शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:32 IST

भुसावळ तालुक्यात मोंढाळे, शिंदी, कंडारी, महादेव माळ यासह अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ह्या आठवड्यात पुन्हा मांडवे दिगर भिलमडी तांडा, मुसळ तांडा आदी काही गावांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देया आठवड्यात नवीन गावांची भर पडणारमहादेव तांडा विहिरीसंदर्भात नागरिकांना संशय नऊ गावांसाठी दहा विहिरी अधिग्रहित

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात मोंढाळे, शिंदी, कंडारी, महादेव माळ यासह अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ह्या आठवड्यात पुन्हा मांडवे दिगर भिलमडी तांडा, मुसळ तांडा आदी काही गावांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच शहरांमध्ये पाण्यासाठी फिरफिर सुरू असताना ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी आबालवृद्धांना रखरखत्या उन्हात भटकावे लागत आहे.दरम्यान, तालुक्यात नऊ गावांमध्ये दहा विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, तर चार गावांमध्ये सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिली.दरम्यान, सोमवारी विल्हाळा येथे विहीर खोलीकरण प्रस्ताव आला आहे, तर मांडवेदिगर येथे दोन बोरवेल मुशाळतांडा येथे एक व भिलवडी तांडा येथे एक बोरवेल करण्याचा प्रस्ताव आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एस. लोखंडे यांनी दिली.मोंढाळा, शिंदी , खंडाळे आदी परिसरात विहिरीनी पावसाळ्यातच तळ गाठला होता. त्यामुळे या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही या गावांमध्ये टँकरची मागणी आहे.महादेव माळ येथे दहा लाखांच्या विहीरला पाइपलाइनची प्रतीक्षामहादेव माळ या बंजारातांडा वस्तीवर गेल्या वर्षापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे कुºहे (पानाचे) गावाजवळील पाझर तलावावरून पाणी योजना राबविण्यात आली आहे. मात्र तलावातच पाणी नाही. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे, तर येथे मनरेगा योजनेंतर्गत जवाहर विहिरीसाठी तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. ही विहीर खोदण्यात व बांधकामही करण्यात आले आहे. मात्र या विहिरीला पाणी किती आहे, हा प्रश्न उपस्थित झाला असून, या विहिरीवर राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे लवकरच अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून ते तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता लोखंडे यांनी दिली.मे महिन्यात तांत्रिक मंजुरीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्यामुळे एकंदरीत या वर्षी या योजनेचे पाणी महादेव तांडा या वस्तीला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर , विहीर खोदून वर्ष झाले. मात्र पाईपलाईन मंजूर करणे किंवा काम करणे यास विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या विहिरीला पाणीच लागले नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या विहिरीवरून पाईपलाईन करण्याचे टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. यावर्षी पाइपलाइन केली असती गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला तर, विहिरीत पाणी नसल्याचे उघड होईल व कोरड्या ठिकाणी विहीर खोदून पैसे काढून घेतल्याचे समोर येऊन काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा भांडाफोड होईल या भीतीने पाईपलाईन करण्यासाठी तर टाळाटाळ करण्यात येत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र योजनेचे काम अद्यापही सुरू नसल्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर विहिरीला पाणी असल्यास पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.नऊ गावांसाठी दहा विहिरी अधिग्रहिततालुक्यातील कन्हाळे खुर्द (१), शिंदी (३), खेडी व चोरवड (१), मोंढाळा (१), एक टाकळी (१), खंडाळा (१) व कन्हाळे बुद्रूक (१) व गोंभी (१) अशा नऊ गावांसाठी १० विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.चार गावात सहा टँँकरतालुक्यातील कंडारी येथे दोन, महादेव माळ येथे एक कन्हाळा बुद्रूक येथे एक व भुसावळ ग्रामीण येथे दोन असे सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ