शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर जळगावातील गाळेधारकांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:09 PM

मंत्री,आमदारांसह शिष्टमंडळाने पुन्हा घेतली भेट

ठळक मुद्दे दुपारी ४ नंतर गजबजले २० मार्केट सकाळपासून आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांसोबत झाली पुन्हा चर्चा

जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांच्या विषयावर विधानसभेत निवेदन केल्यानंतरही जळगावातून मुंबईत गेलेल्या गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी सायंकाळी तसेच शुक्रवारीही पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी या शिष्टमंडळाला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर जळगावात चार दिवसांपासून सुरु असलेले बेमुदत बंदचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निंबूपाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. तसेच नागरिकांची आणखी गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन मागे घेतल्यानंतर शहरातील ४ दिवसांपासून बंद असलेली २० मार्केटमधील दुकाने दुपारी ४ वाजेपासून उघडली.सकाळपासून आमरण उपोषणशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्णय घेत जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे शुक्रवारपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, २३ रोजी सकाळी आमरण व साखळी उपोषणासाठी नाव नोंदविलेल्या गाळेधारकांसह सर्वच गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मंडपात जमून उपोषणास प्रारंभ झाला.मुख्यमंत्र्यांसोबत झाली पुन्हा चर्चादरम्यान जळगाव शहर मार्केट गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी १० वाजता विधानभवन परिसरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या मागण्यांचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, गाळेधारक संघटनेचे हिरानंद मंधवाणी, रमेश मताणी, राजेश वरयाणी, दीपक मंधान उपस्थित होते. यावेळी गाळ्यांबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले होते. तसेच शुक्रवारीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी आदींच्यासोबत गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची दोन-तीन वेळा भेट घेऊन चर्चा केली.मुख्यमंत्र्यांनी केले आवाहनशिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. दीर्घ मुदतीसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात येणाºया गाळेधारकांचे नुकसान होऊ नये आणि महानगरपालिकेचे आर्थिक हित जोपासले जावे यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल. मात्र गाळेधारकांनी आंदोलन मागे घ्यावे. आंदोलन मागे न घेतल्यास मदत करू शकणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची माहिती गाळेधारकांचे प्रतिनिधी हिरानंद मंधवाणी यांनी तसेच आमदार सुरेश भोळे यांनी कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांना दिली. डॉ.सोनवणे यांनी ही माहिती गाळेधारकांना देऊन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले असताना व विधानसभेतही निवेदन केलेले असताना विश्वास ठेवावा लागेल, असे मत व्यक्त करीत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकाºयांच्या संपर्कातगाळेधारकांच्या आंदोलनासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकाºयांशी फोनवरून संपर्कात होते. त्यामुळे गुरूवारी रात्रीही जिल्हाधिकाºयांनी या गाळेधारकांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलविले होते. त्यावेळी गाळेधारकांनी २०१२ ते २०१७ पर्यंत मनपाने पूर्वीच्या पद्धतीने काही टक्के भाडेवाढ करून ते भाडे स्विकारावे. २०१७ पासूनपुढच्या कराराचा निर्णय शासन घेईल, अशी मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकाºयांनी हा विषय त्यांच्या हातात नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शुक्रवारीही गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने मनपात जाऊन महापौर व आयुक्तांना हे निवेदन दिले. मात्र महासभेत हा विषय अजेंड्यावर नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सूचना दिल्या. उपोषण मागे घेण्याचे ठरवल्यावर गाळेधारक कोअर कमिटीचे काही सदस्य जिल्हाधिकाºयांकडे गेले. त्यांना आंदोलन मागे घेण्याचा निर्णय सांगून सोबत घेऊन आले.जिल्हाधिकाºयांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषणाची सांगताजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी येताच उपोषणकर्त्यांच्या मध्ये जाऊन बसले. गाळेधारकांशी संवाद साधत शांततेत आंदोलन केल्याबद्दल प्रशासनातर्फे आभारही मानले. त्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषणास बसलेल्या गाळेधारकांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.