शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही जळगाव जिल्हा रुग्णालय समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:19 IST

२० दिवसांनंतरही रुग्णांचे हाल कायम

ठळक मुद्देचांगल्या सेवा देण्यावर भर - अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे गरीब रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र संताप

जळगाव : गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा बट्टयाबोळ झाला असून जिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारा, अशा सूचना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या, मात्र तरीदेखील जिल्हा रुग्णालयात एका खाटेवर दोन-तीन रुग्ण टाकण्यासह रुग्णांचे हाल सुरूच असल्याचे चित्र २० दिवसांनंतरही कायम आहे.जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढून जागा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन अथवा तीन रुग्ण टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. शुक्रवारीदेखील ही समस्या कायम होती.गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असून आता वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने येथे रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. गुलाबराव पाटील यांनी आरोग्य विभाग व परिवहन विभागाची ७ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी आरोग्य सेवेतील त्रुटींवर बोट ठेवत गरीब रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत संबंधिताना जाबही विचारला होता.समस्या कायमजिल्हा रुग्णालयात जागेअभावी अनेक प्रसूत महिलांना सतरंजी टाकून झोपवले जाते. त्या बाबत नवीन वॉर्डास मंजूरी मिळेल तेव्हा मिळेल पण पर्यायी व्यवस्था करा, असे राज्यमंत्री पाटील यांनी सूचविले होते. सोबतच तुमच्या आया बहिणींचे रुग्णालयात असे हाल झालेले तुम्हाला चालेल का? नाही काही तर गाद्यांची व्यवस्था करा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला होता, मात्र तरीदेखील समस्या कायम असून गेल्या आठवड्यात एका सिझेरियन झालेल्या महिलेला परिचारिकेने कक्षातून हाकलून दिले होते.त्यानंतर पुन्हा २७ रोजी एका खाटेवर तीन-तीन रुग्णांना टाकण्याची वेळ आली होती. त्यामुळे रुग्णांचे हाल कायम असल्याचे चित्र राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कायम असल्याचे शुक्रवारीदेखील दिसून आले.चांगल्या सेवा देण्यावर भर - अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरेजिल्हा रुग्णालयातून प्रसूतीसाठी महिलांना इतरत्र पाठविले जात नाही. रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने येथेच चांगले उपचार करण्यावर आमचा भर असल्याचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी सांगितले. रुग्णाला बाहेर पाठविल्यास वेगवेगळे आरोप होतात, मात्र तसे नसून गंभीर रुग्ण असला तरच त्याला इतरत्र पाठविले जाते. आलेल्या प्रत्येक रुग्णावर येथेच चांगले उपचार करण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत असल्याचे डॉ. खैरे म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव