुळे. नटसम्राट हे नाटक व्यक्तिपरत्वे अर्थाचे पैलू प्रकट करते. कोणाला ते वृद्धांची शोकांतिका वाटते तर कोणाला कलावंताच्या जीवनाचे शोकनाट्य वाटते, कोणाला तर मुलांनी असे वागू नये असेसुद्धा वाटते. हे नाटक पाहत असताना प्रेक्षकातील प्रत्येक जण त्या नाटकातील कुठल्या तरी पात्राशी स्वत:ला जोडत असतो. रंगमंचावर हे नाटक सादर होत असताना इतक ते सर्वव्यापी होत जाते. नाटक सुरू असताना नाट्यगृहाचे प्रेक्षक कधी स्तब्ध होतात तर कधी ऊसासे टाकतात तर कधी ओठाशी येणारा हुंदका आवरतात आणि मग डोळे पुसत-पुसत जड अंत:करणाने घरी परततात.या नाटकाचा मोह मग चित्रपट सृष्टीला न पडेल तर नवल. या नाटकावर सिनेमा पण येऊन गेला रंगभूमी व चित्रपट गाजवणाºया ज्येष्ठ कलावंतांनी त्यात कामे केलीत. सिनेमा छान होता. तो आपापल्या कुवतीनुसार व वकुबानुसार चालला. पण शेवटी तो सिनेमा होता. खºया सुुगंधी फुलांचा गुच्छ कुठे आणि चित्रातली फुलं कुठे ! सिनेमा पाहताना त्या मूळ नाटकातीच आठवण होत होती हे त्या नाटकाची खºया अर्थाने ताकद होय. हे नाटक विलीयम शेक्सपिअयरच्या किंग लियर या इंग्रजी नाटकाचा तो मराठी आविष्कार आहे. शेक्सपिअरची बरीच नाटके मराठी रंगभूमीवर रूपांतरित, भाषांतरीत, अनुवादीत इ. अशा अनेक प्रकारांनी आलीत. मराठीतच नाही तर जगभरातल्या भाषांमध्ये शेक्सपिअर पोहोचला, पण किंग लिअरला जे काही मराठीपण लाभले ते अद्वितीय असे होते.या नाटकाने केवळ लोकप्रियता नाही मिळवली तर जनसामानाच्या मनात स्थान मिळवले. या नाटकातील प्रत्येक वाक्य, स्वतगं, प्रसंग हे मनाच्या कप्प्यात कोरून ठेवलेली आहेत. जसं आपल्या घरच्या कपाटात ठेवलेली कस्तुरी कपाट उघडल्याबरोबर आपल्या सुगंधाची जशी तरल जाणीव करून देते तसे हे नाटक जेव्हा-जेव्हा स्मृतीच्या पटलावर येते तेव्हा असाच मनमोहक आनंद देऊन जाते आणि आता तर हे नाटक पुन्हा तशाच सुगंधाची उधळण करायला रंगमंचावर अविष्कृत होत आहे. चला.. आपण जरूर पाहू या !-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव